शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

महिंदळे परिसरात अवकाळी पाऊस़, वादळाने पिके झाली आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 15:15 IST

महिंदळे परिसरात बुधवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने धुमाकूळ घातला.

ठळक मुद्देफुलोऱ्यावर असलेली बाजरी, ज्वारी, गहू, हरबरा दादर, पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान.

लोकमत न्यूज नेटवर्क

महिंदळे ता. भडगाव : महिंदळे परिसरात बुधवारी रात्री बारा वाजेच्या सुमारास आलेल्या वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडी आलेली पिके जमीनदोस्त झाली. या पावसाने फुलोऱ्यावर असलेली बाजरी, ज्वारी, गहू, हरबरा दादर, पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे हरभरा पिक पूर्ण वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना वाटत आहे. नुकसानीचा पंचनामा करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

पावसाळ्यात कपाशीला बोन्ड अळीने खाल्ले आता रब्बीला अवकाळीचा दणका बसला आहे. यावर्षीचा हंगाम शेतकऱ्यांना तोट्याचा ठरत आहे. पावसाळ्यात मेहनतीने शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून कपाशी फुलवली. अगोदर जास्त पाऊस झाल्यामुळे कपाशी पिक पार वाया गेले. जे शिल्लक होते त्यातही बोन्ड अळीचा कहर त्यामुळे कपाशीचे उत्पन्न निम्यावर येऊन ठेपले. पिकासाठी केलेला खर्चही निघाला नाही. कपाशीवर बोन्ड आली पडल्यामुळे डिसेंबर ते जानेवारीपर्यंत चालणारी कपाशी यावर्षी सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यातच उपटून फेकावी लागली. विहिरींना बऱ्यापैकी पाणी असल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दादर, बाजरी, मका, गहू, हरबरा, टरबूज, ज्वारी पिकांची लागवड केली आहे. परंतु निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्यांच्या मुळावर बसत आहे. कधी वातावरण बदलाचा फटका पिकांना बसतो तर कधी अवकाळीचा मार निसर्गचक्रात मात्र शेतकरी पूर्ण अडकला आहे.  

अवेळी आलेल्या वादळी पावसाने शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आणले आहे. फुलोऱ्यात असलेली पिके जमिनीवर आडवी झाल्याचे पाहून शेतकऱ्यांना डोक्यावर हात मारण्याची वेळ आली. एकाच रात्रीत होत्याचे नव्हते झाले.

 

टॅग्स :JalgaonजळगावBhadgaon भडगावRainपाऊस