शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शासनाच्या मदतीविना स्थलांतरितांची क्षुधा शांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:31 IST

बहुतांश मजूर परतले गावी : प्रवासाच्या परवानगी पूर्वीच १३८ मजुरांनी केले पलायन

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांसाठी जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या निवारागृहातील मजूर, कामगारांना आधार देण्यासाठी विविध सेवाभावी संस्था सरसावल्या व प्रशासनाच्या मदतीविना त्यांचे उदरभरण करण्यात आले. घरापासून कोसो दूर असताना पोटाची खळगी कशी भरणार या चिंतेत असतानाच आम्हाला विविध संस्थांनी मदत केल्याने आमची चिंता, मिटली, अशा भावनादेखील स्थलांतरितांनी व्यक्त केल्या. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील वेगवेगळ््या निवारागृहातील १३८ जणांनी पलायन केल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षाची अनुभूतीही या निमित्ताने आली.कोरोना विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये म्हणून सुरक्षिततेसाठी शासनाने लॉकडाउन जाहीर केले. यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांना काम नसल्याने त्यांनी आपापल्या गावी परतण्यास प्राधान्य दिले. जळगाव जिल्ह्याच्या सीमेवरदेखील पोलिसांनी हजारो नागरिकांवर कारवाई करून त्यांना जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या शासकीय निवारागृहामध्ये ठेवले. या निवारागृहात आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध आहे की नाही, या संदर्भात त्या पार्श्वभूमीवर भेट देऊन पाहणी केली असता या ठिकाणी प्रशासनाच्या मदतीपूर्वीच सेवाभावी संस्थांकडून मदत पुरविली जात असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे येथे दिल्या जाणाºया भोजन व इतर वस्तूंमुळे कशाचीही कमतरता भासत नसल्याचे स्थलांतरितांनी सांगितले.१३५२ स्थलांतरितांसाठी निवारागृहस्थलांतरित नागरिक व मजुरांसाठी जिल्हा प्रशासनाने जळगाव शहरात राधाकृष्ण मंगल कार्यालय, लाडवंजारी मंगल कार्यालय व गेंदालाल मिल गोडावून या तीन ठिकाणी तसेच कार्की फाटा, आरटीओ चेकपोस्ट हॉल, मुक्ताईनगर, पाचोरा, चाळीसगाव, चोपडा या ठिकाणी निवारागृह सुरु केले आहे. तर कामगार विभागानेही, भुसावळ, चोपडा आदी ६ ठिकाणी कामगारांसाठी निवारागृह सुरु केले आहे.शासकीय निवारागृहात ४४१ तर कामगार विभागाच्या निवारागृहात ९११ असे एकूण १३५२ स्थलांतरितांची सोय करण्यात आली आहे. शहरातील तीन निवारागृहामध्ये मध्यप्रदेशातील १११, उत्तरप्रदेशातील ७४, राजस्थानातील १४६ तर महाराष्ट्रातील ११० मजुरांचा समावेश आहे. लाडवंजारी मंगल कार्यालय, कर्की येथील निवारागृह येथे सेवाभावी संस्थांतर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आली.वेगवेगळ्या प्रकारची मदतनिवारागृहात असलेल्यांना सेवाभावी संस्था व लोकप्रतिनिधींच्या मदतीने त्यांच्या निवाºयाची, भोजनाची व इतर वस्तू देण्याची सोय केली जात आहे. या सर्व स्थलांतरित मजुरांना आंघोळीच्या वस्तू, रुमाल, भोजन, चादर अशा सर्व प्रकारच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू दिल्या जात आहे. तसेच या नागरिकांची वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणीही करण्यात येत असून त्यांचे समुपदेशनही केले जात आहे. या सोबतच मदतीमध्ये फळेदेखील येथे दिली जात आहे.मजुरांना धान्यऐवजी थेट भोजननिवारागृहात मजुरांना तयार जेवणच देण्यात येत आहे. या ठिकाणी प्रशासनातर्फे धान्य उपलब्ध करून देणार असले तरी सेवाभावी संस्थाच मोठ्या प्रमाणात अन्नधान्य व इतर वस्तू आणून देतात. त्यामुळे जळगावातील लाडवंजारी मंगल कार्यालयात स्वयंपाक करून तयार जेवण दिले जात आहे.प्रशासनाचे अपयशजळगाव शहरातील लाडवंजारी मंगल कार्यालयातून २९ एप्रिल रोजी सर्वच्या सर्व ४८ मजुरांनी सोबत पलायन केले. विशेष म्हणजे यात्रेकरू, विद्यार्थी, मजूर यांना गावी परतण्यासाठी सरकारने प्रवासाची परवानगी देण्यापूर्वीच मजुरांनी पलायन केले. या सोबतच कर्की फाटा, ता. मुक्ताईनगर येथील निवारागृहातूनदेखील ९० जणांनी पलायन केले.काय म्हणतात स्थलांतरित बांधव-घरासारखी काळजीनिवारागृहात राहत असलेले उत्तर प्रदेशातील विकास यादव म्हणाले की, आमच्या घरी जशी काळजी घेतली जाते, तशीच काळजी येथे घेत आहे. त्याबद्दल आम्ही जळगाव जिल्हा प्रशासन व विविध संस्था, मदत करणाºया व्यक्तींचे ऋणी असल्याचे ते म्हणाले.-आवश्यक गरजा होताहेत पूर्णकल्याण येथील जगदीश वानखेडे म्हणाले की, आम्हाला येथे आल्यापासून कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. आमच्या आवश्यक त्या सर्व गरजा पूर्ण होत आहे.-आनंदी आहोतघरात असताना जशी आपली काळजी घेतली जाते तशीच काळजी येथे घेतली जात आहे. आम्हाला येथे कशाचीही कमतरता पडत नसून आम्ही येथे आनंदी असल्याचे सुरज कुमार यांनी सांगितले. येथे जेवणाची कधी कमतरता भासली नाही.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव