शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

राज्य मार्गांवरच्या अपघातांमध्ये सर्वाधिक बळी! महामार्गावरच्या बळींच्या संख्येत १२ टक्क्यांनी घट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 16:31 IST

ग्रामीण रस्त्यांवरही लक्षणीय मृत्यू

कुंदन पाटील, जळगाव: गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा राज्य मार्गावर झालेल्या अपघातांमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. महामार्गावरच्या अपघातांमधील बळींच्या संख्येत सुदैवाने १२ टक्क्यांनी घट झाली आहे. ग्रामीण रस्त्यांनी यंदाच्या वर्षात घेतलेल्या बळींची संख्याही चिंतेत टाकणारी आहे.

प्रादेशिक परिवहन विभागाने जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यात झालेल्या अपघातांचा तुलनात्मक आढावा घेतला आहे. २०२३ च्या तुलनेत यंदा झालेल्या अपघातांचा आकडा चिंतेत टाकणारा आहे. सर्वाधिक अपघात सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेदरम्यान झाल्याचे स्पष्ट झाले आहे. याचाच अर्थ दारुच्या नशेसह घरी परतण्याच्या अतिघाईमुळे या अपघातांचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले आहे.

‘राज्य मार्ग’ पुढे

महामार्गाच्यातुलनेत यंदा राज्य मार्गांवर सर्वाधिक अपघात झाले असून त्यातील बळींची संख्याही जास्त असल्याचे या पडताळणीत दिसून आले आहे.गेल्यावर्षी  महामार्गावर ४५ तर राज्यमार्गावर ५० जणांचा बळी गेला होता. यंदा मात्र हा आकडा अनुक्रमे ४० व ६७ असा असल्याचे दिसून आले आहे. राज्य मार्गांवरच्या अपघातांमध्ये बळी जाणाऱ्या वाहनचालकांची संख्या अतिशय चिंतेचे बाब आहे. अनेक जण नियम मोडीत काढतात आणि भरधाव वेगाने वाहन हाकत असल्याने अपघातांमध्ये मृत्यू पावत असल्याचा निष्कर्ष प्रादेशिक परिवहन विभागाने नोंदविला आहे.

दृष्टीक्षेपात मार्गनिहाय झालेले अपघात दृष्टीक्षेपात

मार्ग-२०२३-२०२४-वाढ

  • राष्ट्रीय महामार्ग-४५-४०- (-१२)
  • राज्य मार्ग-५०-६७- (+३४)
  • मुख्य जिल्हे रस्ते-०४-०५- (+२५)
  • अन्य जिल्हे रस्ते-१३-०८- (-३९)
  • ग्रामीण रस्ते-३६-३२- (-१२)
  • स्थानिक रस्ते-१०-०६-(-४०)

 

 

टॅग्स :Accidentअपघात