शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

भगिनींनो, सक्षम होऊ या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 10:44 PM

‘लोकमत’च्या मंथन पुरवणीत नवीन वर्षाचे स्वागत करताना महिलांच्या संदर्भात चाळीसगाव येथील वकील तथा साहित्यिक सुषमा जयंत पाटील यांनी घेतलेला आढावा.

काही कटू, तर काही सुखद घटनांचा लेखाजोखा देत २०१९ हे वर्ष पाठमोरं होत आहे. ‘निरोप मावळत्याला, स्वागत उगवत्याचे’ या न्यायाने आपण नववर्षाच्या स्वागताला सज्ज झालो आहोत. प्रत्येक सरणारी घटिका ही तथाकथित सुखद, दु:खद किंवा संमिश्र भावनांचे पडसाद आणि काही आव्हानांची नांदी मागे ठेवून जात असते. त्या अनुषंगाने प्रत्येकानेच स्वत:ला अधिक सक्षम आणि प्रबळ बनविण्याची गरज असते.महिलांच्या दृष्टिकोनातून २०१९ ह्या कालखंडाचा मागोवा घेताना काही घटना ह्या निश्चितच समस्त महिलावर्गाच्या मनोबलाचं खच्चीकरण करणाऱ्या घडल्या आहेत.जी भारतीय स्त्री लोकसंख्येचा ५० टक्के भाग व्यापून आहे, अर्ध आकाश जिचं आहे आणि जी स्त्री सर्वच क्षेत्रांत उत्तुंग भरारी घेण्यास सर्वार्थाने सज्ज आहे तीच स्त्री जेव्हा सामूहिक झुंडशाही, पाशवी बलात्कार आणि हत्या, अ‍ॅसिड हल्ले, आॅनर किलिंग, लैंगिक अत्याचार, हुंडाबळी यासारख्या घटनांना बळी पडते तेव्हा महिला सुरक्षिततेचा प्रश्न हा ज्वलंत सामाजिक प्रश्न बनून ऐरणीवर येतो. व्यक्ती म्हणून निकोपपणे जगणही हिरावून घेत मानवतेला काळिमा फासणाºया अलिकडल्या काळातील उन्नाव व हैदराबादच्या पाशवी बलात्कार व हत्येच्या घटनांनी संपूर्ण देश हादरून टाकला आहे.हा क्षोभ, ही वेदना क्षणिक ठरू नये. समष्टीचं जगणं आणि भोगणं जेव्हा सर्वव्यापी होईल तेव्हाच अत्याचार पीडिता ही कुणा दुसºयाची मुलगी ही भावनाच संपून जाईल. त्या दुखाची तीव्रता ही समस्त स्त्री वर्गाची व्याप्ती होईल. आणी स्त्री वर्ग प्रचंड मोठ्या संख्येने संघटित होऊन लढा उभारेल तेव्हाच कायद्याला ढील देणाºया सरकारलादेखील पळता भुई थोडी होईल. २०१२ मधे घडलेल्या दिल्लीतील निर्भया बलात्कार पीडितेला अजून न्याय मिळालेला नाही. आरोप सिद्ध होऊनही सात वर्षांनंतरही आरोपींना फाशीची शिक्षा झालेली नाही हे समाजस्वास्थाला हितकारक नाही. असे असताना कठोर कायद्याचा अभाव व न्यायप्रकियेला विलंब ही कारणं खचितच समर्थनिय नाहीत. आपल्याला लोकशाहीने जनआंदोलन, मोर्चे ही प्रभावी आयुधं दिलेली आहेत. जनक्षोभाचा परिपाक आपण हैदराबादमध्ये बघितला आहे. आंध्र सरकारने बलात्कारप्रकरणी पंधरा दिवसात न्यायालयीन निवाडा व्हावा, हा कायदा संमत केला आहे. आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेदेखील या दिशेने पाऊल उचलण्यासाठी सकारात्मक आहेत. राजकीय इच्छाशक्ती दबाव तंत्रापुढे झुकते हे सत्य आहे. संपूर्ण देशात हा कायदा लागू झाला पाहिजे. म्हणून महिलांनी संघटित होऊन प्रबळ असा दबाव गट निर्माण करून समर्थपणे चळवळी उभारणे ही काळाची गरज आहे. ‘सामर्थ्य आहे चळवळीचे, जो धजेल तयाचे’ हा बोधमंत्र घेऊन अधिक आत्मनिर्भय होऊया. नववर्षात अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी मजबूतपणे संघटित होऊ या.-अ‍ॅड.सुषमा जयंत पाटील, चाळीसगाव, जि.जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यChalisgaonचाळीसगाव