शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
3
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
4
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
5
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
6
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
7
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
8
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
9
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
10
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
11
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
12
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
13
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
14
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
15
Akshaya Tritiya 2024: चैत्रगौरीला निरोप देताना कुंकवाची पावलं काढा आणि 'पुनरागमनायच' म्हणा; कारण...
16
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
17
'ही' साऊथ अभिनेत्री, जी प्रेमासाठी बनली वयानं २७ वर्ष मोठ्या असलेल्या माजी CM ची दुसरी पत्नी
18
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
19
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
20
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी

गिरणा धरणातून जामदा कालव्यासाठी आवर्तन सोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 8:52 PM

गिरणा धरणातून जामदा उजवा व डाव्या कालव्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे. तसेच नदीजोड प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार मुकेश हिवाळे यांना देण्यात आले.

ठळक मुद्देशेतकरी संघटनेची मागणीतहसीलदारांना दिले निवेदन

भडगाव, जि.जळगाव : गिरणा धरणातून जामदा उजवा व डाव्या कालव्यासाठी पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे. तसेच नदीजोड प्रकल्पाचे काम त्वरित सुरू करण्यात यावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन तहसीलदार मुकेश हिवाळे यांना देण्यात आले.याबाबत प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यात पाणीटंचाई बिकट आहे. शासनाला नारपार योजनेचे कामे सुरू करण्याबाबत अनेकदा निवेदनेही दिलेली आहेत. तरी मागणी करुनही शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. गिरणा धरणाचे पाणी सन १९७६ ते १९७७ याकाळात बारमाही चालणारे धरण एकही रोटेशन चालवू शकत नाही. शासनाने मागचे रेकॉर्ड पाहून काम केले पाहिजे. प्रश्न सोडविले पाहिजे. नारपार योजनेच्या कामांची वेळोवेळी मागणीही केलेली आहे. एकीकडे केंद्रीय जलसंपदा मंत्री नितीन गडकरी मुख्यमंत्र्यांना सिंचनासाठी निधी वाढवा असे म्हणाले होते. तरी अजूनही काही कामे सुरू झाली नाहीत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन २८ जानेवारी रोजी नदीजोड प्रकल्प हाती घेणार असल्याचे म्हणाले होते. परंतु अजूनही नारपारचे काम सुरू झाले नाही. शासनामार्फत घोषणा होऊनही दुर्लक्षच होत आहे, असेही निवेदनात नमूद केले आहे.निवेदन देताना शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अभिमन हटकर, तालुका उपाध्यक्ष विलास देशमुख, विजय पाटील, शहराध्यक्ष भगवान चौधरी, गोविंद नरवाडे, अरुण पाटील, जगन्नाथ मोरे, यादव मराठे, हरी राठोड आदी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी तसेच शेतकरी शिवसेना तालुकाप्रमुख अनिल पाटील, घुसर्डी खुर्दचे पोपट पाटील, भीमराव पाटील, विजय पाटील लोणपिराचे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईBhadgaon भडगाव