शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

"३५ वर्षे काम केलेल्या निष्ठावंतांना ३२ वर्षांच्या आदित्य ठाकरेंचं ऐकावं लागत होतं"

By ajay.patil | Updated: September 1, 2022 19:25 IST

पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील : आदित्य ठाकरे हे त्यांच्या कुटुंबाचे वारस, विचारांचे नाहीत

अजय पाटीलजळगाव : आम्ही शिवसेनेत गेल्या ३५ वर्षांपासून काम करीत आहोत आणि ३२ वर्षांचे आदित्य ठाकरे हे आमच्यावर गद्दार असल्याचा शिक्का मारतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर टीका करतात, हे योग्य आहे का ?. आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबाचे वारसदार असू शकतात. मात्र, शिवसेनेच्या विचारांचे वारसदार नाहीत, अशा शब्दात पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सध्याच्या शिवसेनेतील घटनाघडामोडींवर मत व्यक्त केले.

‘लोकमत’च्या कार्यालयाला गुलाबराव पाटील यांनी गुरुवारी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी सध्याच्या घडामोडींबाबत आपल्या दिलखुलास अंदाजात उत्तरे दिली. आम्ही केलेला उठाव हा केवळ शिवसेनेच्या भल्यासाठी आहे. आमची पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत नाराजी नाही. मात्र, ज्यांनी उद्धव ठाकरे यांना घेरले आहे त्यांच्यासोबत आमची नाराजी आहे. शिवसेनेची सद्य:स्थिती ही केवळ खासदार संजय राऊत यांच्यामुळेच निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

आता जेथे आहोत तेथेच ठिक आहोत

३५ वर्षांपासून शिवसेनेत काम करत असल्याने अचानकपणे उठाव करण्याची वेळ आली. तेव्हा तर गणपतीच काय, पिरोबा, म्हसोबादेखील आठवावे लागले. शिवसेना फुटू नये म्हणून आम्हीही प्रयत्न केले. तसेच आम्ही सोडून जाण्याच्या अगोदर उद्धव ठाकरे यांच्याकडे बसून, सर्वांना बोलावून घेण्याचीही विनंती केली. हेच काय तर सर्व उलथा-पालथ होण्याआधी चार महिन्यांपूर्वीच उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन, आमदार नाराज असल्याची कल्पना दिली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया केवळ बघू, करू, अशी होती. या उठावानंतर आता जेथे आहोत त्या ठिकाणी ठिक असल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांच्यासोबतच्या शिंदे गटाच्या समेटाबाबत त्यांनी स्पष्ट नकार दिला.

राऊतांचे ‘ते’ वाक्य आजही कानात घुमतेएकीकडे राष्ट्रवादीच्या आमदारांची कामे होत असताना, शिवसेनेच्या आमदारांना मात्र मंत्रालयाच्या फेऱ्या माराव्या लागत होत्या. त्यात आमचे मुख्यमंत्री असताना त्यांना वेळ मिळत नसल्याने आमदारांनी आपल्या समस्या मांडाव्या कोणाकडे, अशी समस्या होती. पक्षाचे एक नाही तर ८ मंत्री सोडून गेले, ४० आमदारांनी बंड केले तरीही गांभीर्य वाटले नाही, की त्यांना थांबवावे, आम्ही समजवायला गेलो तर संजय राऊत म्हणाले होते की, ‘दिसतात तर सिंहासारखे मात्र हृदय उंदरासारखे’ हे राऊतांचे वाक्य आजही कानात घुमत असल्याचे त्यांनी सांगितले.

पक्षप्रमुखच मुख्यमंत्री झाले तर आम्ही रडायचे कुणाकडे

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी संपूर्ण आयुष्यात कोणतेही पद घेतले नाही. फडणवीस सरकारमध्ये शिवसेनेच्या आमदारांना निधी वाटपात भेदभाव होत होता त्यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आम्ही रडायचो. त्यांनी फडणवीस यांना फोन लावल्यानंतर तत्काळ कामे होत होती. मात्र आता पक्षप्रमुखच मुख्यमंत्री झाले त्यामुळे आता शिवसेनेच्या आमदारांनी रडायचे कुणाकडे हा प्रश्न होता. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे सरकारमध्ये सहभागी झाले आणि संघटनेकडे दुर्लक्ष झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :JalgaonजळगावAditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाGulabrao Patilगुलाबराव पाटील