शहरं
Join us  
Trending Stories
1
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
2
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
3
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
4
शेख हसीना यांना शिक्षा सुनावल्यानंतर ढाक्यामध्ये हिंसाचार उसळला, युनूस सरकार 'अ‍ॅक्शन'मोडवर; परिस्थिती बिघडली
5
आता तरी घ्या रे! ऋतुराज गायकवाडचा मोठा पराक्रम; पुजाराला मागे टाकत ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
6
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
7
त्याने आरडाओरड केली, पण तिला जराही दया आली नाही! नवऱ्याला घरात कोंडून बायकोने लावली आग
8
धनंजय मुंडेंच्या पापांमध्ये फडणवीस का सहभागी होताहेत? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
9
आबा-काका गटामधील उमेदवारीचा सस्पेन्स आज अखेरच्या दिवशी संपणार;'बी' फॉर्म ठरवणार नगराध्यक्ष पदाचा उमेदवार, काका गट रिंगणात
10
अपघात, रोग आणि चिंता होईल दूर! फक्त करा प्रेमानंद महाराजांनी सांगितलेले ५ 'रामबाण' उपाय
11
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
12
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
13
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
14
शिराळ्यात नाईक विरुद्ध नाईक चुलत भावांमध्ये लढत! केदार नलवडे रिंगणात; तिरंगी सामन्यात कोण मारणार बाजी ?
15
'ऑपरेशन सिंदूर' हा फक्त ट्रेलर होता', लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला उघड इशारा, दिल्ली स्फोटानंतर लष्कर सज्ज
16
नुसती ढकलाढकली, मेट्रो जोडणीमुळे घाटकोपर स्टेशन ठरले गर्दीचे 'हॉटस्पॉट'!
17
मोबाईलवर मिनिटांत तपासा तुमचा NPS बॅलन्स; पाहा NSDL, उमंग ॲप आणि मिस्ड कॉलची सोपी पद्धत
18
फलटणमध्ये महायुतीतच 'खेळ'! शिंदेंच्या शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा, भाजपाकडून माजी खासदारांचा भाऊ मैदानात
19
कमाल! नोकरीसोबतच घराचीही जबाबदारी, ६ वेळा नापास; २ मुलींची आई ४० व्या वर्षी झाली IAS
20
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
Daily Top 2Weekly Top 5

व्यापारी वर्गावर कृपादृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:30 IST

विजयकुमार सैतवाल जळगाव : सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापाऱ्यांच्या दृष्टीने हिताचा निर्णय घेत त्यांना ...

विजयकुमार सैतवालजळगाव : सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापाऱ्यांच्या दृष्टीने हिताचा निर्णय घेत त्यांना दर महा ३ हजार रुपये किमान निवृत्तीवेतन देण्याची घोषणा करण्यासह त्या पाठोपाठ आरटीजीएस व एनईएपटी नि:शुल्क केल्याने व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. व्यापाºयांबाबत सकारात्मक निर्णय सरकार घेत असल्याने व्यापारी धोरण मवाळ राहणार अशी अपेक्षा केली जात आहे.सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यापाºयांच्या दृष्टीने हिताचा निर्णय घेत त्यांना दर महा ३ हजार रुपये किमान निवृत्तीवेतन देण्याची घोषणा केल्याने व्यापारी वर्गातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. यामुळे व्यापाºयांना वृद्धापकाळी आर्थिक सुरक्षा मिळून उदरनिर्वाहाची शाश्वती मिळाली आहे, असा सूर उमटत आहे. या सोबतच शपथविधी सोहळ््यातही विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाºयांना स्थान दिल्याने व्यापार क्षेत्रात सुगीचे दिवस येतील, असा विश्वासही व्यक्त होत आहे.देशाच्या आर्थिक विकासात व्यापाºयांचे मोठे योगदान असल्याने त्यांच्या हिताच्या निर्णयाबाबत व्यापारी बांधव सरकारकडून मोठ्या अपेक्षा करीत आहे. त्यात व्यापाºयांना निवृत्ती वेतन मिळावे यासह इतरही मागण्या कॉन्फडरेशन आॅल इंडिया ट्रेडर्स (कैट) या संघटनेच्यावतीने करण्यात आल्या होत्या. त्यातील निवृत्तीवेतनाच्या मागणीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने सकारात्मक निर्णय घेत व्यापारी समुदायाला निवृत्तीवेतनाच्या कक्षेत आणणाºया नवीन योजनेला मंजुरी दिली.या पूर्वी व्यापारी, छोटे आणि मध्यम उद्योजक यांच्या कल्याणासाठी घेण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे व्यापाºयांचे म्हणणे आहे. व्यापारी समुदायाचा प्रतिसाद लक्षात घेऊन जीएसटी दरात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले होते. आता निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सर्व दुकानदार, किरकोळ व्यापारी आणि स्वयंरोजगारी व्यक्तींना वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर दर महा ३ हजार रुपये किमान निवृत्तीवेतनाची हमी मिळाली असल्याचे व्यापारनगरी जळगावातून त्याचे स्वागत होत आहे.नवीन सरकारने व्यापारी वर्गास शपथविधीपासूनच मानाचे स्थान दिले असल्याचा उल्लेखही व्यापारी बांधवांनी केला. यात कॉन्फडरेशन आॅल इंडिया ट्रेडर्स (कैट)चे राष्ट्रीय अध्यक्ष बी.सी. भारतीय, सचिव प्रवीण खंडेलवाल, फेडरेशन आॅफ असोसिएशन आॅफ महाराष्ट्रचे (फॅम) अध्यक्ष विनेष मेहता, सचिव आशीष मेहता यांना शपथविथी सोहळ््यास निमंत्रित केले होते. त्यामुळे व्यापार क्षेत्रात नक्कीच सुगीचे दिवस येतील, असे व्यापारी बांधवांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव