शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

भुसावळातील धम्म चळवळीचे केंद्र मैत्रीसागर बुद्धविहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 16:42 IST

भुसावळ शहरातील येथे शिवाजी नगरातील आजच्या मैैत्रीसागर बुद्धविहारास धम्म चळवळीचे ऐतिहासिक केंद्र म्हणून ओळखले जाते.

ठळक मुद्देडॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिली होती भेटधम्मकार्यासाठी देणगी स्वरूपात वर्गणी केली होती गोळा

भुसावळ, जि.जळगाव : शहरातील येथे शिवाजी नगरातील आजच्या मैैत्रीसागर बुद्धविहारास धम्म चळवळीचे ऐतिहासिक केंद्र म्हणून ओळखले जाते.१९५६ साली डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर केल्यानंतर त्या काळातील या भागातील बौद्ध लोक बौद्ध धम्म प्रचारकार्य या ठिकाणाहून करू लागले. याच काळात डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महान मठांमध्ये आले होते आणि येथील लोकांनी बाबासाहेबांना धम्मकार्यासाठी देणगी स्वरूपात वर्गणी गोळा करून दिली होती. काही ज्येष्ठ, जुन्या-जाणत्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार, नसरवानजी फाईल नागसेन वार्ड या ठिकाणी सभा झाली होती. त्या वेळेस धोंडीबा चोेैतमोल यांच्या मालकीची जागा २१-१०-१९५९ बक्षीस म्हणून देऊन बुद्ध आश्रम या नावाने ओळखली जाऊ लागली होती. त्या काळास कौलारू छताचे गळके बुद्धमंदिर होते. पावसाच्या पाण्याने आत पाणी गळत होते. तेव्हा दौलतराव हिंगणे यांनी बुद्ध आश्रमास लोखंडी पत्रे दान करून मोलाची मदत केली होती. पुढील दोन वर्षांनी राजस्थान येथून संगमरवरी आकर्षक बुद्ध मूर्ती स्थापन करण्यात आली होती.१९९६-९७ या काळमध्ये या भागातील तरुण मुलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेऊन धरती बौद्ध समाज संस्था या संस्थेची स्थापना केली. संस्थापक अध्यक्ष सुनील गायकवाड व सहकारी मित्रमंडळींच्या परिश्रमातून विहाराच्या नूतनीकरणास सुरुवात झाली. तेव्हापासून या बुद्ध आश्रमास मैत्रीसागर बुद्ध विहार असे नाव देण्यात आले व विहार बांधकाम सुरू झाले. धोंडीराम चोेैतमोल यांची मुले सुरेश चोेैतमोल व महेंद्र चौतमोल यांनी आपल्या राहत्या घरावरील गच्ची ताबा विहाराचा विस्तार करण्यासाठी देण्याचे कबूल केले. तेव्हा समाजातील पुढारी व समाजसेवक यांनी मोठ्या स्वरूपात रोख व साहित्य दिले. २००२ पासून अध्यक्षपद नरेश गडवे यांच्याकडे आले. तेव्हा बांधकामास वेग आला व सर्वधर्मातील मित्रमंडळाच्या सहकार्याने दोन मजले पूर्ण करण्यात आले. नरेश गडवे यांच्या कारकीर्दीतील सहकारी प्रमोद निळे हे आजतागायात विहार व्यवस्थापक म्हणून कार्यरत करीत आहे.आज मैत्रीसागर बुद्धविहार अनेक सामाजिक कार्य करीत आहे. महिला मंडळाचा सर्वाधिक सहभाग असलेल्या मैत्रीसागर आज धम्मप्रचार प्रसार कार्यासह दर रविवारी व दर पौर्णिमेस वंदना कार्यक्रम, खीरदान महापुरुषांची जयंती साजरी करण्यात येते. तसेच योगावर्ग, ध्यान वर्ग, अभ्यासिका ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असे अनेक प्रकारचे समाजोपयोगी कार्य केले जात आहे. धार्मिक व सांस्कृतिक कार्यासह या ठिकाणी पर्यावरणविषयक जनजागृती अभियान अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांद्वारे पथनाट्याच्या माध्यमातून आरोग्यविषयक जनजागृती करणे असे अनेक प्रकारचे उपक्रम राबविले जात आहेत. या सर्व कार्यासाठी परिसरातील समाजबांधवांचा सहभाग महत्त्वाचा आहे. त्यांच्या आर्थिक मदतीवर आज मैत्रीसागर बुद्धविहार विविध प्रकारे लोकहिताचे कार्य अग्रक्रमाने करीत आहे. विहारास अनेक मान्यवर येथील कार्याचे कौतुक करण्यासाठी भेटी देत असतात. भिक्खूंचा वावर असतो. 

टॅग्स :SocialसामाजिकBhusawalभुसावळ