शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

आणि बिबटय़ा दिसल्याच्या अफवांना बसला लगाम..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 6:52 PM

अमळनेर तालुक्यातील ग्रामीण भागात दररोज सोशल मीडियावर बिबटय़ा दिसल्याच्या अफवा आणि चर्चेला ऊत आला होता, त्यामुळे शेतमजुर व शेतक:यांनी शेतात जाणे बंद केले होते, बिबटय़ाच्या चर्चेने ग्रामीण जीवन अक्षरश: होरपळून निघाले होते, परंतु नुकतेच चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घालणा:या या बिबटय़ाला कंठस्नान घातल्याने जनता आणि वनविभागाने सुटकेचा श्वास सोडला आहे.

ठळक मुद्देसोशल मीडियामधून अफवांना आला होता ऊतअफवांनी ग्रामीण जनजीवन होरपळून निघत असतांना वनविभागाचीही झाली दमछाकबिबटय़ाला ठार केल्याच्या वार्तेने अमळनेर तालुक्याला मिळाला दिलासा

ऑनलाईन लोकमत अमळनेर, दि.11 : चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घालत महिला आणि बालकांचे बळी घेणा:या बिबटय़ाला वरखेडे येथे ठार करण्यात आल्याचे कळताच सर्वाधिक दिलासा मिळाला तो अमळनेर तालुक्याला. दररोज तालुक्याच्या वेगवेगळ्या भागातून बिबटय़ा दिसल्याची वार्ता सोशल मीडियातून पसरवली जात होती. त्यामुळे जनतेमध्ये नेहमी भिती असायची, दिवसागणिक बिबटय़ांच्या अफवांनी लोकांचे जगणे मुष्कील करून टाकले होते, परंतु बिबटय़ाला यमसदनी पाठविण्यात आल्यामुळे आपोआप या अफवा आणि चर्चेला लगाम लागला आहे. यामुळे वन विभागानेदेखील सुटकेचा श्वास सोडला आहे. बिबटय़ाने चाळीसगाव तालुक्यात धुमाकूळ घातल्यानंतर तो अमळनेर तालुक्यातही शिरल्याची दहा - बारा दिवसांपूर्वीपासून चर्चा होती. दररोज यासंदर्भात येणा:या बातम्यांनी मनोरंजन कमी आणि भीतीच जास्त वाटत होती. अमळनेर तालुक्यात वेगवेगळ्या भागात बिबटय़ा दिसल्याच्या अफवाना अक्षरश: ऊत आला होता. प्रत्येकाच्या हातात मोबाईल असल्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील या अफवाना खतपाणी घातले जात होते, तालुक्यातील पिंपळे बु, मंगरूळ, जवखेडा, खेडी- खवशी आणि अमळनेर , पळासदडे शिवारात बिबटय़ा दिसल्याच्या अफवा सारख्या येत होत्या, त्यामुळे वन विभागाचे कर्मचारीही वेळी अवेळी ठिकठिकाणी जाऊन शोध घेत होते. आणि अमळनेर परिसरात बिबटय़ा नाही, तडस, लांडगे, कोल्हे यासारखे प्राणी आहेत असे सांगत होते, माहिती पत्रकदेखील वाटत होते. मात्र तरीही रोज वेगवेगळ्या भागातून बिबटय़ा दिसल्याची अफवा येतच होत्या. त्यामुळे भीतीपोटी मजूर शेतात येत नव्हते, परिणामी ग्रामीण भागातील जनजीवन होरपळून निघाले होते. तालुक्यात बिबटय़ा नसतांनाही मात्र नागरिकांच्या मनातून भीती काही जात नव्हती, त्यामुळे वन विभागही मेटाकुटीला आला होता. भयाने व्यापलेल्या अशा स्थितीत बिबटय़ाला कंठस्नान घातल्याची वार्ता शनिवारी रात्री सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरताच तालुक्यातील जनता आणि प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला. त्यानंतर मात्र तालुक्यातून एकाही गावातून बिबटय़ा दिसल्याची बातमी आली नाही अथवा अफवा देखील पसरवली गेली नाही. परंतु पुन्हा एकदा सोशल मीडिया लोकांसाठी कसा त्रासदायक ठरू पाहत आहे, त्याचे प्रत्यंत्तर मात्र चांगलेच घडले.