शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

रेल्वे मंत्रालयाचे भुसावळ विभागाला दिवाळी गिफ्ट 

By सचिन देव | Updated: October 16, 2022 18:57 IST

रेल्वे मंत्रालयाने जळगाव ते मनमाड दरम्यान चौथ्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणालाही मंजुरी दिली आहे.  

जळगाव: जळगाव ते मनमाडच्या दरम्यान चौथ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू असताना, रेल्वे मंत्रालयाने जळगाव ते मनमाड दरम्यान चौथ्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणालाही मंजुरी दिली आहे. रेल्वे मंत्रालयाच्या मंजुरीचे पत्र मध्य रेल्वेच्या मुंबईतील मुख्य कार्यालयाकडून नुकतेच भुसावळ विभागाला प्राप्त झाले आहे. रेल्वे मंत्रालयाच्या या मंजुरीनंतर भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे लवकरच निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात गेल्या अनेक वर्षांपासून अप आणि डाऊन हे दोनच मुख्य रेल्वे मार्ग आहेत. दर दहा मिनिटाला या दोन्ही मार्गावरून एकामागून एक ट्रेन जात असल्यामुळे, हा मार्गावर सतत वर्दळ असते, तसेच या दोन्हीपैकी एका मार्गावर कधीतरी अपघाताची घटना घडल्यास, याचा रेल्वेच्या वाहतुकीवर मोठा परिणाम होतो. त्यामुळे मध्य रेल्वे प्रशासनातर्फे भुसावळ विभागात तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाच्या उभारणीसाठी गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. यात सात वर्षांपूर्वी भुसावळ ते जळगाव दरम्यान तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाच्या कामाला मंजुरी देण्यात आली होती, तर चार वर्षांपूर्वी जळगाव ते मनमाड दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामाला मंजुरी मिळाली होती. आता रेल्वे मंत्रालयाने पुन्हा जळगाव ते मनमाड दरम्यान चौथ्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी देऊन, ऐन दिवाळीत भुसावळ रेल्वे प्रशासनाला व प्रवाशनांही भविष्यातील सुविधेच्या दृष्टिकोनातून दिवाळीचे गिफ्ट दिले आहे. दरम्यान, रेल्वे मंत्रालयाने भुसावळ ते खंडवाच्या दरम्यानही तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिली असून, यासाठी दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे.

सर्वेक्षणासाठी लवकरच निविदा प्रक्रिया भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे या चौथ्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. जळगाव ते मनमाड हा १६० किलोमीटरचा मार्ग असून, रेल्वेची मान्यता असलेल्या एजन्सीतर्फे हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणात भूसंपादन किती करायचे, कुठे ब्रीज बांधायचे, कुठे बोगदे बांधायचे, किती खर्च येणार आदी तांत्रिक बाबींचे सर्वेक्षण यावेळी करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणासाठी रेल्वे मंत्रालयाने दीड कोटीचा निधी मंजूर केला असून, सर्वेक्षणानंतर तो अहवाल मंजुरीसाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठविण्यात येणार आहे.

नवीन मार्गाचे हे होणारे फायदे- जळगाव ते मनमाड दरम्यान होणाऱ्या तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गामुळे गाड्या विलंबाने धावण्याचे प्रमाण कमी होईल.- मेगाब्लॉकमुळे गाड्या रद्दचे प्रमाण कमी होईल.- अप किंवा डाऊनच्या मुख्य लाईनला कधी अपघात झाला, तर वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रमाण कमी होईल.- सण-उत्सवात नवीन गाड्यांची संख्या वाढविता येईल.- या नवीन मार्गांमुळे भुसावळ ते मनमाड दरम्यान स्वतंत्र लोकलची सेवाही सुरू करता येईल.

रेल्वे मंत्रालयाने जळगाव ते मनमाडच्या दरम्यान चौथ्या, तर भुसावळ ते खंडवाच्या दरम्यान तिसऱ्या व चौथ्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणालाही मंजुरी दिली आहे. सर्वेक्षणासाठी लवकरच भुसावळ रेल्वे प्रशासनातर्फे लवकरच निविदा प्रक्रिया काढण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने मुंबई मार्गावर व खंडवा मार्गावरही नवीन रेल्वे मार्गांच्या सर्वेक्षणाला मंजुरी दिल्याने, भुसावळ विभागातील प्रवाशांसाठी ही मोठी आनंदाची बाब आहे. अशी माहिती डॉ.शिवराज मानसपुरे यांनी दिली. 

 

टॅग्स :Jalgaonजळगावrailwayरेल्वे