शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 07:47 IST

रोजगार देऊ म्हणणारे आता कुठे आहेत?

चोपडा/ भुसावळ (जि. जळगाव) :  गेल्या दहा वर्षांत इंधनाचे भाव कमी होण्याऐवजी वाढतच  आहेत. शेतीमालाला भाव नाही, शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाहीत.  दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देऊ म्हणणारे आज त्या विषयावर बोलत नाहीत. सत्ता लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते.  मात्र, केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते शरद पवार  यांनी चोपडा येथे आयोजित सभेत केली.

 पवार म्हणाले की,  हमीभाव मिळावा म्हणून दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन केले.  वर्षभर ते आंदोलन चालले.  मात्र, तिथे जायला सत्ताधाऱ्यांना वेळ मिळाला नाही. उलट शेतकऱ्यांवर गोळ्या चालवल्या गेल्या. आंदोलनात ७०० शेतकऱ्यांनी आपले जीव गमावले; पण, सरकारला काहीही फरक पडला नाही. शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांची अशी अवस्था ही देशासाठी चांगली बाब नक्कीच नाही. 

भुसावळ येथे संतोषी माता सभागृहातही सभा झाली. तेथे शरद पवार म्हणाले, महागाईचे मुद्दे सोडून भाजप समाजात तेढ निर्माण करीत आहे.  जनतेला आता बदल हवा आहे. शासकीय यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे. देशात जे काही सुरू आहे ती लोकशाही महाराष्ट्राला मान्य नाही.

सरकारवर टीका केल्यास तुरुंगवास : पवार

या देशांमध्ये लोकशाही आहे, दिलेल्या अधिकारातून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे.  मात्र केंद्र सरकारवर टीका केल्यास तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागतो, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असल्याचे पवार म्हणाले.

केंद्र सरकारच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात अनेक तरुण बेरोजगार झाले, महागाई वाढली, याबद्दल कोणीही काही बोलत नाही किंवा जनतेची दिशाभूल करून हे सरकार लोकांना संभ्रमात टाकून शासन चालवत आहे. देशाची लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर  भाजपला देशातून हद्दपार करावेच लागेल, असेही पवार भुसावळमध्ये म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४