शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

शासनाच्या मदतीविना स्थलांतरितांची क्षुधा शांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:31 IST

बहुतांश मजूर परतले गावी : प्रवासाच्या परवानगी पूर्वीच १३८ मजुरांनी केले पलायन

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांसाठी जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या निवारागृहातील मजूर, कामगारांना आधार देण्यासाठी विविध सेवाभावी संस्था सरसावल्या व प्रशासनाच्या मदतीविना त्यांचे उदरभरण करण्यात आले. घरापासून कोसो दूर असताना पोटाची खळगी कशी भरणार या चिंतेत असतानाच आम्हाला विविध संस्थांनी मदत केल्याने आमची चिंता, मिटली, अशा भावनादेखील स्थलांतरितांनी व्यक्त केल्या. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील वेगवेगळ््या निवारागृहातील १३८ जणांनी पलायन केल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षाची अनुभूतीही या निमित्ताने आली.कोरोना विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये म्हणून सुरक्षिततेसाठी शासनाने लॉकडाउन जाहीर केले. यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांना काम नसल्याने त्यांनी आपापल्या गावी परतण्यास प्राधान्य दिले. जळगाव जिल्ह्याच्या सीमेवरदेखील पोलिसांनी हजारो नागरिकांवर कारवाई करून त्यांना जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या शासकीय निवारागृहामध्ये ठेवले. या निवारागृहात आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध आहे की नाही, या संदर्भात त्या पार्श्वभूमीवर भेट देऊन पाहणी केली असता या ठिकाणी प्रशासनाच्या मदतीपूर्वीच सेवाभावी संस्थांकडून मदत पुरविली जात असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे येथे दिल्या जाणाºया भोजन व इतर वस्तूंमुळे कशाचीही कमतरता भासत नसल्याचे स्थलांतरितांनी सांगितले.१३५२ स्थलांतरितांसाठी निवारागृहस्थलांतरित नागरिक व मजुरांसाठी जिल्हा प्रशासनाने जळगाव शहरात राधाकृष्ण मंगल कार्यालय, लाडवंजारी मंगल कार्यालय व गेंदालाल मिल गोडावून या तीन ठिकाणी तसेच कार्की फाटा, आरटीओ चेकपोस्ट हॉल, मुक्ताईनगर, पाचोरा, चाळीसगाव, चोपडा या ठिकाणी निवारागृह सुरु केले आहे. तर कामगार विभागानेही, भुसावळ, चोपडा आदी ६ ठिकाणी कामगारांसाठी निवारागृह सुरु केले आहे.शासकीय निवारागृहात ४४१ तर कामगार विभागाच्या निवारागृहात ९११ असे एकूण १३५२ स्थलांतरितांची सोय करण्यात आली आहे. शहरातील तीन निवारागृहामध्ये मध्यप्रदेशातील १११, उत्तरप्रदेशातील ७४, राजस्थानातील १४६ तर महाराष्ट्रातील ११० मजुरांचा समावेश आहे. लाडवंजारी मंगल कार्यालय, कर्की येथील निवारागृह येथे सेवाभावी संस्थांतर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आली.वेगवेगळ्या प्रकारची मदतनिवारागृहात असलेल्यांना सेवाभावी संस्था व लोकप्रतिनिधींच्या मदतीने त्यांच्या निवाºयाची, भोजनाची व इतर वस्तू देण्याची सोय केली जात आहे. या सर्व स्थलांतरित मजुरांना आंघोळीच्या वस्तू, रुमाल, भोजन, चादर अशा सर्व प्रकारच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू दिल्या जात आहे. तसेच या नागरिकांची वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणीही करण्यात येत असून त्यांचे समुपदेशनही केले जात आहे. या सोबतच मदतीमध्ये फळेदेखील येथे दिली जात आहे.मजुरांना धान्यऐवजी थेट भोजननिवारागृहात मजुरांना तयार जेवणच देण्यात येत आहे. या ठिकाणी प्रशासनातर्फे धान्य उपलब्ध करून देणार असले तरी सेवाभावी संस्थाच मोठ्या प्रमाणात अन्नधान्य व इतर वस्तू आणून देतात. त्यामुळे जळगावातील लाडवंजारी मंगल कार्यालयात स्वयंपाक करून तयार जेवण दिले जात आहे.प्रशासनाचे अपयशजळगाव शहरातील लाडवंजारी मंगल कार्यालयातून २९ एप्रिल रोजी सर्वच्या सर्व ४८ मजुरांनी सोबत पलायन केले. विशेष म्हणजे यात्रेकरू, विद्यार्थी, मजूर यांना गावी परतण्यासाठी सरकारने प्रवासाची परवानगी देण्यापूर्वीच मजुरांनी पलायन केले. या सोबतच कर्की फाटा, ता. मुक्ताईनगर येथील निवारागृहातूनदेखील ९० जणांनी पलायन केले.काय म्हणतात स्थलांतरित बांधव-घरासारखी काळजीनिवारागृहात राहत असलेले उत्तर प्रदेशातील विकास यादव म्हणाले की, आमच्या घरी जशी काळजी घेतली जाते, तशीच काळजी येथे घेत आहे. त्याबद्दल आम्ही जळगाव जिल्हा प्रशासन व विविध संस्था, मदत करणाºया व्यक्तींचे ऋणी असल्याचे ते म्हणाले.-आवश्यक गरजा होताहेत पूर्णकल्याण येथील जगदीश वानखेडे म्हणाले की, आम्हाला येथे आल्यापासून कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. आमच्या आवश्यक त्या सर्व गरजा पूर्ण होत आहे.-आनंदी आहोतघरात असताना जशी आपली काळजी घेतली जाते तशीच काळजी येथे घेतली जात आहे. आम्हाला येथे कशाचीही कमतरता पडत नसून आम्ही येथे आनंदी असल्याचे सुरज कुमार यांनी सांगितले. येथे जेवणाची कधी कमतरता भासली नाही.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव