शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
2
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
3
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
4
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
5
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
6
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
7
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
8
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
9
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
10
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
11
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
12
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
13
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
14
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
15
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
16
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
17
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
20
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका

मराठी बिग बॉस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 01:19 IST

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत लिहिताहेत योगिता पाटील...

सध्या मराठी बिग बॉस हा रिअ‍ॅलिटी शो अनेक कारणांसाठी चर्चेत आहे. कधी त्या घरात घडलेल्या हिंसक कृतीमुळे, तर कधी त्यातल्या एका स्पर्धकाला थेट घरातून करण्यात आलेल्या अटकेमुळे! कधी एका स्पर्धकाने दुसऱ्या स्पर्धकाविषयी वापरलेल्या अर्वाच्य भाषेमुळे, तर कधी पुरुष स्पर्धकाकडून महिला स्पर्धकावर झालेल्या आक्रमकतेमुळे!आंतरराष्ट्रीय स्वरूप एकसारखे असणाºया या शोचा मराठीतला हा केवळ दुसराच सीझन, पण तरीही डेली सोपला वळसा घालून तो मध्यमवर्गीय मराठी माणसाच्या घरात स्थिरावत चाललाय हे मात्र नक्की. नेमकं काय असावं बरं यात जे मराठी प्रेक्षकांना आकर्षित करतं? वेगवेगळ्या क्षेत्रांतून आलेले, नावाजलेले चेहरे जेव्हा स्वत:चं कुटुंब, मोबाईल, करमणुकीची इतर साधनं असं सगळं विसरून, संपूर्ण बाह्य संपर्क तोडून एका विशिष्ट कालावधीसाठी एकाच घरात रहायला येतात तेव्हा आपल्या मनात असलेल्या प्रतिमेच्या अगदी विरुद्ध असा त्यांचा चेहरा आपल्यासमोर येतो. सुनेचा उत्तम अभिनय करणारी एखादी अभिनेत्री खाष्ट वागते. लोकसंपर्क समाजसेवेत अग्रेसर असणारी एखादी व्यक्ती तिथे स्त्रीचा अनादर करताना दिसते. गोड गळ्याने गाऊ शकणारी एखादी गायिका कर्कश आवाजात भांडताना दिसते. आपल्याला हे सगळं पाहायला आवडतं. कारण समाजाचंच तर हे प्रतिबिंब असतं. समाजात अशा अनेक व्यक्ती आपल्याला पावलोपावली भेटतात. अगदी खळखळ हसणारी व्यक्ती मनातून दु:खी असू शकते आणि खूप जास्त गोड बोलणारी व्यक्ती आतून कडवट मनाची असू शकते. आपल्या श्रद्धांना असे वास्तवात तडे जाण्याआधी आपण त्याचा सराव करतो अशा एखाद्या रिअ‍ॅलिटी शोमधून. भावनांचा कस लागणाºया या घरात क्षणोक्षणी स्पर्धकांचे खरंतर माणसांचे चेहरे बदलले जातात. जिंकण्याची ईर्षा माणसाला अगदी कोणत्या थराला नेऊ शकते हे पाहून आपण अचंबित होतो. रोज कट-कारस्थाने करायची, दिवसरात्र समोरच्याला कसं नमवता येईल याचा विचार करत रहायचंं, खोटं हसायचं, खोटं बोलायचं आणि खोटं रडायचंदेखील! हे असं सगळं इतकं स्पष्ट दिसत असतानाही मध्यमवर्गीय माणूस यातल्या काही पात्रांमध्ये अडकत जातो. त्याला स्वत:चं प्रतिबिंब त्या स्पर्धकांत दिसतं. प्रत्यक्ष आयुष्यात आपणही कुणाकडून तरी नकळत फसवले गेलेलो असतो. कुणीतरी आपल्याला कॉर्नर करून पुढे निघून गेलेलं असतं. आपण ओरडून सांगितलेला असतो आपला निर्दोषपणा. तरीही कधीतरी आपल्याला सुळावर चढवलं गेलेलं असतं आणि आपल्याचसमोर असत्याला डोक्यावरही घेतलं गेलेलं असतं. ही सल त्या स्पर्धकाच्या जिंकण्यातून जरा कमी करण्यासाठी मग असा एखादा बिग बॉस आपल्या घरापर्यंत येतो. डेली सोप्सच्या कथांमधील अतार्किकता आणि अशा एखाद्या रिअ‍ॅलिटी शोमधील वास्तवाचा भडकपणा या दोघांत हेलकावत राहतं ते केवळ मध्यमवर्गीय मन. विरंगुळा म्हणून पाहता पाहता ते आपल्या जगण्याचा भाग होत जातात. अर्थात सतत बदलत जाणाºया मुखवट्यांंच्या या जगात मुखवटा न घालता येऊ शकणाऱ्यांनी एकदा या घरात डोकवायला तशी काही हरकत नाही.हे घर जरी बिग बॉसच्या आदेशानुसार चालत असलं तरी सुदैवाने प्रत्यक्षात आपल्या आयुष्याचे आपणच बिग बॉस आहोत. त्यामुळे काय घ्यायचं, कितपत घ्यायचं आणि कोणत्या क्षणी सोडून द्यायचं हे आपल्याच हाती ! ‘मेरे अधुरेपन को वो पूरा करता है, इक सपनों का जहाँ है जो मुझे आबाद करता है।’ फक्त वेळीच स्वप्न आणि वास्तवाची जाणीव मध्यमवर्गीय मनाला व्हावी इतकंच..-योगिता पाटील, चोपडा, जि.जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यChopdaचोपडा