शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनने दाखविला पर्यावरण संवर्धनाचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:33 IST

अजय पाटील, गेल्या एक दशकात मनुष्याने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. मात्र, प्रगतीचा वेग वाढवत असताना निसर्गाची मोठ्या प्रमाणात ...

अजय पाटील,

गेल्या एक दशकात मनुष्याने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली आहे. मात्र, प्रगतीचा वेग वाढवत असताना निसर्गाची मोठ्या प्रमाणात हानीदेखील काही दशकात होत गेली आहे. यामुळे हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होत जात असून, येत्या काळात मनुष्याला पर्यावरणाच्या मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागणार आहे. २०२० या वर्षाच्या सुरुवातीपासून संपूर्ण जगावर निर्माण झालेली ‘कोरोना’ची महामारीदेखील निसर्गाने मानवाविरोधात उगवलेला एकप्रकारे सूडच आहे. कोरोनाला रोखण्यासाठी मार्च २०२० पासून देशभरात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. हे लॉकडाऊन कोरोनाला आडा घालण्यासाठी जाहीर करण्यात आले असले तरी या लॉकडाऊनमुळे संपूर्ण जगालाच पर्यावरण संवर्धनाचा एक मार्ग सापडला आहे.

मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर कोरोनापासून तर बचाव झालाच, मात्र दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे पर्यावरणाचा होणारा ऱ्हासदेखील थांबविण्याचा एक मार्ग या लॉकडाऊनच्या काळात सापडला आहे. लॉकडाऊनच्या काळात जल, ध्वनी व वायुप्रदूषणात मोठी घट झालेली पहायला मिळाली. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असून, लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जात आहे. यामुळे जे लॉकडाऊनमध्ये कमावले ते गमावण्याची भीती निर्माण होत आहे. मात्र, पर्यावरण संवर्धन करायचे असेल तर महिन्यात एकवेळेस लॉकडाऊन पाळण्याची गरज आता निर्माण झाली आहे. यासाठी सर्वच स्तरातून पुढाकार घेण्याची गरज आहे. कोरोनामुळे जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे पर्यावरणाला मोठ्या प्रमाणात फायदा झाला. कोरोनाने जरी जगभरात धुमाकूळ घालून अनेकांचे बळी गेले असले तरी हा आजार मानवी समाजाला एक मोठी शिकवण देऊन गेला आहे. अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी जे प्रयत्न शासन, प्रशासन व पर्यावरण संघटनांकडून केले जात होते ते आज कोरोनामुळे जाहीर करण्यात आलेल्या लाॅकडाऊनने करून दाखवले.

मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर सर्वच प्रकारच्या प्रदूषणात मोठी घट झाली. जळगाव शहराचा विचार केल्यास मार्च ते जून महिन्यात प्रदूषणाचा स्तर १०० ते १२० पॉइंटवर आला होता, जो स्तर नेहमी २५० पर्यंत कायम होता. एप्रिल महिन्यात हा स्तर ६० पॉइंटपर्यंत खाली आला होता. लॉकडाऊनच्या काळातच कार्बन मोनोक्साईड, सल्फरडाय ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईडच्या प्रमाणात घट झाली होती. मानवाने ठरविले तर पर्यावरणाचे संवर्धन करता येऊ शकते. जून महिन्यानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानंतर प्रदूषणाचा स्तर पुन्हा वाढत आहे. लॉकडाऊनने दिलेला पर्यावरण संवर्धनाच्या मार्गावरून मानव पुन्हा भरकटत गेला तर भविष्यात येणाऱ्या पिढीला विनाशाशिवाय काहीही मिळणार नाही. कोरोनाने जरी हानी केली असली तरी या हानीतून नक्कीच बोध घेण्याची गरज आहे. कोरोनाने अनेक चांगल्या सवयीदेखील मानवाला लावल्या आहेत. आरोग्याची काळजी घेताना नागरिक बऱ्याच ठिकाणी सायकलचा वापर करू लागले आहेत. हा बदलदेखील पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. नागरिकांनी कोरोनाच्या भीतीने तीन महिने घरात स्वत:ला लॉकडाऊन करून घेतले होते. हवामान बदलामुळे होणारी हानी ही कोरोनापेक्षाही अधिक भयंकर स्वरुपाची असू शकते. त्यामुळे महिन्यात एक वेळेस जरी जनता कर्फ्यू पाळला तर बऱ्याच प्रमाणात निसर्ग परिणामी स्वत:चादेखील भविष्यात येणाऱ्या संकटांपासून बचाव होऊ शकतो.