शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

जाणून घ्या खान्देशच्या भूमीवर कुणाची होती मालकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 19:11 IST

बहामनींना मिळविता आला नाही कधीही खान्देशचा भूभाग

ठळक मुद्देफारूकी राजवटीत थाळनेरला मुख्यालययादवांचे मांडलिक निकुंभांची अधिसत्ताखान्देशचा ‘सिपाह-सालार किताब

विलास बारी /आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१ : खान्देशात १३४७ मध्ये बहामनी राजसत्ता स्थापन झाल्यानंतर दक्षिणेत एक प्रभावी राजवंश उदयाला आला. नंदुरबार व सुलतानपूर ‘सरकार’ वगळता खान्देशचा सर्व भाग दिल्लीच्या सुलतानांकडेच राहिला. त्यामुळे बहामनींना खान्देश मिळविता आला नाही. त्यामुळे खान्देशची खरी सूत्रे असीरगडच्या अधिपतीकडेच राहिली. या भूभागावर यादव, खजली व नंतर तुघलकांची सार्वभौम सत्ता असली तरी प्रत्यक्ष मालकी स्थानिक निकुंभ, अहीर व राजपूत अधिपतींकडे होती.फारूकी राजवटीत थाळनेरला मुख्यालयदिल्लीचा सुलतान फिरोजशहा तुघलक याने थाळनेरचा भाग १३७० मध्ये मलिक राजा याला जहागिरी दाखल दिला. मलिक राजाने तुघलकाची मर्जी केवळ एका लहानशा सेवेच्या बदल्यात मिळविली होती. दौलताबादचे सुफी संत शेख झैनुद्दीन यांनी या कामी मलिक राजाला मदत केली. या मदतीमुळे संपूर्ण फारूकी घराणे या सुफी संताचे चाहते झाले होते. जहागिरीची सनद दिल्ली येथून आणून मलिक राजाने विद्यमान धुळे जिल्ह्यातील थाळनेरला आपले मुख्यालय उभारले.

यादवांचे मांडलिक निकुंभांची अधिसत्तामलिक राजाने सावकाशपणे येथील अधिपतींना संपुष्टात आणून आपली सत्ता वाढविली. पूर्वेकडील वाघळीला एक राजपूत अधिपती अधिकारूढ होते. पितळखोरा टेकड्यांचा पायथा व कसारबारी घाटालगतच्या भागावर पूर्वी यादवांचे मांडलिक असलेल्या निकुंभांची अधिसत्ता होती. पूर्वेकडील भागावर गवळी राजा आसा अहीर यांची सत्ता असावी. थाळनेरच्या उत्तरेकडील सोनगरीवर दुसºया राजपुतांची सत्ता होती. कालांतराने सर्व अधिपतींनी फारूकीचे मांडलिकत्व पत्करले.

खान्देशचा ‘सिपाह-सालार किताबथाळनेर व कुरुंदोचा ताबा घेतल्यानंतर मलिक राजाला बागलाणच्या वहीजी नामक अधिपतीशी सामना करावा लागला. मात्र या मोहिमेत मलिकला हत्ती व प्रचंड धनप्राप्ती झाली. ही लूट मलिकने राजा फिरोजशहा तुघलकाकडे पाठविली. फिरोजशहा यांनी खुश होऊन मलिकला बढती देऊन खान्देशचा ‘सिपाह-सालार’ हा किताब दिला. १३८२ मध्ये फिरोजशहा तुघलक वार्धक्याने कमकुवत झाल्याने मलिक राजाने दिल्लीस खंडणी पाठविणे बंद करीत आपले स्वातंत्र्य घोषित केले.खान्देशच्या सुपीक प्रदेशावरून वादखान्देशच्या सुपीक प्रदेशावरून गुजरात व फारुकींचे वारंवार वाद निर्माण होत होते. ते थांबविण्यासाठी मलिक राजा फारूकीने आपल्या मुलीचे लग्न माळव्याच्या दिलावर खान यांच्या मुलीसोबत केले. तसेच आपल्या मुलाचा विवाह दिलावरच्या मुलीसोबत लावून दिला होता. या परस्पर विवाहसंबधांमुळे फारूकींचे स्थान बळकट झाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव