शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

साहित्यिक घडविण्यात दिवाळी अंकांचे मोठे योगदान - जळगावात साहित्यिकांचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 12:30 IST

अजूनही मोठ्या संख्येने आहेत वाचक

ठळक मुद्देविशिष्ट विषयाला वाहिलेल्या दिवाळी अंकांचे फॅड , मात्र दर्जाही जपलाउत्तम दिवाळी अंक हे उत्तम साहित्य उत्तम वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे उत्तम साधन

जळगाव : साहित्यिक घडविण्यात दिवाळी अंकांचे मोठे योगदान आहे. लोक हल्ली वाचत नाहीत, असे सर्रास म्हटले जात असले तरीही मोठ्या संख्येने वाचक अजूनही टिकून आहेत, हे दिवाळी अंकांची संख्या व त्यांच्या खपावरून दिसून येते असा सूर मान्यवर साहित्यिकांनी बुधवार, ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ‘लोकमत’ शहर कार्यालय सदिच्छा भेटीप्रसंगी व्यक्त केला.ज्येष्ठ साहित्यिक प्रा.किसन पाटील, कवी अशोक कोतवाल, प्रकाश किनगावकर यांनी लोकमत शहर कार्यालयास सदिच्छा भेट दिली. त्यांचे स्वागत निवासी संपादक मिलिंद कुलकर्णी यांनी केले. यावेळी या मान्यवरांनी शहर कार्यालयातील सहकाऱ्यांशी संवाद साधत दिवाळी अंकाच्या बाबत आपले मत व्यक्त केले.दिवाळी अंकातील दर्जेदार साहित्यामुळे मुळे नवीन स्फुर्ती मिळत असल्याचाही सूर या साहित्यिकांनी यावेळी व्यक्त केले.प्रा.किसन पाटीललहानपणी आमच्या गावातील वाचनालयात दिवाळी अंक यायचे. तसेच ज्येष्ठ बंधू शिक्षण घेत होते. ते देखील ते दिवाळी अंक आणायचे. त्यामुळे लहानपणीच दिवाळी अंकाशी परिचय झाला. दिवाळी अंकाच्यानिमित्ताने चांगली रंगीत छायाचित्र तर बघायला मिळायचीच पण काही दिवाळी अंकांमधून वात्रटिकाही वाचायला आनंद यायचा. सुरूवातीला त्यातील उपरोध कळायचा नाही. मात्र नंतर हळूहळू त्यातील उपरोध, गंमत कळायला सुरूवात झाली. दिवाळी अंक ही एकूणच भारतीय संस्कृतीला मराठीची देण आहे. अपवाद वगळला तर दिवाळी अंक हे मराठीतच निघातात. आजच्या स्थितीत सुमारे ४०० ते ४५० दिवाळी अंक निघतात. साहित्य निर्मिती ही स्वान्त सुखाय असते. मात्र आत्मनिष्ठेकरून हे साहित्य समाजनिष्ठेकडे जाते. तेव्हा दिवाळी अंकांचे माध्यम त्यासाठी अधिक उपयोगी ठरते. त्यामुळे साहित्यिक घडविण्यात दिवाळी अंकांचेही योगदान मोठे आहे.प्रकाश किनगावकरलेखक, कवी लिहितो, मात्र त्याला लगेच प्रसिद्धी मिळत नाही. एखाद्या कवीला कविता संग्रह प्रसिद्ध करायला १०-१५ वर्ष वाट पहावी लागते. माझा पहिला कविता संग्रह १८ वर्षांनी प्रसिद्ध झाला. मात्र दिवाळी अंकामुळे साहित्याला लगेच प्रसिद्धी मिळते. अनेक दिवाळी अंकांसाठी चांगले साहित्य राखून ठेवले जाते. मोठ्या दिवाळी अंकांमध्ये साहित्य प्रकाशित होणे हा वेगळाच आनंद आहे. दिवाळी अंकातून चांगले साहित्य वाचकांपर्यंत जाते. लोक वाचतात. वेगवेगळे विषय अंकात असतात.अशोक कोतवालउत्तम दिवाळी अंक हे उत्तम साहित्य उत्तम वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे उत्तम साधन असते. मी लिहायला सुरूवात केली तेव्हा खूप मासिकं होते. तेव्हा नामांकित मासिकात आपले साहित्य प्रसिद्ध व्हावे, असे वाटायचे. दिवाळी अंकांमध्ये साहित्य प्रसिद्ध व्हायचे तेव्हा फराळापेक्षाही दिवाळी अंकाची वाट बघायचो. अजूनही ‘दीपोत्सव’सारखे चांगले दिवाळी अंक साहित्यिकांना प्रेरणा देतात. उत्साह निर्माण करतात. तसेच प्रकाशकही ते दिवाळी अंक अधिकाधिक चांगले करण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतात. वाचनीय अंक असतात. वाचकवर्गही दर्जेदार असतो. लोक वाचत नाहीत, हे म्हणणे चुकीचे आहे. लोक पुस्तक, दिवाळी अंक विकत घेतात. विशिष्ट विषयाला वाहिेलेले दिवाळी अंक हे फॅड आहे. मात्र काही अंकांनी दर्जा, वैशिष्ट्य जपले आहे.

टॅग्स :DiwaliदिवाळीJalgaonजळगाव