शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
5
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
6
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
7
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
8
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
9
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
10
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
11
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
12
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
14
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
15
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
16
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
17
लग्नाचं निमंत्रण दिलं नाही, सहकाऱ्यांनी एचआरकडे केली तरुणीची तक्रार, त्यानंतर घडलं असं काही...
18
"कित्येकांनी बलिदान दिले, शिरांचे ढीग लागले, पण धर्म सोडला नाही"- मोहन भागवत
19
"डोकं फिरवू नका, मी मंत्री, तुम्ही मलाच न सांगता...", PWD अधिकाऱ्यावर संतापले दयाशंकर सिंह
20
जगाला आपल्या धाकात ठेऊ पाहणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची संपत्ती किती? उत्पन्नाचा खरा स्रोत कोणता?

साहित्यिक घडविण्यात दिवाळी अंकांचे मोठे योगदान - जळगावात साहित्यिकांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 12:30 IST

अजूनही मोठ्या संख्येने आहेत वाचक

ठळक मुद्देविशिष्ट विषयाला वाहिलेल्या दिवाळी अंकांचे फॅड , मात्र दर्जाही जपलाउत्तम दिवाळी अंक हे उत्तम साहित्य उत्तम वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे उत्तम साधन

जळगाव : साहित्यिक घडविण्यात दिवाळी अंकांचे मोठे योगदान आहे. लोक हल्ली वाचत नाहीत, असे सर्रास म्हटले जात असले तरीही मोठ्या संख्येने वाचक अजूनही टिकून आहेत, हे दिवाळी अंकांची संख्या व त्यांच्या खपावरून दिसून येते असा सूर मान्यवर साहित्यिकांनी बुधवार, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ‘लोकमत’ शहर कार्यालय सदिच्छा भेटीप्रसंगी व्यक्त केला.ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किसन पाटील, कवी अशोक कोतवाल, प्रकाश किनगावकर यांनी लोकमत शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांचे स्वागत निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी केले. यावेळी या मान्यवरांनी शहर कार्यालयातील सहकाऱ्यांशी संवाद साधत दिवाळी अंकाच्या बाबत आपले मत व्यक्त केले.दिवाळी अंकातील दर्जेदार साहित्यामुळे मुळे नवीन स्फुर्ती मिळत असल्याचाही सूर या साहित्यिकांनी यावेळी व्यक्त केले.प्रा.किसन पाटीललहानपणी आमच्या गावातील वाचनालयात दिवाळी अंक यायचे. तसेच ज्येष्ठ बंधू शिक्षण घेत होते. ते देखील ते दिवाळी अंक आणायचे. त्यामुळे लहानपणीच दिवाळी अंकाशी परिचय झाला. दिवाळी अंकाच्यानिमित्ताने चांगली रंगीत छायाचित्र तर बघायला मिळायचीच पण काही दिवाळी अंकांमधून वात्रटिकाही वाचायला आनंद यायचा. सुरूवातीला त्यातील उपरोध कळायचा नाही. मात्र नंतर हळूहळू त्यातील उपरोध, गंमत कळायला सुरूवात झाली. दिवाळी अंक ही एकूणच भारतीय संस्कृतीला मराठीची देण आहे. अपवाद वगळला तर दिवाळी अंक हे मराठीतच निघातात. आजच्या स्थितीत सुमारे ४०० ते ४५० दिवाळी अंक निघतात. साहित्य निर्मिती ही स्वान्त सुखाय असते. मात्र आत्मनिष्ठेकरून हे साहित्य समाजनिष्ठेकडे जाते. तेव्हा दिवाळी अंकांचे माध्यम त्यासाठी अधिक उपयोगी ठरते. त्यामुळे साहित्यिक घडविण्यात दिवाळी अंकांचेही योगदान मोठे आहे.प्रकाश किनगावकरलेखक, कवी लिहितो, मात्र त्याला लगेच प्रसिद्धी मिळत नाही. एखाद्या कवीला कविता संग्रह प्रसिद्ध करायला १०-१५ वर्ष वाट पहावी लागते. माझा पहिला कविता संग्रह १८ वर्षांनी प्रसिद्ध झाला. मात्र दिवाळी अंकामुळे साहित्याला लगेच प्रसिद्धी मिळते. अनेक दिवाळी अंकांसाठी चांगले साहित्य राखून ठेवले जाते. मोठ्या दिवाळी अंकांमध्ये साहित्य प्रकाशित होणे हा वेगळाच आनंद आहे. दिवाळी अंकातून चांगले साहित्य वाचकांपर्यंत जाते. लोक वाचतात. वेगवेगळे विषय अंकात असतात.अशोक कोतवालउत्तम दिवाळी अंक हे उत्तम साहित्य उत्तम वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे उत्तम साधन असते. मी लिहायला सुरूवात केली तेव्हा खूप मासिकं होते. तेव्हा नामांकित मासिकात आपले साहित्य प्रसिद्ध व्हावे, असे वाटायचे. दिवाळी अंकांमध्ये साहित्य प्रसिद्ध व्हायचे तेव्हा फराळापेक्षाही दिवाळी अंकाची वाट बघायचो. अजूनही ‘दीपोत्सव’सारखे चांगले दिवाळी अंक साहित्यिकांना प्रेरणा देतात. उत्साह निर्माण करतात. तसेच प्रकाशकही ते दिवाळी अंक अधिकाधिक चांगले करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतात. वाचनीय अंक असतात. वाचकवर्गही दर्जेदार असतो. लोक वाचत नाहीत, हे म्हणणे चुकीचे आहे. लोक पुस्तक, दिवाळी अंक विकत घेतात. विशिष्ट विषयाला वाहिेलेले दिवाळी अंक हे फॅड आहे. मात्र काही अंकांनी दर्जा, वैशिष्ट्य जपले आहे.

टॅग्स :DiwaliदिवाळीJalgaonजळगाव