शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
4
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
5
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
6
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
7
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
8
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
9
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
10
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
11
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
12
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
13
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
14
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
15
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
16
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
17
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
18
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
19
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
20
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले

जळगावच्या बाजारात नवीन उडीद, मुगाची आवक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 12:47 IST

विजयकुमार सैतवालजळगाव : जळगावच्या बाजारपेठेत नवीन उडीद मुगाची आवक सुरू झाली असून चांगल्या मालाला व्यापाऱ्यांकडून भाव मिळत असला तरी शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. शेवटच्या टप्प्यात पावसाची आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने उडीद व मुगाच्या दर्जावर परिणाम झाला असून त्या मालाला मात्र योग्य भाव मिळत नसल्याचे ...

विजयकुमार सैतवालजळगाव : जळगावच्याबाजारपेठेत नवीन उडीद मुगाची आवक सुरू झाली असून चांगल्या मालाला व्यापाऱ्यांकडून भाव मिळत असला तरी शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. शेवटच्या टप्प्यात पावसाची आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने उडीद व मुगाच्या दर्जावर परिणाम झाला असून त्या मालाला मात्र योग्य भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, गहू, तांदूळ, डाळ यांना या आठवड्यात मागणी वाढली असली तरी त्यांचे भाव आठवडाभरापासून स्थिर आहे.सप्टेंबर महिन्यापासून बाजारात नवीन उडीद, मुगाची आवक सुरू होते. त्यानुसार यंदाही ही आवक सुरू झाली असून दररोज प्रत्येकी २५० ते ३०० क्ंिवटल उडीद व मुगाची आवक सुरू आहे. मात्र मुगाला शेवटच्या टप्प्यात आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने मुगाच्या दर्जावर परिणाम झाला आहे. काही माल बारीक असल्याने तर काही माल डागी असल्याने अशा मुगाला ३२०० ते ४००० रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. अशाच प्रकारे उडीदालाही २८०० ते ३००० रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. चांगल्या दर्जाच्या मुगाला ५००० ते ५२०० तर चांगल्या दर्जाच्या उडिदाला ४००० रुपये प्रती क्विंटल असा भाव मिळत आहे. जळगावच्या बाजारपेठेत जळगाव, धरणगाव तालुक्यासह अहमदनगर, चिखली, मेहकर, अकोला या भागातून मुगाची आवक होत आहे. उडिदाची जळगाव जिल्ह्यासह विदर्भ, कर्नाटकातून आवक सुरू आहे.शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षाभाद्रपद महिना सुरू झाल्याने उन्हाचाही चटका वाढला असून उडीद-मुगाची आवक चांगल्या प्रकारे सुरू झाली आहे. असे असले तरी बºयाच शेतकºयांनी आपला माल बाजारात न आणता ते शासकीय हमी भाव केंद्र सुरू करण्याची प्रतीक्षा करीत आहे. या केंद्रावर शासनाने जाहीर केलेला हमी भाव मिळण्याची आशा शेतकºयांना आहे. मात्र बराच माल डागी व बारीक असल्याने प्रतवारीनुसार शासकीय खरेदी केंद्रावर तो खरेदी केला जातो की नाही व त्यास योग्य भाव मिळतो की नाही याची चिंता शेतकºयांना लागून आहे.गहू, तांदूळ, डाळी स्थिरगेल्या आठवड्याच्या तुलनेत धान्याला मागणी वाढली असून मागणीनुसार धान्याची आवक सुरू असल्याने धान्य व डाळींचे भाव स्थिर आहेत. १४७ गहू २४०० ते २५०० रुपयांवर स्थिर असून लोकवन गव्हाचे भाव २३०० ते २४०० रुपये, शरबती गहू २५०० ते २६०० रुपये आणि चंदोसीचे भाव ३६०० ते ३८०० रुपयांवर स्थिर आहेत. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू आहे. तांदुळाचे भावदेखील स्थिर आहेत. नवीन उडीद व मुगाची आवक सुरू झाल्याने डाळींचे भाव कमी होतात की काय याकडे लक्ष लागून होते. मात्र आवक सुरू झाली असली तरी डाळींचे भाव स्थिर आहे. बाजारपेठेत मुगाची डाळ ६६ ते ७० रुपये प्रती किलोवर स्थिर असून उडीद डाळ ४८ ते ५२ रुपये प्रती किलो, तूरडाळ - ५६ ते ६० आणि हरभरा डाळ ४८ ते ५२ रुपये प्रती किलोने विक्री होत आहे.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव