शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

जळगाव पालिकेचे खुले नाट्यगृह जपतेय बालगंधर्वांच्या ऋणानुबंधाच्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 12:26 IST

विशेष परवानगीसाठी शासनाकडे पाठपुराव्याची गरज

जळगाव : एफएसआयअभावी बालगंधर्व खुल्या नाट्यगृहाचे बंदीस्तीकरण रखडले आहे. जळगावातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून बालगंधर्वांच्या जळगावशी ऋणानुबंधाच्या आठवणी जपण्यासाठी हे खुले नाट्यगृह बंदिस्त करावे, अशी अपेक्षा रसिकांकडून व्यक्त होत आहे.नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व जळगावात त्यांच्या शास्त्रीय संगीत शिक्षणाचा पाया घातला गेला. जळगावातील उस्ताद मेहबूब खान हे त्यांचे पहिले गुरू. बालगंधर्व म्हणून ते नटसम्राट पदाला पोहोचल्यावरही जळगावला आवर्जून भेट देत. जळगावला १९०७मध्ये भरलेल्या पहिल्या कविसंमेलनालाही ते उपस्थित होते.पालिकेने जपल्या आठवणीबालगंधर्वांच्या या आठवणी जपण्यासाठी त्यांच्याच नावाने ‘बालगंधर्व खुले नाट्यगृह’ तत्कालीन नगरपालिकेने उभारले. त्याचा कोनशिला शुभारंभ २१ सप्टेंबर १९६० रोजी राज्याचे तत्कालीन महसूल उपमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते झाला. यावेळी पालिकेचे अध्यक्ष जयवंतराव खंडेराव पाटील, उपाध्यक्ष सुकदेवराव गणपतराव यादव उपस्थित होते.तर २९ जानेवारी १९६१ मध्ये या खुल्या नाट्यगृहाचे उद्घाटन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी तत्कालीन नगराध्यक्ष बाजीराव भगुलाल श्रावगी, उपाध्यक्ष काशिनाथ हरी कोळी, पालिका अभियंता एन.के. बोंडे उपस्थित असल्याचे कोनशिलेवर नमूद आहे.अडचण काय?निविदा न येण्याचे कारण म्हणजेच ठेकेदाराला गुंतवणुकीच्या बदल्यात परतावा मिळण्याची शाश्वती काय? हे आहे.बंदीस्त करण्याचा संकल्प अपूर्णचत्यानंतर या खुल्या नाट्यगृहाचे बंदिस्त नाट्यगृहात रूपांतर करण्याचा निर्णय १९८८ मध्ये बालगंधर्व शताब्दी सोहळ्याप्रसंगी घेण्यात आला. बालगंधर्व खुले नाट्यगृह व नवीन बी.जे. मार्केटचा सर्व्हे क्रमांक एकच असल्याने व एफएसआय बी.जे. मार्केटसाठी वापरला गेल्याने हे खुले नाट्यगृह बंदिस्त करण्यासाठी नगररचना विभागाची परवानगी मिळणे अशक्य असल्याने हे काम रखडले. हे काम बीओटी तत्वावर देखील होणे अशक्य असल्याचे चित्र आहे.विशेष बाब म्हणून परवानगी आवश्यकअपुऱ्या एफएसआय अभावी नाटयगृह बदिस्त करण्याचे काम रखडले असून बीओटी तत्त्वावरदेखील हे काम होणे अशक्य असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अन्य पर्याय न सापडल्यास शासनाने विशेष बाब म्हणून मंजुरी देऊन हे काम मार्गी लागू शकेल. यासाठी पाठपुरावा करून बालगंधर्वांच्या जळगावशी ऋणानुबंधाच्या आठवणी जपण्यासाठी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव