शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 07:47 IST

रोजगार देऊ म्हणणारे आता कुठे आहेत?

चोपडा/ भुसावळ (जि. जळगाव) :  गेल्या दहा वर्षांत इंधनाचे भाव कमी होण्याऐवजी वाढतच  आहेत. शेतीमालाला भाव नाही, शेतकरी आत्महत्या थांबायला तयार नाहीत.  दरवर्षी दोन कोटी तरुणांना रोजगार देऊ म्हणणारे आज त्या विषयावर बोलत नाहीत. सत्ता लोकांच्या भल्यासाठी वापरायची असते.  मात्र, केंद्र सरकारकडून सत्तेचा गैरवापर सुरू आहे, अशी टीका राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते शरद पवार  यांनी चोपडा येथे आयोजित सभेत केली.

 पवार म्हणाले की,  हमीभाव मिळावा म्हणून दिल्लीत शेतकऱ्यांनी आंदोलन केले.  वर्षभर ते आंदोलन चालले.  मात्र, तिथे जायला सत्ताधाऱ्यांना वेळ मिळाला नाही. उलट शेतकऱ्यांवर गोळ्या चालवल्या गेल्या. आंदोलनात ७०० शेतकऱ्यांनी आपले जीव गमावले; पण, सरकारला काहीही फरक पडला नाही. शेतीप्रधान देशात शेतकऱ्यांची अशी अवस्था ही देशासाठी चांगली बाब नक्कीच नाही. 

भुसावळ येथे संतोषी माता सभागृहातही सभा झाली. तेथे शरद पवार म्हणाले, महागाईचे मुद्दे सोडून भाजप समाजात तेढ निर्माण करीत आहे.  जनतेला आता बदल हवा आहे. शासकीय यंत्रणेचा गैरवापर सुरू आहे. देशात जे काही सुरू आहे ती लोकशाही महाराष्ट्राला मान्य नाही.

सरकारवर टीका केल्यास तुरुंगवास : पवार

या देशांमध्ये लोकशाही आहे, दिलेल्या अधिकारातून सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे.  मात्र केंद्र सरकारवर टीका केल्यास तुम्हाला तुरुंगवास भोगावा लागतो, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल असल्याचे पवार म्हणाले.

केंद्र सरकारच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात अनेक तरुण बेरोजगार झाले, महागाई वाढली, याबद्दल कोणीही काही बोलत नाही किंवा जनतेची दिशाभूल करून हे सरकार लोकांना संभ्रमात टाकून शासन चालवत आहे. देशाची लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर  भाजपला देशातून हद्दपार करावेच लागेल, असेही पवार भुसावळमध्ये म्हणाले.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४