शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

आईच्या संतापात असतं प्रेमाचं अत्तर - कवी देवा झिंजाड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 16:28 IST

कविता म्हणजे अभिव्यक्त हाेण्याचं सशक्त माध्यम.

ठळक मुद्दे‘अंतर्नाद’च्या पुष्पांजली प्रबाेधनमालेत पुण्याचे कवी देवा झिंजाड यांचे भावाेद‌्गारया प्रबाेधनमालेने भुसावळ शहराच्या सांस्कृतिक वैभवात, लाैकीकात नक्कीच भर पडेल

भुसावळ : कविता म्हणजे अभिव्यक्त हाेण्याचं सशक्त माध्यम. कमी शब्दात अतिशय माेठा आशय  या साहित्य प्रकारातून मांडला जाताेे. तुमच्या-आमच्या काळजात दाबलेला उमाळा म्हणजे कविता हाेय. कवितेत मांडलेला मायबाप समजून घेण्यासाठी संवेदनशील काळीज लागतं, असं परखड मत पुण्याचे कवी देवा झिंजाड यांनी व्यक्त केले. अंतर्नाद प्रतिष्ठानने स्वर्गीय पुष्पा वसंतराव पाटील यांचे स्मरण करण्यासाठी तीन दिवसीय पुष्पांजली ऑनलाईन प्रबाेधनमाला आयाेजित केली आहे. त्यात मंगळवारी ‘मायबापाच्या कविता’ या विषयावर प्रथम पुष्प गुंफताना ते बाेलत हाेते. कवी म. भा. चव्हाण यांच्या ‘आई उन्हाची सावली, आई सुखाचे नगर, निळ्या आकाशाएवढा तिच्या मायेचा पदर’  आणि कवयित्री बहिणाबाई चाैधरींच्या देरे देरे याेग्या ध्यान... एक मी काय सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते’ या कवितांनी त्यांनी व्याख्यानाला सुरुवात केली. संकटाचा पहाड फाेडण्याची ताकद मायबापांनी दिलेल्या संस्कारांच्या शिदाेरीत असते. मात्र, अलिकडची टेक्नाेसॅव्ही पिढीला मळकटलेली बंडी, फाटकं धाेतर घातलेल्या बापासाेबत चालायला अन‌् उभी राहायला लाज वाटते. पण हे चित्र बदलायला हवं, असा संदेशही त्यांनी स्वरचित कवितांतून दिला. संघर्ष, समाज, शिक्षण, व्यथा, वेदना, मायबाप, लेक असे नानाविध विषयांची गुंफण त्यांनी केली. ‘फुले’ नावाची कविता खर्जातील आर्जवात सादर करताना त्यांना गहिवरून आले हाेते. ‘मुंढावळ्यांचा फुलांचा स्पर्श...शेवटचा ठरला गं आई, त्यानंतर फुलांशी माझं नातचं तुटलं गं बाई’ या ओळीतून लेकीबाळींना सासुरवास कसा हाेताे हे मांडले. त्यातील प्रत्येक शब्द हा रसिकांच्या काळजाचा ठाव घेणारा ठरला. त्यानंतर त्यांनी ‘मायबाप’ कवितेतील ‘ऋण आईच्या गर्भाचे या जन्माचं फेडावं, आई-बापाच्या सावलीत हिरव्य काेंबाने वाढावं’ या ओळी सादर करून व्याख्यानाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. दरम्यान, या प्रबाेधनमालेने भुसावळ शहराच्या सांस्कृतिक वैभवात, लाैकीकात नक्कीच भर पडेल. सशक्त अशी एक समृद्धशाली वैचारीक चळवळ या माध्यमातून उभी राहत असून ती पथदर्शी आहे, असे गाैरवाेद‌्गारही त्यांनी व्याख्यानातून काढले. आईच्या संतापात असतं प्रेमाचं अत्तरमाय या दाेन अक्षरी शब्दात संकटांचं वादळ पेलण्याची क्षमता आहे. तिचं मुलं उन्हात उभं असेल तर ती ‘इकडे मर सावलीत’ असं संतापात म्हणते. ती जाे मर शब्द वापरते ताे म्हणजे प्रेमाचं अत्तर आहे. पाेराला उन्हाच्या झळा लागू नये ही त्यामागची भावना असते. काळजाच्या तुकड्याशी काळजाने काळजीपूर्वक साधलेला ताे संवाद असताे, असेही कवी झिंजाड म्हणाले. ‘आई जग दावणारी....आई हंबरणारी गाय, शिळपाख खाऊनही देई लेकरांना साय’ या कवितेतून त्यांनी आईची महती वर्णिली. प्रबाेधनामालेचं यंदा तृतीय वर्ष पुष्पांजली प्रबाेधनमालेचं यंदाचं तृतीय वर्ष आहे. सांस्कृतिक चवळव प्रवाहीत राहावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे, असे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांनी प्रास्ताविकात नमूद केले. उपक्रमासाठी जळगावचे बांधकाम व्यावसायिक अजय बढे यांचे पाठबळ लाभत आहे. सूत्रसंचालन योगेश इंगळे यांनी केले. प्रकल्पप्रमुख अमित चाैधरी, समन्वयक प्रा.श्याम दुसाने, सहसमन्वयक आर. डी. साेनवणे यांच्यासह नियाेजन समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ