शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

काँग्रेस जळगाव जिल्ह्यात फिरविणार भाकरी ?

By अमित महाबळ | Updated: September 5, 2022 16:47 IST

वर्षानुवर्षे पक्षाला साथ देऊनही वरिष्ठांकडून अन्याय झाल्याची भावना माजी पदाधिकाऱ्यांमध्ये आहे.

जळगाव : काँग्रेसच्या जिल्हा प्रभारीपदी महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनायक देशमुख यांच्या नियुक्तीनंतर संघटनेत मोठ्या बदलांचे संकेत मिळत असून, आगामी निवडणुकांत भाकरी फिरविण्याच्या इरादा ठेवूनच पक्षाने देशमुख यांच्याकडे जळगावचा पदभार सोपविला असल्याचे कळते.

विनायक देशमुख ३२ वर्षे काँग्रेस संघटनेत कार्यरत असून, त्यांनी जिल्हा युवक काँग्रेस व जिल्हा काँग्रेस अध्यक्षपदावर काम केले आहे. प्रदेश सरचिटणीसपदाच्या कार्यकाळात त्यांनी धुळे, नंदुरबार, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचे प्रभारी म्हणून काम केले आहे. पक्षाच्या निष्ठावंतांमध्ये त्यांची गणना केली जाते. खा. राहुल गांधी यांच्या पदयात्रेचे महाराष्ट्रातील नियोजन त्यांच्याकडे आहे.

बजावली होती मोठी भूमिका२०१६ ते २०१९ या कालावधीत देशमुख यांच्याकडे जळगाव जिल्ह्याची जबाबदारी होती. याच काळात विधानसभा निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. विधानसभेला आ. शिरीष चौधरी निवडून आले. त्यांच्यामागे संघटनात्मक ताकद उभी करण्यात देशमुखांची आघाडी होती. मुक्ताईनगरमध्येही ते पक्षाच्या आदेशानुसार सक्रीय होते. नंतरचा इतिहास सगळ्यांनाच ठावूक आहे.

जागा खेचून आणली२०१९ मधील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्रदेश पातळीवरील नेते रावेर मतदारसंघाची जागा काँग्रेसला द्यायला इच्छूक नव्हते. विनायक देशमुख यांनी शेवटच्या क्षणापर्यंत पाठपुरावा करून ही जागा पक्षाकडे खेचून आणली होती. देशमुख यांचा जळगाव जिल्ह्याचा चांगला अभ्यास आहे. आता त्यांची पुन्हा जळगावच्या प्रभारीपदी नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीकडे मोठ्या आशेने पाहणारे अनेक जण आहेत.

धाडसी निर्णय घ्यावे लागणारपक्षात संघटनात्मक पातळीवर मतभेद आहेत. वर्षानुवर्षे पक्षाला साथ देऊनही वरिष्ठांकडून अन्याय झाल्याची भावना माजी पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. स्थानिक पातळीवरील निर्णय चुकल्याने गेल्या काही दिवसांत काँग्रेसला स्थानिक स्वराज्य संस्था व जिल्हा बँकेत आपल्या हक्काच्या जागा गमवाव्या लागल्या आहेत. त्यामुळे देशमुख यांना संघटनेसाठी काही धाडसी निर्णय घ्यावे लागणार आहेत.

ही होती चमकदार कामगिरीदेशमुख यांच्याकडे चार वर्षे जळगाव जिल्हा होता. त्यानंतर एक वर्ष त्यांनी धुळ्यात काम केले. २०२१ मध्ये पक्षाने त्यांच्याकडे सिंधुदुर्ग सोपवले. देशमुखांचा गृह जिल्हा अहमदनगर आहे. तेथून सिंधुदुर्गला जायचे झाल्यास १२ ते १४ तास लागतात. हे अंतर पार करून त्यांनी कुडाळची नगरपंचायत प्रथमच पक्षाला मिळवून दिली. त्यांची याआधीची कामगिरी पाहिल्यास जळगाव जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा व विधानसभा निवडणुकीत पक्षाला गतवैभव मिळवून देण्याची कामगिरी विनायक देशमुख पार पाडतील का हे पाहणे महत्वाचे राहणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसJalgaonजळगाव