शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

महाजनकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 17:51 IST

जामनेरच्या पालिका निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मिळविलेले निर्भेळ यश हे राजकारणातील त्यांची ‘महाजनकी’ सिध्द करणारे आहे.

जामनेरच्या पालिका निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मिळविलेले निर्भेळ यश हे राजकारणातील त्यांची ‘महाजनकी’ सिध्द करणारे आहे. महाजन हे जामनेर विधानसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांची तालुक्यावर आणि त्यातील संस्थांवर मजबूत पकड आहे. परंतु २०१३ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत महाजन हे कार्यकर्त्यांवर विसंबून राहिल्याने भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. अडीच वर्षांनंतर पालिकेत सत्तापालट करुन महाजन यांनी पत्नी साधना महाजन यांना नगराध्यक्ष बनविले. मंत्रिपदाचा उपयोग करीत वेगवेगळ्या खात्यांचा मोठा निधी जामनेर शहरात आणला. अडीच वर्षात विकास कामांना गती आणत असतानाच राजकीय पातळीवर चातुर्याने रणनीती आखत प्रतिस्पर्धी पक्षाच्या मातब्बरांना भाजपात ओढले. ‘शतप्रतिशत’ विजयामागील ही रणनिती यशस्वी ठरली, त्या रणनितीबद्दल महाजन यांना गुण द्यावेच लागतील. कॉंग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना या राजकीय पक्षांना निवडणुकीच्या तोंडावर जाग आली आणि त्यांनी हालचाली सुरु केल्या. दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडीवरुन शेवटच्या दिवसापर्यंत घोळ सुरु होता. जिल्हा पदाधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडण्यापर्यंत कार्यकर्त्यांचा असंतोष पोहोचला होता. सेनेचा सर्व जागा लढविण्याचा निर्धार हवेत विरला आणि केवळ एक उमेदवार रिंगणात उतरला. राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ईश्वरलाल जैन यांचा गट महाजन यांना उघडपणे मदत करीत होता. राजकारण आणि युध्दात सर्व क्षम्य असते म्हणतात, त्याप्रमाणे महाजन यांनी खेळी केली आणि ती तडीस नेली. दोन्ही काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते हे केवळ धनंजय मुंडे आणि नबाव मलिक यांच्या संयुक्त सभेला व्यासपीठावर हजेरी लावण्यापुरता आले. उर्वरित काळात प्रचाराची धुरा सांभाळण्यापासून तर रॅलीत सहभागापर्यंत कुणाचाही सहभाग दिसून आला नाही, याचा अर्थ महाजन यांचा विजय आघाडीने गृहित धरला होता काय? मंत्रिपदाचा गैरवापर, पैशांचा महापूर, प्रशासनाची दडपशाही असे आरोप आता विरोधकांकडून होतील, पण निवडणुकीनंतरच्या आरोपांमध्ये तथ्य कमी आणि वैफल्य जास्त असते, हे सगळ्यांना ठावूक आहे. वर्षभरावर आलेली लोकसभा आणि त्यानंतर होणाºया विधानसभा निवडणुका लक्षात घेता हा निकाल भाजपाच्यादृष्टीने उत्साहवर्धक आहे. ‘संकटमोचक’ म्हणून महाजन अलिकडे ओळखले जाऊ लागले आहेत. किसान मोर्चा, अण्णा हजारे यांचे उपोषण या दोन्ही घटनांमध्ये महाजन यांची शिष्टाई यशस्वी ठरली. मुख्यमंत्र्यांचा त्यांच्यावर गाढ विश्वास आहे. तो महाजन यांनी सार्थ ठरविला. जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे नाराज असताना सरकार व पक्ष महाजन यांना बळ देत आहे, आणि त्यातून महाजन अधिक बलवान होत आहे, हादेखील निकालाचा अर्थ आहे.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनJamnerजामनेरBJPभाजपाJalgaonजळगाव