शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

जळगावच्या बाजारात नवीन उडीद, मुगाची आवक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 12:47 IST

विजयकुमार सैतवालजळगाव : जळगावच्या बाजारपेठेत नवीन उडीद मुगाची आवक सुरू झाली असून चांगल्या मालाला व्यापाऱ्यांकडून भाव मिळत असला तरी शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. शेवटच्या टप्प्यात पावसाची आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने उडीद व मुगाच्या दर्जावर परिणाम झाला असून त्या मालाला मात्र योग्य भाव मिळत नसल्याचे ...

विजयकुमार सैतवालजळगाव : जळगावच्याबाजारपेठेत नवीन उडीद मुगाची आवक सुरू झाली असून चांगल्या मालाला व्यापाऱ्यांकडून भाव मिळत असला तरी शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. शेवटच्या टप्प्यात पावसाची आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने उडीद व मुगाच्या दर्जावर परिणाम झाला असून त्या मालाला मात्र योग्य भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, गहू, तांदूळ, डाळ यांना या आठवड्यात मागणी वाढली असली तरी त्यांचे भाव आठवडाभरापासून स्थिर आहे.सप्टेंबर महिन्यापासून बाजारात नवीन उडीद, मुगाची आवक सुरू होते. त्यानुसार यंदाही ही आवक सुरू झाली असून दररोज प्रत्येकी २५० ते ३०० क्ंिवटल उडीद व मुगाची आवक सुरू आहे. मात्र मुगाला शेवटच्या टप्प्यात आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने मुगाच्या दर्जावर परिणाम झाला आहे. काही माल बारीक असल्याने तर काही माल डागी असल्याने अशा मुगाला ३२०० ते ४००० रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. अशाच प्रकारे उडीदालाही २८०० ते ३००० रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. चांगल्या दर्जाच्या मुगाला ५००० ते ५२०० तर चांगल्या दर्जाच्या उडिदाला ४००० रुपये प्रती क्विंटल असा भाव मिळत आहे. जळगावच्या बाजारपेठेत जळगाव, धरणगाव तालुक्यासह अहमदनगर, चिखली, मेहकर, अकोला या भागातून मुगाची आवक होत आहे. उडिदाची जळगाव जिल्ह्यासह विदर्भ, कर्नाटकातून आवक सुरू आहे.शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षाभाद्रपद महिना सुरू झाल्याने उन्हाचाही चटका वाढला असून उडीद-मुगाची आवक चांगल्या प्रकारे सुरू झाली आहे. असे असले तरी बºयाच शेतकºयांनी आपला माल बाजारात न आणता ते शासकीय हमी भाव केंद्र सुरू करण्याची प्रतीक्षा करीत आहे. या केंद्रावर शासनाने जाहीर केलेला हमी भाव मिळण्याची आशा शेतकºयांना आहे. मात्र बराच माल डागी व बारीक असल्याने प्रतवारीनुसार शासकीय खरेदी केंद्रावर तो खरेदी केला जातो की नाही व त्यास योग्य भाव मिळतो की नाही याची चिंता शेतकºयांना लागून आहे.गहू, तांदूळ, डाळी स्थिरगेल्या आठवड्याच्या तुलनेत धान्याला मागणी वाढली असून मागणीनुसार धान्याची आवक सुरू असल्याने धान्य व डाळींचे भाव स्थिर आहेत. १४७ गहू २४०० ते २५०० रुपयांवर स्थिर असून लोकवन गव्हाचे भाव २३०० ते २४०० रुपये, शरबती गहू २५०० ते २६०० रुपये आणि चंदोसीचे भाव ३६०० ते ३८०० रुपयांवर स्थिर आहेत. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू आहे. तांदुळाचे भावदेखील स्थिर आहेत. नवीन उडीद व मुगाची आवक सुरू झाल्याने डाळींचे भाव कमी होतात की काय याकडे लक्ष लागून होते. मात्र आवक सुरू झाली असली तरी डाळींचे भाव स्थिर आहे. बाजारपेठेत मुगाची डाळ ६६ ते ७० रुपये प्रती किलोवर स्थिर असून उडीद डाळ ४८ ते ५२ रुपये प्रती किलो, तूरडाळ - ५६ ते ६० आणि हरभरा डाळ ४८ ते ५२ रुपये प्रती किलोने विक्री होत आहे.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव