शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

महिंदळे परिसरात अवकाळी पाऊस़, वादळाने पिके झाली आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 15:15 IST

महिंदळे परिसरात बुधवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला.

ठळक मुद्देफुलोऱ्यावर असलेली बाजरी, ज्वारी, गहू, हरबरा दादर, पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

लोकमत न्यूज नेटवर्क

महिंदळे ता. भडगाव : महिंदळे परिसरात बुधवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेली पिके जमीनदोस्त झाली. या पावसाने फुलोऱ्यावर असलेली बाजरी, ज्वारी, गहू, हरबरा दादर, पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे हरभरा पिक पूर्ण वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पावसाळ्यात कपाशीला बोन्ड अळीने खाल्ले आता रब्बीला अवकाळीचा दणका बसला आहे. यावर्षीचा हंगाम शेतकऱ्यांना तोट्याचा ठरत आहे. पावसाळ्यात मेहनतीने शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून कपाशी फुलवली. अगोदर जास्त पाऊस झाल्यामुळे कपाशी पिक पार वाया गेले. जे शिल्लक होते त्यातही बोन्ड अळीचा कहर त्यामुळे कपाशीचे उत्पन्न निम्यावर येऊन ठेपले. पिकासाठी केलेला खर्चही निघाला नाही. कपाशीवर बोन्ड आली पडल्यामुळे डिसेंबर ते जानेवारीपर्यंत चालणारी कपाशी यावर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यातच उपटून फेकावी लागली. विहिरींना बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दादर, बाजरी, मका, गहू, हरबरा, टरबूज, ज्वारी पिकांची लागवड केली आहे. परंतु निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर बसत आहे. कधी वातावरण बदलाचा फटका पिकांना बसतो तर कधी अवकाळीचा मार निसर्गचक्रात मात्र शेतकरी पूर्ण अडकला आहे.  

अवेळी आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आणले आहे. फुलोऱ्यात असलेली पिके जमिनीवर आडवी झाल्याचे पाहून शेतकऱ्यांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली. एकाच रात्रीत होत्याचे नव्हते झाले.

 

टॅग्स :JalgaonजळगावBhadgaon भडगावRainपाऊस