शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

आमदारांनी जळगाव शहर खड्ड्यात घातले! उद्धव ठाकरे गटाची सरकारवर टीका

By सुनील पाटील | Updated: October 9, 2023 20:38 IST

‘होऊ द्या चर्चा’चे सभेत रुपांतर

सुनील पाटील, लोकमत न्यूज नेटवर्क, जळगाव: सन २०१४ पासून शहरात भाजपचे आमदार आहेत, तेव्हापासून आमदारांनी शहराला खड्डयात घातले आहे. आजही शहरवासिय खड‌्डयांमुळे नरकयातना भोगत आहेत. रस्त्याचे प्रश्न मार्गी लागत नाही. महापालिकेला काम करु दिले जात नाही. गटारी, स्ट्रीट लाईट नाही. आमदारांनी कोणतेही एक तरी ठोस काम दाखवावे असे आव्हान ठाकरे गटाने दिले आहे. पिंप्राळा व हुडको या भागात ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमाचे सोमवारी सायंकाळी सभेत रुपांतर झाले, त्यात आमदार सुरेश भोळे यांनाच टार्गेट करण्यात आले.

शिवसेना ठाकरे गटाकडून ‘होऊ द्या चर्चा’ या कार्यक्रमातून राज्य व केंद्र सरकारच्या करुया बोलघेवड्या योजनांचा भांडाफोड असे फलक लावून आमदारांना टार्गेट केले जात आहे. जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, माजी महापौर जयश्री महाजन, माजी उपमहापौर कुलभूषण पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, गायत्री सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते. भाजपे अच्छे दिनाचे आश्वासन दिले होते ते आले का?, पक्के घरकुल मिळाले का?, अरबी समुद्रात शिवस्मारक झाले का?, महागाई कमी झाली का? असे प्रश्न विचारण्यात आले. जळगाव शहरात आमदारांचे एकही ठोस काम नाही. शहराला खड्डेमुक्त करु असे आश्वासन दिले होते. आता कार्यकाळ संपण्याची वेळ आली, शहर खड्डेमुक्त झालेले नाही. उलट या शहराला खड्ड्यात घालण्याचे काम आमदारांनी केले. न झालेल्या कामांचा शुभारंभ केला जात आहे. बॅनरबाजी केली जात आहे, अशी टिका ठाकरे गटाने केली. दोन्ही ठिकाणी झालेल्या सभांना एक हजारापेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेJalgaonजळगाव