शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
2
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
3
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
4
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
5
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
6
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
7
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
8
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
9
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
10
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का
11
भारताला रामराम? पुष्कर जोग झाला UAEचा 'गोल्डन व्हिसा'धारक, म्हणाला, "माझ्या मुलीच्या..."
12
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
13
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
14
VIDEO: टीम इंडियातील ब्युटीची 'मन की बात'; थेट PM मोदींना Skin Care Routine संदर्भातील प्रश्न
15
‘वंदे मातरम्’ गीताला 150 वर्षे पूर्ण; देशभरात कार्यक्रमांचे आयोजन, गैर-इस्लामी म्हणत 'या' संघटनेचा विरोध
16
विश्वविजेत्या कन्यांचं Tata कडून खास सेलिब्रेशन...; संघातील प्रत्येक खेळाडूला देणार Sierra एसयूव्ही गिफ्ट! खास आहेत फीचर्स
17
खळबळजनक! कर्ज घेतलं, हुंड्याची प्रत्येक मागणी पूर्ण, तरी...; लेकीचा मृतदेह पाहून बापाचा टाहो
18
भारतीय महिला ‘वर्ल्ड चॅम्पियन’ कशा बनल्या? अमोल मुझुमदारांनी PM मोदींना सांगितली Untold Story
19
Numerology: प्रत्येक स्त्री ही गृहलक्ष्मी असते; पण 'या' जन्मतारखेची स्त्री ठरते 'भाग्यलक्ष्मी'!
20
Physicswallah Ltd IPO: IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी

शासनाच्या मदतीविना स्थलांतरितांची क्षुधा शांती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 12:31 IST

बहुतांश मजूर परतले गावी : प्रवासाच्या परवानगी पूर्वीच १३८ मजुरांनी केले पलायन

जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परप्रांतीयांसाठी जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या निवारागृहातील मजूर, कामगारांना आधार देण्यासाठी विविध सेवाभावी संस्था सरसावल्या व प्रशासनाच्या मदतीविना त्यांचे उदरभरण करण्यात आले. घरापासून कोसो दूर असताना पोटाची खळगी कशी भरणार या चिंतेत असतानाच आम्हाला विविध संस्थांनी मदत केल्याने आमची चिंता, मिटली, अशा भावनादेखील स्थलांतरितांनी व्यक्त केल्या. मात्र दुसरीकडे जिल्ह्यातील वेगवेगळ््या निवारागृहातील १३८ जणांनी पलायन केल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षाची अनुभूतीही या निमित्ताने आली.कोरोना विषाणूची लागण नागरिकांना होऊ नये म्हणून सुरक्षिततेसाठी शासनाने लॉकडाउन जाहीर केले. यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांना काम नसल्याने त्यांनी आपापल्या गावी परतण्यास प्राधान्य दिले. जळगाव जिल्ह्याच्या सीमेवरदेखील पोलिसांनी हजारो नागरिकांवर कारवाई करून त्यांना जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या शासकीय निवारागृहामध्ये ठेवले. या निवारागृहात आवश्यक त्या सोयीसुविधा उपलब्ध आहे की नाही, या संदर्भात त्या पार्श्वभूमीवर भेट देऊन पाहणी केली असता या ठिकाणी प्रशासनाच्या मदतीपूर्वीच सेवाभावी संस्थांकडून मदत पुरविली जात असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे येथे दिल्या जाणाºया भोजन व इतर वस्तूंमुळे कशाचीही कमतरता भासत नसल्याचे स्थलांतरितांनी सांगितले.१३५२ स्थलांतरितांसाठी निवारागृहस्थलांतरित नागरिक व मजुरांसाठी जिल्हा प्रशासनाने जळगाव शहरात राधाकृष्ण मंगल कार्यालय, लाडवंजारी मंगल कार्यालय व गेंदालाल मिल गोडावून या तीन ठिकाणी तसेच कार्की फाटा, आरटीओ चेकपोस्ट हॉल, मुक्ताईनगर, पाचोरा, चाळीसगाव, चोपडा या ठिकाणी निवारागृह सुरु केले आहे. तर कामगार विभागानेही, भुसावळ, चोपडा आदी ६ ठिकाणी कामगारांसाठी निवारागृह सुरु केले आहे.शासकीय निवारागृहात ४४१ तर कामगार विभागाच्या निवारागृहात ९११ असे एकूण १३५२ स्थलांतरितांची सोय करण्यात आली आहे. शहरातील तीन निवारागृहामध्ये मध्यप्रदेशातील १११, उत्तरप्रदेशातील ७४, राजस्थानातील १४६ तर महाराष्ट्रातील ११० मजुरांचा समावेश आहे. लाडवंजारी मंगल कार्यालय, कर्की येथील निवारागृह येथे सेवाभावी संस्थांतर्फे भोजनाची व्यवस्था करण्यात आली.वेगवेगळ्या प्रकारची मदतनिवारागृहात असलेल्यांना सेवाभावी संस्था व लोकप्रतिनिधींच्या मदतीने त्यांच्या निवाºयाची, भोजनाची व इतर वस्तू देण्याची सोय केली जात आहे. या सर्व स्थलांतरित मजुरांना आंघोळीच्या वस्तू, रुमाल, भोजन, चादर अशा सर्व प्रकारच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू दिल्या जात आहे. तसेच या नागरिकांची वैद्यकीय पथकामार्फत आरोग्य तपासणीही करण्यात येत असून त्यांचे समुपदेशनही केले जात आहे. या सोबतच मदतीमध्ये फळेदेखील येथे दिली जात आहे.मजुरांना धान्यऐवजी थेट भोजननिवारागृहात मजुरांना तयार जेवणच देण्यात येत आहे. या ठिकाणी प्रशासनातर्फे धान्य उपलब्ध करून देणार असले तरी सेवाभावी संस्थाच मोठ्या प्रमाणात अन्नधान्य व इतर वस्तू आणून देतात. त्यामुळे जळगावातील लाडवंजारी मंगल कार्यालयात स्वयंपाक करून तयार जेवण दिले जात आहे.प्रशासनाचे अपयशजळगाव शहरातील लाडवंजारी मंगल कार्यालयातून २९ एप्रिल रोजी सर्वच्या सर्व ४८ मजुरांनी सोबत पलायन केले. विशेष म्हणजे यात्रेकरू, विद्यार्थी, मजूर यांना गावी परतण्यासाठी सरकारने प्रवासाची परवानगी देण्यापूर्वीच मजुरांनी पलायन केले. या सोबतच कर्की फाटा, ता. मुक्ताईनगर येथील निवारागृहातूनदेखील ९० जणांनी पलायन केले.काय म्हणतात स्थलांतरित बांधव-घरासारखी काळजीनिवारागृहात राहत असलेले उत्तर प्रदेशातील विकास यादव म्हणाले की, आमच्या घरी जशी काळजी घेतली जाते, तशीच काळजी येथे घेत आहे. त्याबद्दल आम्ही जळगाव जिल्हा प्रशासन व विविध संस्था, मदत करणाºया व्यक्तींचे ऋणी असल्याचे ते म्हणाले.-आवश्यक गरजा होताहेत पूर्णकल्याण येथील जगदीश वानखेडे म्हणाले की, आम्हाला येथे आल्यापासून कोणतीही अडचण निर्माण झाली नाही. आमच्या आवश्यक त्या सर्व गरजा पूर्ण होत आहे.-आनंदी आहोतघरात असताना जशी आपली काळजी घेतली जाते तशीच काळजी येथे घेतली जात आहे. आम्हाला येथे कशाचीही कमतरता पडत नसून आम्ही येथे आनंदी असल्याचे सुरज कुमार यांनी सांगितले. येथे जेवणाची कधी कमतरता भासली नाही.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव