शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

गळकी जलवाहिनी गुरांसाठी ठरतेय जीवनदायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 19:39 IST

आशिया महामार्गावरील कोथळी बायपासवरील गळक्या पाइपलाइनवरील साचलेल्या डबक्यातील पाणी पिऊन शेकडो शेळ्या, मेंढ्या, गाई आपली तहान भागवत आहेत.

ठळक मुद्देकोथळी बायपासजवळील डबक्यातील पाणी भागवते मेंढ्या-गुरांची तहानचारा-पाण्यासाठी मेंढपाळांची भटकंती नित्याची

हरताळे, ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव : आशिया महामार्गावरील कोथळी बायपासवरील गळक्या पाइपलाइनवरील साचलेल्या डबक्यातील पाणी पिऊन शेकडो शेळ्या, मेंढ्या, गाई आपली तहान भागवत आहेत.शेतकरी ठिबकवर शेती करीत असल्याने पूर्वी वाहणारे पाणी आता कोठेच दिसत नाही. पूर्वी त्यावर पीक नसलेल्या ठिकाणी वाहणाऱ्या पाण्यावर शेळ्या-मेंढ्या, गाई पाणी पित असत. रानावनात भटकंती केल्यावर आपली आपली तहान भागवत असत. आता मात्र सर्वदूर सिंचन शेती असताना भटकंती करणाºया मेंढपाळ लोकांसह पशुपालकांना मोठी पायपीट करावी लागत आहे. सहा-सात किलोमीटर अंतरावर गेल्यावर शेळ्या-मेंढ्यांसह गाईंना सकाळच्या वेळी आणि दुपारच्या पाण्याची नितांत गरज असते. त्यासाठी मात्र पायपीट करावी लागत आहे. अशातच पाईप लाईनचे गळतीचे पाणी त्यांच्यासाठी जीवनदायी ठरले आहे.काठेवाडींवर संकटअशातच उदरनिर्वाहाचे साधन असलेले ठेलारी, गायी पाळणारे लोक यांना परिसरात रानोमाळ भटकत आपल्या पशुंची तहान भागवण्यासाठी कसरत करावी लागत आहे. विशिष्ट ठिकाणी जावून चटई करून पाण्यासाठी मात्र भटकंती करावी लागत आहे. अचानक सापडलेल्या डबक्यातील पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. गावात गावहाळावर गुरे पाणी पितात, मात्र रानोमाळ भटकणाºया मेंढापाळ लोकांच्या पशुधनाला रानोमाळ भटकंती करत साचलेल्या डबक्यात पाण्यावरच अवलंबून राहण्याची वेळ आहे. अनेक वेळा शेताच्या बांधावर पाणी मिळणे दुर्मीळ झाले आहे. मोठी जोखीम स्वीकारत, कधीकधी शेतकऱ्यांच्या नुकसानीला सामोरे जात. पशुंसाठी पोटच्या गोळयाप्रमाणे संगोपन करत शिव्याशाप खावे लागतात. मोठ्या संख्येने असलेल्या शेळ्या-मेंढ्या व गायींचे संगोपन करणे, त्यांच्या चारा पाण्यासाठी भटकणे हे फारच जिकिरीचे ठरत आहे.कांद्याची पात ठरते वरदानभटकून भटकून एखाद्या शेतात जर कांद्याची पात मिळाली तर तेवढेच फक्त मेंढ्यांना खायला मिळते. मात्र नुकतेच काट्या-बोराट्या ओढत पूर्ण शिवाराला वळसा घेऊन भुकेल्यापोटी मेंढ्यांना फिरावे लागत असल्याचे मेंढपाळ, गुराख्यांकडून सांगण्यात आले. शेतात चारा उपलब्ध नाही. पावसाळ्याला अजून महिन्यावर कालावधी बाकी आहे. अशा परिस्थितीत चारा विकत घेणे कठीण आहे. पशुंंना काय खाऊ घालावे याची चिंता पशुपालकांना चिंता लागली आहे.शेतात मेंढ्या बसवण्यासाठी शोधाशोध, एखाद्या शेतकºयाच्या शेतात चारा असला तर रात्र बसवण्यासाठी खूपच परिश्रम करावे लागत असल्याचे त्यांनी सांगितले. काही ठिकाणी कांद्याची पात मिळाली तर तेवढेच फक्त मेंढ्यांना खायला मिळते. नाही तर रानोमाळ भटकत असताना जंगलातील काहीच मिळत नाही. त्यावरच अवलंबून रहावे लागते. चारा-पाण्याचा लाभ मिळावा, हीच अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यातच ठरलेली पाईपलाईनची गळती मात्र जीवनदायी ठरली आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMuktainagarमुक्ताईनगर