शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

राज्य मार्गांवरच्या अपघातांमध्ये सर्वाधिक बळी! महामार्गावरच्या बळींच्या संख्येत १२ टक्क्यांनी घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 16:31 IST

ग्रामीण रस्त्यांवरही लक्षणीय मृत्यू

कुंदन पाटील, जळगाव: गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा राज्य मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. महामार्गावरच्या अपघातांमधील बळींच्या संख्येत सुदैवाने १२ टक्क्यांनी घट झाली आहे. ग्रामीण रस्त्यांनी यंदाच्या वर्षात घेतलेल्या बळींची संख्याही चिंतेत टाकणारी आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाने जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात झालेल्या अपघातांचा तुलनात्मक आढावा घेतला आहे. २०२३ च्या तुलनेत यंदा झालेल्या अपघातांचा आकडा चिंतेत टाकणारा आहे. सर्वाधिक अपघात सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेदरम्यान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याचाच अर्थ दारुच्या नशेसह घरी परतण्याच्या अतिघाईमुळे या अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले आहे.

‘राज्य मार्ग’ पुढे

महामार्गाच्यातुलनेत यंदा राज्य मार्गांवर सर्वाधिक अपघात झाले असून त्यातील बळींची संख्याही जास्त असल्याचे या पडताळणीत दिसून आले आहे.गेल्यावर्षी  महामार्गावर ४५ तर राज्यमार्गावर ५० जणांचा बळी गेला होता. यंदा मात्र हा आकडा अनुक्रमे ४० व ६७ असा असल्याचे दिसून आले आहे. राज्य मार्गांवरच्या अपघातांमध्ये बळी जाणाऱ्या वाहनचालकांची संख्या अतिशय चिंतेचे बाब आहे. अनेक जण नियम मोडीत काढतात आणि भरधाव वेगाने वाहन हाकत असल्याने अपघातांमध्ये मृत्यू पावत असल्याचा निष्कर्ष प्रादेशिक परिवहन विभागाने नोंदविला आहे.

दृष्टीक्षेपात मार्गनिहाय झालेले अपघात दृष्टीक्षेपात

मार्ग-२०२३-२०२४-वाढ

  • राष्ट्रीय महामार्ग-४५-४०- (-१२)
  • राज्य मार्ग-५०-६७- (+३४)
  • मुख्य जिल्हे रस्ते-०४-०५- (+२५)
  • अन्य जिल्हे रस्ते-१३-०८- (-३९)
  • ग्रामीण रस्ते-३६-३२- (-१२)
  • स्थानिक रस्ते-१०-०६-(-४०)

 

 

टॅग्स :Accidentअपघात