शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

जळगाव पालिकेचे खुले नाट्यगृह जपतेय बालगंधर्वांच्या ऋणानुबंधाच्या आठवणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 12:26 IST

विशेष परवानगीसाठी शासनाकडे पाठपुराव्याची गरज

जळगाव : एफएसआयअभावी बालगंधर्व खुल्या नाट्यगृहाचे बंदीस्तीकरण रखडले आहे. जळगावातील लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा करून बालगंधर्वांच्या जळगावशी ऋणानुबंधाच्या आठवणी जपण्यासाठी हे खुले नाट्यगृह बंदिस्त करावे, अशी अपेक्षा रसिकांकडून व्यक्त होत आहे.नारायण श्रीपाद राजहंस म्हणजेच बालगंधर्व जळगावात त्यांच्या शास्त्रीय संगीत शिक्षणाचा पाया घातला गेला. जळगावातील उस्ताद मेहबूब खान हे त्यांचे पहिले गुरू. बालगंधर्व म्हणून ते नटसम्राट पदाला पोहोचल्यावरही जळगावला आवर्जून भेट देत. जळगावला १९०७मध्ये भरलेल्या पहिल्या कविसंमेलनालाही ते उपस्थित होते.पालिकेने जपल्या आठवणीबालगंधर्वांच्या या आठवणी जपण्यासाठी त्यांच्याच नावाने ‘बालगंधर्व खुले नाट्यगृह’ तत्कालीन नगरपालिकेने उभारले. त्याचा कोनशिला शुभारंभ २१ सप्टेंबर १९६० रोजी राज्याचे तत्कालीन महसूल उपमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते झाला. यावेळी पालिकेचे अध्यक्ष जयवंतराव खंडेराव पाटील, उपाध्यक्ष सुकदेवराव गणपतराव यादव उपस्थित होते.तर २९ जानेवारी १९६१ मध्ये या खुल्या नाट्यगृहाचे उद्घाटन राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. यावेळी तत्कालीन नगराध्यक्ष बाजीराव भगुलाल श्रावगी, उपाध्यक्ष काशिनाथ हरी कोळी, पालिका अभियंता एन.के. बोंडे उपस्थित असल्याचे कोनशिलेवर नमूद आहे.अडचण काय?निविदा न येण्याचे कारण म्हणजेच ठेकेदाराला गुंतवणुकीच्या बदल्यात परतावा मिळण्याची शाश्वती काय? हे आहे.बंदीस्त करण्याचा संकल्प अपूर्णचत्यानंतर या खुल्या नाट्यगृहाचे बंदिस्त नाट्यगृहात रूपांतर करण्याचा निर्णय १९८८ मध्ये बालगंधर्व शताब्दी सोहळ्याप्रसंगी घेण्यात आला. बालगंधर्व खुले नाट्यगृह व नवीन बी.जे. मार्केटचा सर्व्हे क्रमांक एकच असल्याने व एफएसआय बी.जे. मार्केटसाठी वापरला गेल्याने हे खुले नाट्यगृह बंदिस्त करण्यासाठी नगररचना विभागाची परवानगी मिळणे अशक्य असल्याने हे काम रखडले. हे काम बीओटी तत्वावर देखील होणे अशक्य असल्याचे चित्र आहे.विशेष बाब म्हणून परवानगी आवश्यकअपुऱ्या एफएसआय अभावी नाटयगृह बदिस्त करण्याचे काम रखडले असून बीओटी तत्त्वावरदेखील हे काम होणे अशक्य असल्याचे चित्र आहे. त्यामुळे अन्य पर्याय न सापडल्यास शासनाने विशेष बाब म्हणून मंजुरी देऊन हे काम मार्गी लागू शकेल. यासाठी पाठपुरावा करून बालगंधर्वांच्या जळगावशी ऋणानुबंधाच्या आठवणी जपण्यासाठी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव