शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

महाजनकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 17:51 IST

जामनेरच्या पालिका निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मिळविलेले निर्भेळ यश हे राजकारणातील त्यांची ‘महाजनकी’ सिध्द करणारे आहे.

जामनेरच्या पालिका निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मिळविलेले निर्भेळ यश हे राजकारणातील त्यांची ‘महाजनकी’ सिध्द करणारे आहे. महाजन हे जामनेर विधानसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांची तालुक्यावर आणि त्यातील संस्थांवर मजबूत पकड आहे. परंतु २०१३ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत महाजन हे कार्यकर्त्यांवर विसंबून राहिल्याने भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. अडीच वर्षांनंतर पालिकेत सत्तापालट करुन महाजन यांनी पत्नी साधना महाजन यांना नगराध्यक्ष बनविले. मंत्रिपदाचा उपयोग करीत वेगवेगळ्या खात्यांचा मोठा निधी जामनेर शहरात आणला. अडीच वर्षात विकास कामांना गती आणत असतानाच राजकीय पातळीवर चातुर्याने रणनीती आखत प्रतिस्पर्धी पक्षाच्या मातब्बरांना भाजपात ओढले. ‘शतप्रतिशत’ विजयामागील ही रणनिती यशस्वी ठरली, त्या रणनितीबद्दल महाजन यांना गुण द्यावेच लागतील. कॉंग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना या राजकीय पक्षांना निवडणुकीच्या तोंडावर जाग आली आणि त्यांनी हालचाली सुरु केल्या. दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडीवरुन शेवटच्या दिवसापर्यंत घोळ सुरु होता. जिल्हा पदाधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडण्यापर्यंत कार्यकर्त्यांचा असंतोष पोहोचला होता. सेनेचा सर्व जागा लढविण्याचा निर्धार हवेत विरला आणि केवळ एक उमेदवार रिंगणात उतरला. राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ईश्वरलाल जैन यांचा गट महाजन यांना उघडपणे मदत करीत होता. राजकारण आणि युध्दात सर्व क्षम्य असते म्हणतात, त्याप्रमाणे महाजन यांनी खेळी केली आणि ती तडीस नेली. दोन्ही काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते हे केवळ धनंजय मुंडे आणि नबाव मलिक यांच्या संयुक्त सभेला व्यासपीठावर हजेरी लावण्यापुरता आले. उर्वरित काळात प्रचाराची धुरा सांभाळण्यापासून तर रॅलीत सहभागापर्यंत कुणाचाही सहभाग दिसून आला नाही, याचा अर्थ महाजन यांचा विजय आघाडीने गृहित धरला होता काय? मंत्रिपदाचा गैरवापर, पैशांचा महापूर, प्रशासनाची दडपशाही असे आरोप आता विरोधकांकडून होतील, पण निवडणुकीनंतरच्या आरोपांमध्ये तथ्य कमी आणि वैफल्य जास्त असते, हे सगळ्यांना ठावूक आहे. वर्षभरावर आलेली लोकसभा आणि त्यानंतर होणाºया विधानसभा निवडणुका लक्षात घेता हा निकाल भाजपाच्यादृष्टीने उत्साहवर्धक आहे. ‘संकटमोचक’ म्हणून महाजन अलिकडे ओळखले जाऊ लागले आहेत. किसान मोर्चा, अण्णा हजारे यांचे उपोषण या दोन्ही घटनांमध्ये महाजन यांची शिष्टाई यशस्वी ठरली. मुख्यमंत्र्यांचा त्यांच्यावर गाढ विश्वास आहे. तो महाजन यांनी सार्थ ठरविला. जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे नाराज असताना सरकार व पक्ष महाजन यांना बळ देत आहे, आणि त्यातून महाजन अधिक बलवान होत आहे, हादेखील निकालाचा अर्थ आहे.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनJamnerजामनेरBJPभाजपाJalgaonजळगाव