शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

जाणून घ्या खान्देशच्या भूमीवर कुणाची होती मालकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2018 19:11 IST

बहामनींना मिळविता आला नाही कधीही खान्देशचा भूभाग

ठळक मुद्देफारूकी राजवटीत थाळनेरला मुख्यालययादवांचे मांडलिक निकुंभांची अधिसत्ताखान्देशचा ‘सिपाह-सालार किताब

विलास बारी /आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१ : खान्देशात १३४७ मध्ये बहामनी राजसत्ता स्थापन झाल्यानंतर दक्षिणेत एक प्रभावी राजवंश उदयाला आला. नंदुरबार व सुलतानपूर ‘सरकार’ वगळता खान्देशचा सर्व भाग दिल्लीच्या सुलतानांकडेच राहिला. त्यामुळे बहामनींना खान्देश मिळविता आला नाही. त्यामुळे खान्देशची खरी सूत्रे असीरगडच्या अधिपतीकडेच राहिली. या भूभागावर यादव, खजली व नंतर तुघलकांची सार्वभौम सत्ता असली तरी प्रत्यक्ष मालकी स्थानिक निकुंभ, अहीर व राजपूत अधिपतींकडे होती.फारूकी राजवटीत थाळनेरला मुख्यालयदिल्लीचा सुलतान फिरोजशहा तुघलक याने थाळनेरचा भाग १३७० मध्ये मलिक राजा याला जहागिरी दाखल दिला. मलिक राजाने तुघलकाची मर्जी केवळ एका लहानशा सेवेच्या बदल्यात मिळविली होती. दौलताबादचे सुफी संत शेख झैनुद्दीन यांनी या कामी मलिक राजाला मदत केली. या मदतीमुळे संपूर्ण फारूकी घराणे या सुफी संताचे चाहते झाले होते. जहागिरीची सनद दिल्ली येथून आणून मलिक राजाने विद्यमान धुळे जिल्ह्यातील थाळनेरला आपले मुख्यालय उभारले.

यादवांचे मांडलिक निकुंभांची अधिसत्तामलिक राजाने सावकाशपणे येथील अधिपतींना संपुष्टात आणून आपली सत्ता वाढविली. पूर्वेकडील वाघळीला एक राजपूत अधिपती अधिकारूढ होते. पितळखोरा टेकड्यांचा पायथा व कसारबारी घाटालगतच्या भागावर पूर्वी यादवांचे मांडलिक असलेल्या निकुंभांची अधिसत्ता होती. पूर्वेकडील भागावर गवळी राजा आसा अहीर यांची सत्ता असावी. थाळनेरच्या उत्तरेकडील सोनगरीवर दुसºया राजपुतांची सत्ता होती. कालांतराने सर्व अधिपतींनी फारूकीचे मांडलिकत्व पत्करले.

खान्देशचा ‘सिपाह-सालार किताबथाळनेर व कुरुंदोचा ताबा घेतल्यानंतर मलिक राजाला बागलाणच्या वहीजी नामक अधिपतीशी सामना करावा लागला. मात्र या मोहिमेत मलिकला हत्ती व प्रचंड धनप्राप्ती झाली. ही लूट मलिकने राजा फिरोजशहा तुघलकाकडे पाठविली. फिरोजशहा यांनी खुश होऊन मलिकला बढती देऊन खान्देशचा ‘सिपाह-सालार’ हा किताब दिला. १३८२ मध्ये फिरोजशहा तुघलक वार्धक्याने कमकुवत झाल्याने मलिक राजाने दिल्लीस खंडणी पाठविणे बंद करीत आपले स्वातंत्र्य घोषित केले.खान्देशच्या सुपीक प्रदेशावरून वादखान्देशच्या सुपीक प्रदेशावरून गुजरात व फारुकींचे वारंवार वाद निर्माण होत होते. ते थांबविण्यासाठी मलिक राजा फारूकीने आपल्या मुलीचे लग्न माळव्याच्या दिलावर खान यांच्या मुलीसोबत केले. तसेच आपल्या मुलाचा विवाह दिलावरच्या मुलीसोबत लावून दिला होता. या परस्पर विवाहसंबधांमुळे फारूकींचे स्थान बळकट झाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव