शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
5
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
6
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
7
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
8
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
9
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
10
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
11
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
12
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
13
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
14
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
15
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
16
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
17
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

जळगावच्या बाजारात नवीन उडीद, मुगाची आवक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 12:47 IST

विजयकुमार सैतवालजळगाव : जळगावच्या बाजारपेठेत नवीन उडीद मुगाची आवक सुरू झाली असून चांगल्या मालाला व्यापाऱ्यांकडून भाव मिळत असला तरी शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. शेवटच्या टप्प्यात पावसाची आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने उडीद व मुगाच्या दर्जावर परिणाम झाला असून त्या मालाला मात्र योग्य भाव मिळत नसल्याचे ...

विजयकुमार सैतवालजळगाव : जळगावच्याबाजारपेठेत नवीन उडीद मुगाची आवक सुरू झाली असून चांगल्या मालाला व्यापाऱ्यांकडून भाव मिळत असला तरी शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची शेतकरी प्रतीक्षा करीत आहेत. शेवटच्या टप्प्यात पावसाची आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने उडीद व मुगाच्या दर्जावर परिणाम झाला असून त्या मालाला मात्र योग्य भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, गहू, तांदूळ, डाळ यांना या आठवड्यात मागणी वाढली असली तरी त्यांचे भाव आठवडाभरापासून स्थिर आहे.सप्टेंबर महिन्यापासून बाजारात नवीन उडीद, मुगाची आवक सुरू होते. त्यानुसार यंदाही ही आवक सुरू झाली असून दररोज प्रत्येकी २५० ते ३०० क्ंिवटल उडीद व मुगाची आवक सुरू आहे. मात्र मुगाला शेवटच्या टप्प्यात आवश्यकता असतानाच पावसाने दडी मारल्याने मुगाच्या दर्जावर परिणाम झाला आहे. काही माल बारीक असल्याने तर काही माल डागी असल्याने अशा मुगाला ३२०० ते ४००० रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. अशाच प्रकारे उडीदालाही २८०० ते ३००० रुपये प्रती क्विंटल भाव मिळत आहे. चांगल्या दर्जाच्या मुगाला ५००० ते ५२०० तर चांगल्या दर्जाच्या उडिदाला ४००० रुपये प्रती क्विंटल असा भाव मिळत आहे. जळगावच्या बाजारपेठेत जळगाव, धरणगाव तालुक्यासह अहमदनगर, चिखली, मेहकर, अकोला या भागातून मुगाची आवक होत आहे. उडिदाची जळगाव जिल्ह्यासह विदर्भ, कर्नाटकातून आवक सुरू आहे.शासकीय खरेदी केंद्र सुरू होण्याची प्रतीक्षाभाद्रपद महिना सुरू झाल्याने उन्हाचाही चटका वाढला असून उडीद-मुगाची आवक चांगल्या प्रकारे सुरू झाली आहे. असे असले तरी बºयाच शेतकºयांनी आपला माल बाजारात न आणता ते शासकीय हमी भाव केंद्र सुरू करण्याची प्रतीक्षा करीत आहे. या केंद्रावर शासनाने जाहीर केलेला हमी भाव मिळण्याची आशा शेतकºयांना आहे. मात्र बराच माल डागी व बारीक असल्याने प्रतवारीनुसार शासकीय खरेदी केंद्रावर तो खरेदी केला जातो की नाही व त्यास योग्य भाव मिळतो की नाही याची चिंता शेतकºयांना लागून आहे.गहू, तांदूळ, डाळी स्थिरगेल्या आठवड्याच्या तुलनेत धान्याला मागणी वाढली असून मागणीनुसार धान्याची आवक सुरू असल्याने धान्य व डाळींचे भाव स्थिर आहेत. १४७ गहू २४०० ते २५०० रुपयांवर स्थिर असून लोकवन गव्हाचे भाव २३०० ते २४०० रुपये, शरबती गहू २५०० ते २६०० रुपये आणि चंदोसीचे भाव ३६०० ते ३८०० रुपयांवर स्थिर आहेत. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून गव्हाची आवक सुरू आहे. तांदुळाचे भावदेखील स्थिर आहेत. नवीन उडीद व मुगाची आवक सुरू झाल्याने डाळींचे भाव कमी होतात की काय याकडे लक्ष लागून होते. मात्र आवक सुरू झाली असली तरी डाळींचे भाव स्थिर आहे. बाजारपेठेत मुगाची डाळ ६६ ते ७० रुपये प्रती किलोवर स्थिर असून उडीद डाळ ४८ ते ५२ रुपये प्रती किलो, तूरडाळ - ५६ ते ६० आणि हरभरा डाळ ४८ ते ५२ रुपये प्रती किलोने विक्री होत आहे.

टॅग्स :MarketबाजारJalgaonजळगाव