शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

Maharashtra Election 2019: 'हिंमत असेल तर विरोधक कलम 370 चा उल्लेख जाहीरनाम्यात करणार का?' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 13:08 IST

चार महिन्यांपूर्वी तुम्ही समर्थ, सशक्त भारताच्या निर्माणासाठी मतदान केलं होतं. जगात भारताला स्थान मिळावं यासाठी तुम्ही मतदान केलं.

जळगाव - जम्मू काश्मीरमधील लोकांच्या विरुद्ध भावना काँग्रेस-राष्ट्रवादीची दिसून येते. शेजारील राष्ट्रांना मदत होईल असे वक्तव्य करतात. त्यामुळे तुमच्यात हिंमत असेल तर आगामी निवडणुकीत विरोधकांनी जम्मू काश्मीरमधून कलम 370 परत आणू असं घोषणापत्रात देणार का? उगाच खोटे अश्रू काढू नका असं आव्हान नरेंद्र मोदींनी विरोधकांना केलं. 

यावेळी बोलताना नरेंद्र मोदी म्हणाले की, जळगावात अभूतपूर्व सभा झाली. पुढील 5 वर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार यावं यासाठी मी जळगावात आलो आहे. तुम्ही जो विश्वास भाजपावर, एनडीएवर दाखविला त्याचे आभार मानण्यासाठी मी इथे आलो आहे. चार महिन्यांपूर्वी तुम्ही समर्थ, सशक्त भारताच्या निर्माणासाठी मतदान केलं होतं. जगात भारताला स्थान मिळावं यासाठी तुम्ही मतदान केलं. नव्या भारताचा नवा जोश जगाला दिसू लागला आहे. तुम्हाला हे दिसतंय ना,असं जनतेला विचारले. पूर्वी असं चित्र पाहायला मिळालं होतं का? असा सवाल त्यांनी उपस्थित लोकांना विचारला. केवळ मोदी मूळे हे होत नाही, १३० कोटी भारतीय जनतेने केलेल्या सहकार्य यामुळे शक्य झाले.

तसेच माता, भगिनींनी आवाहन आहे, तुम्ही लोकसभेत पुरुषांच्या बरोबरीने मतदान केले. आता महाराष्ट्रात पुरुषापेक्षा अधिक मतदान महिलांनी करावे. जाती, भेदभाव, भाषा यातून बाहेर निघत भाजपाला मतदान दिलं. त्यामुळे भारताची ताकद जगाला दिसत आहे. भारतीय जनतेच्या समर्पण, योगदान, उत्साह यामुळे जगात भारताची मान उंचावली आहे असं त्यांनी सांगितले. 

दरम्यान, 5 ऑगस्टला देशात काय झालं? 70 वर्ष जम्मू काश्मीर आणि लडाख विकासापासून वंचित केलं होतं. जम्मू काश्मीर आमच्यासाठी फक्त जमीन नाही तर भारतमातेचं मस्तक आहे. 70 वर्षानंतर काश्मीरी लोकांना स्वातंत्र्य मिळालं. जम्मू काश्मीरमध्ये जनजीवन पूर्ववत करण्यासाठी या सरकारने प्रयत्न केले. 4 महिन्यात काश्मीर लोकांचे जनजीवन सामान्य झालं. मात्र या निर्णयावरही काही राजकीय पक्ष राजकारण दुदैव करत आहेत. यात महाराष्ट्रातील पक्षही सहभागी आहे. 

गेली 5 वर्ष देवेंद्र फडणवीसांनी स्थिर सरकार दिलं. इतक्या वर्षांमध्ये फक्त एकाच मुख्यमंत्र्यांना सलग 5 वर्ष मुख्यमंत्रीपदी राहता आलं. त्यानंतर दुसरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला, महाराष्ट्रात 5 वर्ष भ्रष्टाचार दिसला नाही, रस्त्यांपासून सिंचनापर्यंत, शिक्षणापासून आरोग्यापर्यंत, शेतकऱ्यांपासून कामगारांपर्यंत सगळ्यांना न्याय दिला असं सांगत नरेंद्र मोदींनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीArticle 370कलम 370BJPभाजपाSharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019