शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: मतदारांचा उत्साह; सकाळपासूनच लांब रांगा
2
आजचे राशीभविष्य: धनलाभ, मान-सन्मान लाभतील; व्यापार वृद्धी, यशकीर्तीचा आनंदी दिवस
3
राज्यातील अखेरचा टप्पा; वाढवा मतदानाचा टक्का; महाराष्ट्रातील १३ जागांसह देशातील ४९ मतदारसंघांत आज मतदान
4
Lok sabha election 2024: अक्षयकुमार ते जान्हवी कपूर! कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क
5
EPFO नं क्लेम सेटलमेंट नियमांत केला बदल, Aadhaar डिटेल्स शिवायही होणार 'हे' काम
6
नृसिंह जयंती: ७ राशींना सौभाग्याचा काळ, संचित धनवृद्धी; यश-प्रगती संधी, महादेवही शुभ करतील!
7
खूशखबर! मान्सून आला रे... अंदमान-निकोबारमध्ये धडक, ३१ मेपर्यंत केरळमध्ये, या तारखेला पोहोचणार महाराष्ट्रात
8
राहुल, अखिलेश यांच्या प्रचारसभेत गोंधळ; नेत्यांना भेटण्यासाठी उत्साहाच्या भरात लोक बॅरिकेड्स तोडून मंचावर  
9
चप्पल व्यापाऱ्याकडे छापा; नोटा पाहून अधिकारी थक्क, ४० कोटींची रोकड जप्त! 
10
सेक्स स्कॅण्डल : प्रज्वलविरोधात अटक वॉरंट
11
‘आप’ला चिरडण्याचे कारस्थान; भाजपने सुरू केले ‘ऑपरेशन ब्रूम’; केजरीवाल यांचा आरोप
12
जलदगतीने वजन कमी करणे आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक, औषधांचा वापर टाळण्याचे आयसीएमआरचे आवाहन
13
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
14
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
15
बिल्डरच्या १७ वर्षीय मुलाने घेतला दाेघांचा बळी
16
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
17
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
18
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
19
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
20
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 

वीर जवान जितेंद्र पाटीलला धरणगाव येथे "अमर रहे"च्या जयघोषाने अखेरचा निरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2018 10:21 PM

जम्मू-काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना वीर मरण आलेल्या आर्मीच्या जवान जितेंद्र मोहन पाटील (पानपाटील) यांना ८ रोजी धरणगावला भव्य "शहीद मिरवणूक" काढून अखेरचा निरोप देण्यात आला.

जळगाव (धरणगाव)- जम्मू-काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना वीर मरण आलेल्या आर्मीच्या जवान जितेंद्र मोहन पाटील (पानपाटील) यांना ८ रोजी धरणगावला भव्य "शहीद मिरवणूक" काढून अखेरचा निरोप देण्यात आला. या मिरवणुकीत महिलांसह गर्दीचा पूर लोटला होता. शहीद जवान अमर रहे च्या जयघोषाने शहर दणाणून गेले होते. त्यामुळे राष्ट्रभक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.रहिवासी तथा गेल्या १५ वर्षापासून आर्मीत सेवा बजावणाय्रा वीर जवान जितेंद्र मोहन पाटील हे जम्मू-काश्मीर मध्ये सेवा बजावताना ५ रोजी मृत्यू झाल्यानंतर ८ रोजी त्यांचे पार्थीव धरणगावला आणण्यात आले. नगरपालीकेच्या व नगरवासीयांच्या सहकार्याने भव्य रामरथ सजविण्यात आले होते. मार्गावर रांगोळ्या व फुलांचे आच्छादन करण्यात आले होते. येथील एरंडोल रोडवरील साईबाबा नगर मधून त्यांची शहीद अंत्ययाञा मिरवणूक काढण्यात आली. उड्डाण पुलावरून बाबासाहेब आंबेडकर व छञपती शिवराय यांच्या पुतळ्यांना भेटी देऊन अमरधामात  "शहीद जवान अमर रहे" या जयघोषाने नेण्यात आले. शहीद जितेंद्र पाटील यांना मानवंदना देवून पुष्पचक्र अर्पण केले. पोलिसांनी तीन फैरी झाडून सलामी दिली. यावेळी प्रशासनातर्फे प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी शोकभावना व्यक्त केली.तसेच  सहकार राज्य मंञी गुलाबराव पाटील, माजी मंञी गुलाबराव देवकर, डी.जी.पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ, समरसता मंचचे प्रांत संघटक प्रा.रमेश महाजन,भाजपाचे तालुका अध्यक्ष संजय महाजन, माजी नगराध्यक्ष पी.एम.पाटील यांनी शोक भावना व्यक्त करुन शहीद जितेंद्र हे तालुक्याचा नव्हे तर देशाचा अभिमान असल्याचे मत व्यक्त केले. धरणगाव शहरात पहिल्यांदाच शहीद मिरवणूक निघाल्याने शहरातील अबाल वृद्धांनी, महिलांनी यात सहभाग नोंदविला. नगरपालिका, नगरसेवक व विविध संस्था, संघटनांनी या मिरवणुकीवर पुष्षवृष्टी केल्याने रस्त्यावर फुलांचा खच पडला होता. शहीद अमर रहेच्या जयघोषाने शहर दणाणले होते.