शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

एक जिंदादिल माणूस, खेळकर व्यक्तिमत्त्व : दिवाकर श्रावण चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2019 01:15 IST

जळगाव जिल्ह्यातील डांभुर्णी (ता.यावल) येथील साहित्यिक दिवाकर श्रावण चौधरी यांचे गेल्या आठवड्यात निधन झाले. साहित्य वर्तुळ आणि मित्र परिवारात ते ‘दिवाकर दादा’ म्हणून परिचित होते. दिवाकर दादांच्या आठवणी सांगताहेत त्यांचे स्नेही प्राचार्य उल्हास सरोदे...

दिवाकर दादा मराठी साहित्यविश्वाला परिचित झाले ते 'स्किझोफ्रेनिया' या त्यांच्या आत्मकथनात्मक कादंबरीमुळे. मॅजेस्टिक प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या कादंबरीचे स्वागत झाले. पुढे याच कादंबरीची मराठी व हिंदी अनुवादीत आवृत्ती पेंग्विन हिंदी या मातब्बर प्रकाशन संस्थेने काढली. त्यांचे ज्येष्ठ बंधू कवी गणेश चौधरी यांना जडलेल्या स्किझोफ्रेनिया आजारामुळे त्यांच्या हातून बायको, मुलं यांची हत्या झाली. दिवाकर दादांच्या जीवनात या घटनेमुळे प्रचंड उलथापालथ झाली. पोलीस स्टेशन, कोर्ट-केस, जामीन, जन्मठेप, मनोरुग्णालय, त्यांची शुश्रूषा यातच त्यांच्या आयुष्यातला बराच काळ गेला. पण दादांनी खचून न जाता खंबीरपणे गणेश चौधरींचा सांभाळ केला.‘रानगवा’ खान्देशातील ज्येष्ठ साहित्यिक दिवाकर श्रावण चौधरी एक जिंदादिल माणूस. त्यांचे गेल्या आठवड्यात निधन झालं. जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील डांभुर्णी हे त्यांचं गाव. केळी बागायतीतील एक प्रगतशील शेतकरी, माजी सरपंच, निष्ठावान राजकारणी. १९९० आणि १९९५ला यावल विधानसभा मतदारसंघासाठी ते 'जनता दलाचे' उमेदवार होते. त्यांच्या रोखठोक वक्तव्यांमुळे त्यांच्या सभा फार गाजत.'तृषार्त' आणि ‘तृषार्त’नंतरच्या कविता' हे त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित केले. पैकी तृषार्तला त्या काळी शासनाचा पुरस्कार ही मिळाला होता. 'स्किझोफ्रेनिया' कादंबरीत हा सर्व पट त्यांना जिवंत उभा करण्यात यश आले आहे. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या एम.ए.मराठी वर्गाला ही कादंबरी अभ्यासक्रमात होती. अलीकडे त्यांनी 'बुर्ज्वागमन' ही कादंबरी लिहिली होती.या कादंबरीवर बुर्ज्वागमन हा वैभव मांगले अभिनीत मराठी चित्रपट ही आला. 'स्किझोफ्रेनिया' या कादंबरीवर सिनेमा करण्यासाठी अनेक दिग्दर्शकांनी त्यांना विचारणा केली, पण हा विषय सिनेमॅटिक होऊ नये म्हणून पटकथा स्वत: लिहिणार ही त्यांची अट होती, त्यांनी पटकथाही लिहिलेली आहे. त्यांच्या काही विद्रोही जाणिवेच्या कविता त्यांना मुखोद्गत होत्या, आमच्या फर्माईशवर त्या झरझर बाहेर यायच्या. नाटक आणि सिनेमाचेही ते रसिक होते.चळवळीशी कायम जुळलेल्या दादांनी खान्देशातील लिहिणाऱ्यांना कायम प्रोत्साहित केले. बाळकृष्ण सोनवणे, महेंद्र भास्करराव पाटील, रवींद्र भास्करराव पाटील, अजीम नवाज राही, अशोक कौतिक कोळी, गोपीचंद धनगर, रत्नाकर कोळी, मोरेश्वर सोनार, प्रफुल्ल पाटील, योगेश पाटील, विजय लुल्हे, भैया उपासनी, राया उपासनी, संजय हिंगोणेकर, शशिकांत हिंगोणेकर, सुरेश यशवंत, आटपडे, विनोद कुलकर्णी, हर्षल पाटील, यजुर्वेंद्र महाजन, आबा महाजन, अशोक कोतवाल ही साहित्यिक मंडळी दादांच्या कायम बैठकीतली. 'अनादी' हे नियतकालिक ही सुरू केलं होतं त्याचे काही अंक बाळकृष्ण सोनवणे यांनी संपादित केलेले आहेत. डॉ.विवेक चौधरी आणि पुरुजीत चौधरी ही त्यांची मुलं. दादांना माणसं जमवणं फार आवडायचं. आठवडाभर आमची भेट नाही झाली की ते आम्हाला फोन लावून बोलवून घ्यायचे. दवाखान्यातलीच एक एसी रुम कायमची आमच्यासारख्या मित्रांसाठी राखीव असायची. बोलीभाषेत बोललं पाहिजे आणि लिहिण्यातूनही बोलीला योग्य स्थान देण्याबाबत ते कायम आग्रही असत.बोलीचा हा आग्रह त्यांनी आजन्म पाळला. आम्हाला निरोप द्यायला ते दवाखान्यातून बाहेर यायचे, आमच्यासोबत रस्त्यावरल्या टपरीवर चहा घ्यायचे, त्यांना सिगारचं प्रचंड व्यसन म्हणजे चेनस्मोकरचं ते टपरीमागे जाऊन चोरून सिगारेट ओढायचे. त्यांच्या सिगार ओढण्यावर डॉक्टरांनी बंदी घातलेली होती पण आम्ही आलो की त्यांना हे बेहद्द आवडणारं व्यसन पूर्ण करता यायचं.भल्या पहाटे महेंद्रबापूंनी दादा गेल्याची बातमी दिली. आणि सर्व पट आठवला. गांधी टोपी आठवली. त्यांची सिगार ओढतानाची तल्लीन मुद्रा आठवली. त्यांचे 'टेरेफिक', 'बेस्ट', 'एक्सलंट' हे शब्द आठवले जे नेहमी आम्हाला दाद देताना वापरायचे. दिवाकरदादा तुम्ही आमच्या हृदयात कायम आहात.-प्राचार्य उल्हास सरोदे

टॅग्स :literatureसाहित्यYawalयावल