शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
9
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
10
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
11
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
12
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
13
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
14
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
15
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
16
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
17
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
18
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
19
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!
20
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!

साहित्य हे मन स्वच्छ करण्याचे साधन  : कवी ना.धों.महानोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2020 6:34 PM

साहित्य हे माणसाचे जीवन घडवते. ते जीवन जगण्याला लायक बनवते. तुटलेल्या माणसाला उभे करण्याची ताकद साहित्य व कवितेमध्ये असते.

ठळक मुद्देभडगाव येथे केशवसुत ज्ञानप्रबोधिनी व्याख्यानमालेचे उद्घाटनप्रथम पुष्प प्रा.डॉ.प्रीती शिंदे यांनी गुंफले

भडगाव, जि.जळगाव : साहित्य हे माणसाचे जीवन घडवते. ते जीवन जगण्याला लायक बनवते. तुटलेल्या माणसाला उभे करण्याची ताकद साहित्य व कवितेमध्ये असते. म्हणून वाचन केले पाहिजे. घरात जसे देवघर असते तसे प्रत्येक घरात पुस्तक घर असावे. माणूस स्वत:चे शरीर स्वच्छ करण्यात मग्न आहे पण मन स्वच्छ करण्याकडे लक्ष देत नाही. पुस्तके व साहित्य हे मन स्वच्छ करणारे मुख्य साधन आहे, असे प्रतिपादन रानकवी ना.धों.महानोर यांनी केशवसुत ज्ञानप्रबोधिनी व्याख्यानमालेच्या उद्घाटनप्रसंगी केले.व्यासपीठावर अध्यक्षस्थानी किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन प्रतापराव पाटील, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखक सदानंद देशमुख प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. रौप्य महोत्सवी वर्षाचे उद्घाटन जाते फिरवून अनुष्का चव्हाण व व वेदश्री शिंपी या विद्यार्थिनींनी केले. याप्रसंगी नगरदेवळा येथील शाहीर शिवाजीराव पाटील यांनी महाराष्ट्राचा पोवाडा सादर केला तर पिंपळगाव येथील पंचरंगी कलापथक यांनी गोंधळ हा पारंपरिक लोक प्रकार सादर करून उपस्थितांची मने जिंकली.आपली भारतीय संस्कृती ही कृषि व ऋषीं संस्कृती आहे, त्यामुळे तिचे पालन आपण केले पाहिजे. त्यामुळे समाजाचे अध:पतन होणे टळेल. आज शेतकरी जीवनातील, शेतीतील आनंद विसरून चालला म्हणून तो आत्महत्या करण्यास प्रवृत्त होत आह. आपल्या काळ्या मातीची प्रामाणिकपणे सेवा केल्यास त्यास काहीही कमी पडणार नाही, असा आशावाद महानोरांनी व्यक्त केला.प्रा.सदानंद देशमुख यांनी आपली स्वकहाणी सांगून कवितेने मला ताठ मानेने उभे केले. कविता म्हणजे होरपळून निघणे आहे. चांगले पीक येण्यासाठी जसे जमिनीला चटके सहन करावे लागते तसे साहित्य निर्मितीसाठी साहित्यिक होरपळून निघावे लागते, असे मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक केशवसुत ज्ञानपबोधिनीचे अध्यक्ष विजय देशपांडे यांनी, तर सूत्रसंचालन सचिव प्रा.डॉ.दीपक मराठे यांनी केले.प्रथम पुष्प‘स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी’ या विषयावर व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प सांगली येथील वक्त्या प्रा.डॉ.प्रीती शिंदे यांनी गुंफले. ‘आई ही संयोजन, नि:स्वार्थ भावना, परोपकार, त्याग, प्रेम, वात्सल्य यांचे मूर्तिमंत प्रतीक आहे. आईची महती सांगताना त्यांनी अनेक उदाहरणं देऊन आईच्या त्यागाची व प्रेमाची बोधकथा सांगून सद्य:परिस्थितीत वृद्ध आई-वडिलांच्या महाराष्ट्रातील घटनांवर प्रकाश टाकला. त्यावेळी अनेक श्रोत्यांना अश्रू अनावर झाले. जगाच्या व्यासपीठावर आई हे असे एकमेव न्यायालय आहे, जेथे मुलाच्या सर्व गुन्ह्यांना माफ केले जाते म्हणून ज्यांनी आपणास सनाथ केले त्या आई-वडिलांना कधीही अनाथ करू नका, अशी कळकळीची विनंती त्यांनी केली. हे पुष्प पूनम प्रशांत पाटील व क्रीडा अधिकारी शेखर भीमराव पाटील यांनी आपल्या मातोश्री साधना पाटील व उषा पाटील यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ प्रायोजित केले होते .

टॅग्स :SocialसामाजिकBhadgaon भडगाव