शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

शासनाच्या मदतीविना स्थलांतरितांची क्षुधा शांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:31 IST

बहुतांश मजूर परतले गावी : प्रवासाच्या परवानगी पूर्वीच १३८ मजुरांनी केले पलायन

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांसाठी जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या निवारागृहातील मजूर, कामगारांना आधार देण्यासाठी विविध सेवाभावी संस्था सरसावल्या व प्रशासनाच्या मदतीविना त्यांचे उदरभरण करण्यात आले. घरापासून कोसो दूर असताना पोटाची खळगी कशी भरणार या चिंतेत असतानाच आम्हाला विविध संस्थांनी मदत केल्याने आमची चिंता, मिटली, अशा भावनादेखील स्थलांतरितांनी व्यक्त केल्या. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील वेगवेगळ््या निवारागृहातील १३८ जणांनी पलायन केल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षाची अनुभूतीही या निमित्ताने आली.कोरोना विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये म्हणून सुरक्षिततेसाठी शासनाने लॉकडाउन जाहीर केले. यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांना काम नसल्याने त्यांनी आपापल्या गावी परतण्यास प्राधान्य दिले. जळगाव जिल्ह्याच्या सीमेवरदेखील पोलिसांनी हजारो नागरिकांवर कारवाई करून त्यांना जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या शासकीय निवारागृहामध्ये ठेवले. या निवारागृहात आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध आहे की नाही, या संदर्भात त्या पार्श्वभूमीवर भेट देऊन पाहणी केली असता या ठिकाणी प्रशासनाच्या मदतीपूर्वीच सेवाभावी संस्थांकडून मदत पुरविली जात असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे येथे दिल्या जाणाºया भोजन व इतर वस्तूंमुळे कशाचीही कमतरता भासत नसल्याचे स्थलांतरितांनी सांगितले.१३५२ स्थलांतरितांसाठी निवारागृहस्थलांतरित नागरिक व मजुरांसाठी जिल्हा प्रशासनाने जळगाव शहरात राधाकृष्ण मंगल कार्यालय, लाडवंजारी मंगल कार्यालय व गेंदालाल मिल गोडावून या तीन ठिकाणी तसेच कार्की फाटा, आरटीओ चेकपोस्ट हॉल, मुक्ताईनगर, पाचोरा, चाळीसगाव, चोपडा या ठिकाणी निवारागृह सुरु केले आहे. तर कामगार विभागानेही, भुसावळ, चोपडा आदी ६ ठिकाणी कामगारांसाठी निवारागृह सुरु केले आहे.शासकीय निवारागृहात ४४१ तर कामगार विभागाच्या निवारागृहात ९११ असे एकूण १३५२ स्थलांतरितांची सोय करण्यात आली आहे. शहरातील तीन निवारागृहामध्ये मध्यप्रदेशातील १११, उत्तरप्रदेशातील ७४, राजस्थानातील १४६ तर महाराष्ट्रातील ११० मजुरांचा समावेश आहे. लाडवंजारी मंगल कार्यालय, कर्की येथील निवारागृह येथे सेवाभावी संस्थांतर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आली.वेगवेगळ्या प्रकारची मदतनिवारागृहात असलेल्यांना सेवाभावी संस्था व लोकप्रतिनिधींच्या मदतीने त्यांच्या निवाºयाची, भोजनाची व इतर वस्तू देण्याची सोय केली जात आहे. या सर्व स्थलांतरित मजुरांना आंघोळीच्या वस्तू, रुमाल, भोजन, चादर अशा सर्व प्रकारच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू दिल्या जात आहे. तसेच या नागरिकांची वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणीही करण्यात येत असून त्यांचे समुपदेशनही केले जात आहे. या सोबतच मदतीमध्ये फळेदेखील येथे दिली जात आहे.मजुरांना धान्यऐवजी थेट भोजननिवारागृहात मजुरांना तयार जेवणच देण्यात येत आहे. या ठिकाणी प्रशासनातर्फे धान्य उपलब्ध करून देणार असले तरी सेवाभावी संस्थाच मोठ्या प्रमाणात अन्नधान्य व इतर वस्तू आणून देतात. त्यामुळे जळगावातील लाडवंजारी मंगल कार्यालयात स्वयंपाक करून तयार जेवण दिले जात आहे.प्रशासनाचे अपयशजळगाव शहरातील लाडवंजारी मंगल कार्यालयातून २९ एप्रिल रोजी सर्वच्या सर्व ४८ मजुरांनी सोबत पलायन केले. विशेष म्हणजे यात्रेकरू, विद्यार्थी, मजूर यांना गावी परतण्यासाठी सरकारने प्रवासाची परवानगी देण्यापूर्वीच मजुरांनी पलायन केले. या सोबतच कर्की फाटा, ता. मुक्ताईनगर येथील निवारागृहातूनदेखील ९० जणांनी पलायन केले.काय म्हणतात स्थलांतरित बांधव-घरासारखी काळजीनिवारागृहात राहत असलेले उत्तर प्रदेशातील विकास यादव म्हणाले की, आमच्या घरी जशी काळजी घेतली जाते, तशीच काळजी येथे घेत आहे. त्याबद्दल आम्ही जळगाव जिल्हा प्रशासन व विविध संस्था, मदत करणाºया व्यक्तींचे ऋणी असल्याचे ते म्हणाले.-आवश्यक गरजा होताहेत पूर्णकल्याण येथील जगदीश वानखेडे म्हणाले की, आम्हाला येथे आल्यापासून कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. आमच्या आवश्यक त्या सर्व गरजा पूर्ण होत आहे.-आनंदी आहोतघरात असताना जशी आपली काळजी घेतली जाते तशीच काळजी येथे घेतली जात आहे. आम्हाला येथे कशाचीही कमतरता पडत नसून आम्ही येथे आनंदी असल्याचे सुरज कुमार यांनी सांगितले. येथे जेवणाची कधी कमतरता भासली नाही.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव