शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

Maharashtra Political Crisis : ठाकरे सरकार पडेल का?; एकनाथ खडसे म्हणाले, "जय श्रीराम..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2022 19:32 IST

Maharashtra Political Crisis Eknath Khadse : मुंबईत बैठका आटोपून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे हे जळगावमध्ये दाखल झाले आहेत. मात्र खडसेंनी राज्यातील राजकीय घडामोडी संदर्भात बोलण्यास नकार दिला.

जळगाव - एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे ठाकरे सरकार अस्थिर झाले आहे. त्यामुळे राज्यात जोरदार राजकीय घडामोडी घडत आहेत. एकीकडे शिवसेनेकडून डॅमेज कंट्रोल रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील बैठकांचा सपाटा सुरू आहे. मुंबईत बैठका आटोपून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे जळगावमध्ये दाखल झाले आहेत. मात्र खडसेंनी राज्यातील राजकीय घडामोडी संदर्भात बोलण्यास नकार दिला. ठाकरे सरकार पडेल का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी 'जय श्रीराम' एवढीच प्रतिक्रिया देत काढता पाय घेतला. 

सध्या जे राजकारण चालले आहे, तो शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. मात्र, यामागे कोणती तरी मोठी शक्ती आहे. हे सगळे घडत आहे, त्यासाठी कुणी तरी ताकद दिल्याशिवाय एकनाथ शिंदे इतके धाडस करणार नाहीत. कोण त्यांच्या पाठीमागे आहे, हे भविष्यात समोर येईलच, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी कल्याणमध्ये केलं होतं.

४० वर्षांत असे राजकारण मी अनुभवले नव्हते. राज्यात अस्थिरतेचे वातावरण आहे. कोण कुणाबरोबर आहे, यावर आता विश्वास ठेवता येणार नाही. महाराष्ट्राच्या मंत्रिमडळातील बहुसंख्य मंत्र्यांनी बंड केले आहे. शिवसेनेतून अनेक जण बाहेर पडत आहेत. अनेक तांत्रिक प्रश्न निर्माण झाले आहेत. पण तांत्रिक प्रश्नांची सोडवणूक न्यायालय करू शकेल, अशी स्थिती आहे, याकडे खडसे यांनी लक्ष वेधले होते.  

 "ज्यांनी जिंकायला शिकवलं, त्यांना ..."; एकनाथ खडसेंच्या कन्येचं 'ते' ट्विट जोरदार चर्चेत

एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांचं एक ट्विट चर्चेत आलं आहे. रोहिणी खडसेंनी आपल्या ट्विटर हँडलसह फेसबुकवर एक पोस्ट केली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी "आयुष्यात एकच नियम पाळा ज्यांनी जिंकायला शिकवलं, त्यांना हरवण्याची स्वप्ने कधीच पाहू नका..." अशा आशयाचा मजकूर लिहिला आहे. खडसेंच्या याच ट्विटची जोरदार चर्चा रंगली आहे. रोहिणी खडसे यांनी केलेल्या ट्विटमधून शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर निशाणा साधल्याची जोरदार चर्चा आहे. एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने देखील या संकटाच्या काळात शिवसेनेसोबत असल्याची भूमिका जाहीर केली आहे. या साऱ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर रोहिणी खडसे यांनी केलेल्या ट्विटचे राजकीय अर्थ लावले जात आहेत. 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेPoliticsराजकारणMaharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळ