शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

महाजनकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2018 17:51 IST

जामनेरच्या पालिका निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मिळविलेले निर्भेळ यश हे राजकारणातील त्यांची ‘महाजनकी’ सिध्द करणारे आहे.

जामनेरच्या पालिका निवडणुकीत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाने मिळविलेले निर्भेळ यश हे राजकारणातील त्यांची ‘महाजनकी’ सिध्द करणारे आहे. महाजन हे जामनेर विधानसभा मतदारसंघातून सलग पाचवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांची तालुक्यावर आणि त्यातील संस्थांवर मजबूत पकड आहे. परंतु २०१३ मध्ये झालेल्या पालिका निवडणुकीत महाजन हे कार्यकर्त्यांवर विसंबून राहिल्याने भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला. अडीच वर्षांनंतर पालिकेत सत्तापालट करुन महाजन यांनी पत्नी साधना महाजन यांना नगराध्यक्ष बनविले. मंत्रिपदाचा उपयोग करीत वेगवेगळ्या खात्यांचा मोठा निधी जामनेर शहरात आणला. अडीच वर्षात विकास कामांना गती आणत असतानाच राजकीय पातळीवर चातुर्याने रणनीती आखत प्रतिस्पर्धी पक्षाच्या मातब्बरांना भाजपात ओढले. ‘शतप्रतिशत’ विजयामागील ही रणनिती यशस्वी ठरली, त्या रणनितीबद्दल महाजन यांना गुण द्यावेच लागतील. कॉंग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस, शिवसेना या राजकीय पक्षांना निवडणुकीच्या तोंडावर जाग आली आणि त्यांनी हालचाली सुरु केल्या. दोन्ही काँग्रेसमध्ये आघाडीवरुन शेवटच्या दिवसापर्यंत घोळ सुरु होता. जिल्हा पदाधिकाऱ्यांना कार्यालयात कोंडण्यापर्यंत कार्यकर्त्यांचा असंतोष पोहोचला होता. सेनेचा सर्व जागा लढविण्याचा निर्धार हवेत विरला आणि केवळ एक उमेदवार रिंगणात उतरला. राष्टÑवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ईश्वरलाल जैन यांचा गट महाजन यांना उघडपणे मदत करीत होता. राजकारण आणि युध्दात सर्व क्षम्य असते म्हणतात, त्याप्रमाणे महाजन यांनी खेळी केली आणि ती तडीस नेली. दोन्ही काँग्रेसचे जिल्ह्यातील नेते हे केवळ धनंजय मुंडे आणि नबाव मलिक यांच्या संयुक्त सभेला व्यासपीठावर हजेरी लावण्यापुरता आले. उर्वरित काळात प्रचाराची धुरा सांभाळण्यापासून तर रॅलीत सहभागापर्यंत कुणाचाही सहभाग दिसून आला नाही, याचा अर्थ महाजन यांचा विजय आघाडीने गृहित धरला होता काय? मंत्रिपदाचा गैरवापर, पैशांचा महापूर, प्रशासनाची दडपशाही असे आरोप आता विरोधकांकडून होतील, पण निवडणुकीनंतरच्या आरोपांमध्ये तथ्य कमी आणि वैफल्य जास्त असते, हे सगळ्यांना ठावूक आहे. वर्षभरावर आलेली लोकसभा आणि त्यानंतर होणाºया विधानसभा निवडणुका लक्षात घेता हा निकाल भाजपाच्यादृष्टीने उत्साहवर्धक आहे. ‘संकटमोचक’ म्हणून महाजन अलिकडे ओळखले जाऊ लागले आहेत. किसान मोर्चा, अण्णा हजारे यांचे उपोषण या दोन्ही घटनांमध्ये महाजन यांची शिष्टाई यशस्वी ठरली. मुख्यमंत्र्यांचा त्यांच्यावर गाढ विश्वास आहे. तो महाजन यांनी सार्थ ठरविला. जळगाव जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे हे नाराज असताना सरकार व पक्ष महाजन यांना बळ देत आहे, आणि त्यातून महाजन अधिक बलवान होत आहे, हादेखील निकालाचा अर्थ आहे.

टॅग्स :Girish Mahajanगिरीश महाजनJamnerजामनेरBJPभाजपाJalgaonजळगाव