नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस
By Admin | Updated: June 30, 2014 14:05 IST2014-06-30T14:05:03+5:302014-06-30T14:05:03+5:30
महिन्यात राज्यात केवळ ४१ टक्केच पाऊस झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. राज्यात सर्वात कमी पाऊस नंदुरबार जिल्ह्यामध्ये पडला असून तो सरासरीपेक्षा ८९ टक्के कमी आहे.

नंदुरबार जिल्ह्यात सर्वात कमी पाऊस
पुणे : मान्सून दाखल होऊनही पाऊस गायब असल्याने राज्यात पूर्ण जून कोरडा गेला आहे. या महिन्यात राज्यात केवळ ४१ टक्केच पाऊस झाल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. राज्यात सर्वात कमी पाऊस नंदुरबार जिल्ह्यामध्ये पडला असून तो सरासरीपेक्षा ८९ टक्के कमी आहे. त्यापाठोपाठ हिंगोली जिल्ह्यात ८७ टक्के कमी पाऊस आणि मुंबईमध्ये ८६ टक्के कमी पाऊस पडला आहे. राज्यात इतर ठिकाणच्या तुलनेत सांगलीमध्ये चांगला पाऊस झाला असून तो सरासरीच्या ६८ टक्के इतका झाला आहे. त्यापाठोपाठ नागपूरमध्ये ६१ टक्के पाऊस झाला आहे. सर्वात ७५ टक्के कमी पाऊस मराठवाड्यात झाला आहे.