शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या खान्देशच्या भूमीवर कुणाची होती मालकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 19:11 IST

बहामनींना मिळविता आला नाही कधीही खान्देशचा भूभाग

ठळक मुद्देफारूकी राजवटीत थाळनेरला मुख्यालययादवांचे मांडलिक निकुंभांची अधिसत्ताखान्देशचा ‘सिपाह-सालार किताब

विलास बारी /आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१ : खान्देशात १३४७ मध्ये बहामनी राजसत्ता स्थापन झाल्यानंतर दक्षिणेत एक प्रभावी राजवंश उदयाला आला. नंदुरबार व सुलतानपूर ‘सरकार’ वगळता खान्देशचा सर्व भाग दिल्लीच्या सुलतानांकडेच राहिला. त्यामुळे बहामनींना खान्देश मिळविता आला नाही. त्यामुळे खान्देशची खरी सूत्रे असीरगडच्या अधिपतीकडेच राहिली. या भूभागावर यादव, खजली व नंतर तुघलकांची सार्वभौम सत्ता असली तरी प्रत्यक्ष मालकी स्थानिक निकुंभ, अहीर व राजपूत अधिपतींकडे होती.फारूकी राजवटीत थाळनेरला मुख्यालयदिल्लीचा सुलतान फिरोजशहा तुघलक याने थाळनेरचा भाग १३७० मध्ये मलिक राजा याला जहागिरी दाखल दिला. मलिक राजाने तुघलकाची मर्जी केवळ एका लहानशा सेवेच्या बदल्यात मिळविली होती. दौलताबादचे सुफी संत शेख झैनुद्दीन यांनी या कामी मलिक राजाला मदत केली. या मदतीमुळे संपूर्ण फारूकी घराणे या सुफी संताचे चाहते झाले होते. जहागिरीची सनद दिल्ली येथून आणून मलिक राजाने विद्यमान धुळे जिल्ह्यातील थाळनेरला आपले मुख्यालय उभारले.

यादवांचे मांडलिक निकुंभांची अधिसत्तामलिक राजाने सावकाशपणे येथील अधिपतींना संपुष्टात आणून आपली सत्ता वाढविली. पूर्वेकडील वाघळीला एक राजपूत अधिपती अधिकारूढ होते. पितळखोरा टेकड्यांचा पायथा व कसारबारी घाटालगतच्या भागावर पूर्वी यादवांचे मांडलिक असलेल्या निकुंभांची अधिसत्ता होती. पूर्वेकडील भागावर गवळी राजा आसा अहीर यांची सत्ता असावी. थाळनेरच्या उत्तरेकडील सोनगरीवर दुसºया राजपुतांची सत्ता होती. कालांतराने सर्व अधिपतींनी फारूकीचे मांडलिकत्व पत्करले.

खान्देशचा ‘सिपाह-सालार किताबथाळनेर व कुरुंदोचा ताबा घेतल्यानंतर मलिक राजाला बागलाणच्या वहीजी नामक अधिपतीशी सामना करावा लागला. मात्र या मोहिमेत मलिकला हत्ती व प्रचंड धनप्राप्ती झाली. ही लूट मलिकने राजा फिरोजशहा तुघलकाकडे पाठविली. फिरोजशहा यांनी खुश होऊन मलिकला बढती देऊन खान्देशचा ‘सिपाह-सालार’ हा किताब दिला. १३८२ मध्ये फिरोजशहा तुघलक वार्धक्याने कमकुवत झाल्याने मलिक राजाने दिल्लीस खंडणी पाठविणे बंद करीत आपले स्वातंत्र्य घोषित केले.खान्देशच्या सुपीक प्रदेशावरून वादखान्देशच्या सुपीक प्रदेशावरून गुजरात व फारुकींचे वारंवार वाद निर्माण होत होते. ते थांबविण्यासाठी मलिक राजा फारूकीने आपल्या मुलीचे लग्न माळव्याच्या दिलावर खान यांच्या मुलीसोबत केले. तसेच आपल्या मुलाचा विवाह दिलावरच्या मुलीसोबत लावून दिला होता. या परस्पर विवाहसंबधांमुळे फारूकींचे स्थान बळकट झाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव