शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

‘गुड बोला गोड बोला’ : सणांच्या माध्यमातून कृषीजीवन बहरून येते - कृषीभूषण विश्वासराव पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 14:36 IST

मकरसंक्रांत या सणांंच्या माध्यमातून शेती जीवन अनंत अंगांनी बहरून येत

लोहारा, ता.पाचोरा : भारतीय संस्कृतीचाच एक भाग म्हणून विजयादशमी, दीपावली, अक्षय्यतृतीया त्याचप्रमाणे मकरसंक्रांत या सणांंच्या माध्यमातून शेती जीवन अनंत अंगांनी बहरून येते. त्यानिमित्ताने नवा उत्साह नवचैतन्य यामुळे ग्रामीण भागातील लोकजीवन अक्षरश: ढवळून निघत असते, असे लोहारा, ता.पाचोरा येथील रहिवासी तथा कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी विश्वासराव पाटील यांनी सांगितले.मकरसंक्रांतीच्या पर्वावर ‘गुड बोला गोड बोला’ यावर ते आपली भूमिका मांडत होते. या सणांच्या माध्यमातून जो गोडवा निर्माण होतो त्यामुळेच आपली संस्कृती अनादी काळापासून टिकून आहे व ती सदैव टिकून राहील हे निश्चित.या विश्वात अनेक संस्कृती आल्या-गेल्या, परंतु भारतीय संस्कृती ही गौतम बुद्ध असो, महात्मा गांधी असो,भगवद् गीता असो किंवा ज्ञानोबा, एकोबा, तुकोबा या सर्वांनी आपल्या वाणीतून व कृतीतून गोडवा निर्माण केलेला असल्याने टिकून आहे. शेतीमध्ये प्रत्येक दिवशी अनेक संक्रमणे होत आहेत. पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. तरीसुद्धा शेतकरी व शेतमजूर यांचे गोड संबंध अनादी काळापासून आजपर्यंत टिकून आहे.‘लोकमत’ने ‘गुड बोला’ ‘गोड बोला’ या सदराच्या माध्यमातून देश जोडण्याचे जे कार्य सुरू केले आहे. असे असले तरी माझ्या दृष्टीने हे कार्य संपूर्ण विश्व जोडण्याचे कार्य आहे. दया, क्षमा, शांती यावरच भारतीय संस्कृती उभी आहे. तिला उजळून देण्याचे कार्य ‘लोकमत’ करीत आहे, असेच यानिमित्ताने सांगावेसे वाटते.

टॅग्स :Makar Sankranti 2018मकर संक्रांती २०१८Jalgaonजळगाव