शहरं
Join us  
Trending Stories
1
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
2
Uddhav Thackeray : "भाजपा कपट कारस्थान करणारा पक्ष, भाषिक प्रांतावादाचं विष...", उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
3
मुझम्मिलने ५ लाख रुपयांना AK-47 खरेदी केली, डीप फ्रीजरमध्ये ठेवली स्फोटके; धक्कादायक खुलासे
4
'लोकशाही अशीच असावी; भारतात...', ट्रम्प-ममदानी भेटीवर थरुर यांची पोस्ट; काँग्रेसला टोला?
5
​​​​​​​Kotak Mahindra Bank Success Story: २ खोल्यांपासून झाली सुरुवात, आज ४ लाख कोटींचा टर्नओव्हर; वाचा कोटक महिंद्रा बँकेची अनटोल्ड स्टोरी
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये चीनने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली, राफेलचीही बदनामी केली; अहवालात खुलासा
7
VIDEO : तिकडं स्टार्कचा अप्रतिम फ्लाइंग कॅच; इकडं नेटकऱ्यांनी KL राहुलची उडवली खिल्ली; कारण...
8
Astro Tips: कुंडलीतील गुरुचे स्थान निश्चित करते, तुम्हाला संसार सुख मिळणार की वैराग्य!
9
भयंकर! चालत्या कारला भीषण आग; जीव वाचवण्यासाठी लोकांनी मारल्या उड्या
10
सॅलरी कमी होणार, PF-ग्रॅच्युईटीमध्ये वाढ होणार? नोकरी करणाऱ्या लोकांसाठी अनेक गोष्टी बदलणार
11
जिल्ह्यातील नगरपालिकांमध्ये तडजोडी, आयात उमेदवार अन् फोडाफोडी; अजितदादांच्या ‘ताकदीच्या मर्यादा’ उघड
12
Video - "मी तुम्हाला आणि तुमच्या मुलीला मारून टाकेन"; प्रिन्सिपलची जीवे मारण्याची धमकी
13
‘या’ सरकारी बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या शर्यतीत दिग्गज बँक; अनेक दिवसांपासून सुरू आहे खासगीकरणाचा विचार
14
उपराष्ट्रपतीपद सोडल्यावर जगदीप धनखड पहिल्यांदाच बोलले, म्हणाले मला बोलायला...
15
Smriti Mandhana Haldi Ceremony : टीम इंडियाच्या 'राणी'च्या हळदी समारंभात संघातील साऱ्याजणींचा झिंगाट डान्स
16
ऑपरेशन सिंदूरनंतर काश्मीर खोऱ्यात दहशतवादी हालचालींना वेग; महत्त्वाची माहिती उघड...
17
दिल्लीत पाकिस्तानातून पाठवलेला शस्त्रांचा साठा जप्त; लॉरेन्स टोळीसह कुख्यात गुंडांना हत्यार पुरवणार होते
18
हृदयस्पर्शी! मेकअपला जाताना वधूचा अपघात; नवरदेवाने रुग्णालयातच केलं लग्न, घातलं मंगळसूत्र
19
"लोकशाही पायदळी तुडवून धमकावून राज्यात निवडणुका बिनविरोध होत आहेत", काँग्रेसची टीका
20
Delhi Blast : डॉक्टर गायब, सोशल मीडिया अकाउंट डिलीट; अल-फलाह युनिव्हर्सिटीबाबत धक्कादायक खुलासे
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलने : प्रतिभेची उर्जा स्थाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 16:09 IST

खान्देशरत्न बहिणाबाई चौधरी जिल्हास्तरीय मराठी साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे गेल्या आठवड्यात झाले. या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिक अशोक नीळकंठ सोनवणे यांनी ‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत विविध अंगांनी घेतलेला आढावा.

या महिन्यात काही जिल्हास्तरीय साहित्य संमेलनांची रेलचेल जळगाव जिल्ह्यात दिसत आहे. काहींना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाने हातभारही लावलेला दिसतो आहे. ग्रामीण भागात होणारी ही संमेलने नेमकी का आणि कुणासाठी भरवली जाताहेत?मायमराठीचा हा जागर, तिच्या बोली भाषांसह चोपडा, पाचोरा, अमळनेर आदी ठिकाणी होतोय तो केवळ शब्दोत्सव नसून या संमेलनांमधून ज्येष्ठ सारस्वतांचं दर्शन आणि मार्गदर्शन नेटकं व्हावं, हा या मागचा उद्देश असतो.सोबतच नव्याने लिहू लागलेल्या होतकरू हातांना उर्जा मिळावी, व्यक्त होण्याची संधी मिळावी, व्यासपीठ उपलब्ध व्हावं हाही हेतू असतो.प्रशंसा, प्रतिसाद यांच्या अपेक्षेने अनेकदा नवागत लेखक अशा संमेलनांना उत्साहाने हजेरी लावतात. त्यांचा हिरमोड, उत्साहभंग होऊ नये, याचा विचार किती आयोजक करतात? एकतर निमंत्रितांची भाऊगर्दी शिवाय वेळ आणि नियोजन यांचा मेळ नसतो.‘शहाणे करून सोडावे सकल जन’ एवढं थोर उद्दिष्ट या संमेलनांमधून अपेक्षित नसलं तरी मराठीची बऱ्यापैकी सेवा घडावी एवढी माफक अपेक्षा तर असूच शकते. संमेलनाध्यक्ष आणि विविध परिसंवादातील वक्त्यांकडून रसिकांप्रती काहीसं समाजभान असलेलं कल्याणकारी सांस्कृतिक संचित पोहचतं!परवाच्या खानदेशरत्न बहिणाबाई चौधरी मराठी साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून चोपड्याला अ.भा. नाट्य संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांनी म्हटलं की, ‘वेदना देणारी गोष्ट नाकारण्याचं धैर्य लेखकात असलं पाहिजे.’आणिबाणीच्या काळात झालेल्या अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा संकोच होताना स्व.दुर्गा भागवत आदींनी साहित्य संमेलनात केलेला तत्संबंधी विरोध आठवला आणि कला कुणाची बटीक नसते या त्यांच्या म्हणण्याला पुष्टी मिळाली.श्रोत्यांसह नवीन लेखकांचा उत्साह, जोम वाढवणारी, नेमकी दिशा देणारी ठाम वक्यव्ये हवीच. त्याचवेळी प्रादेशिक साहित्य राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी समग्रतेचं भान ठेवत कौटुंबिक जिव्हाळ्यात लेखनविषय अडकू देऊ नका, हा ज्येष्ठपणाचा सुयोग्य सल्ला दिला. प्रमुख अतिथी डॉ.केशव देशमुख यांनी सांस्कृतिक अभिसरणासाठी अशा संमेलनांची आवश्यकता असल्याचे सांगून लेखक जनते- सोबत असेल तरच जनता लेखकासोबत असते,हे पटवले. शेवटी साहित्यातून माणूस वगळता येत नाही हेच खरे!‘बोली भाषांचे मराठीला योगदान’ शीर्षकांतर्गत परिसंवादात महाराष्ट्र साहित्य परिषद पुणेचे कार्यवाह प्रा.वि.दा. पिंगळेंनी बोलीभाषा टिकवायची असेल तर तिच्याबद्दल जिव्हाळा हवा, केवळ अनुदान नाही, असे मत मांडल,े तर डॉ.मिलिंद बागुल यांनी अभिजन भाषेचा न्यूनगंड सोडून आपल्याला ओळख देणा-या बोलीभाषेतच संवाद साधावा, असा सल्ला दिला आणि अशोक सोनवणे यांनी बोलीभाषांना हीन लेखण्याने मराठीचीच हानी होते, हा भाषिक दहशतवाद असल्याचा निवार्ळा दिला.तात्पर्य- वैचारिक मंथनातून रसिकांसह श्रोत्यांमधील लेखकांचा साहित्यिक पिंडही जोपासला जाणे महत्त्वाचेच! म्हणून अशा लहान लहान साहित्य संमेलनांची गरज नक्की आहे.विचारसंपन्न होण्यासाठी, लेखक-कवींना आपली लेखन दिशा तपासण्यासाठी, वेळोवेळी ही संमेलने भाषा संवर्धनास्तव हवीच हवीत. प्रसंगी उत्तम लेखनाच्या पाठपुराव्यासाठी, पाठिंब्यासाठी, प्रोत्साहन हेतू अशी संमेलने म्हणजे प्रतिभेची उर्जास्त्रोतच!!ही सारी साहित्य संमेलने तर आयोजकांच्या प्रयत्नांची फलश्रुतीच असतात. अर्थप्राप्तीची साधने नसतात. साधन दाते, शासन, सामाजिक संस्था आदींनी संमेलन आयोजकांच्या पाठीशी नक्कीच उभं राहायला हवंय. लोकशाही आणि संस्कृती यांच्या उत्थानासाठी होणारे हे कलाप्रधान प्रयोग एका अर्थाने ज्ञानयज्ञच तर असतात. तरीही पदरमोड न करताही केवळ उपस्थिती, अशा संमेलनांना न देणे हे भणंगपण कैकदा बघायला मिळाले. सुशिक्षित जाऊ दे, पण मराठीचे अध्यापकही संमेलनांकडे फिरकत नाहीत याची खंत वाटते. त्यांना हा रिकाम टेकड्यांचा उद्योग वाटत असेल, तर इलाजच खुंटला! असो.समाज चिंतन, भाषा चिंतन, वाचन संस्कृतीची भलावण जोपासणाºया या संमेलनांमधून मनाची, लेखणीची जी सुदृढ बांधणी होते, ती वृद्धींगत होवो!हृदयात रसिकतेने जपलेला ओलावा साहित्यासाठी राखून ठेऊ या. प्रतिभेची ही सुखद उर्जा स्थाने बळकट करण्यासाठी...

अशोक नीळकंठ सोनवणे, चोपडा

टॅग्स :literatureसाहित्यChopdaचोपडा