शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जळगाव येथे अपघातात बेशुध्द तरुणाच्या मदतीसाठी धावली ‘खाकी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 12:53 IST

मातेने मानले पोलिसाचे आभार

ठळक मुद्देरक्षाबंधनासाठी बहिणी करीत होत्या भावाला सतत फोनतीन बहिणींचा एकुलता भाऊ

जळगाव : गोविंदा रिक्षा थांब्याजवळ अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिक्षा चालकाला शहर पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल विजयसिंग पाटील यांनी जीवदान दिल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा तशीच घटना रक्षाबंधनाच्या दिवशी रात्री साडे दहा वाजता अयोध्या नगरात घडली. अजय शैलेंद्र साठे असे जखमी तरुणाचे नाव असून स्थानिक गुन्हे शाखेचे हेडकॉन्स्टेबल शरद भालेराव त्याच्या मदतीसाठी धावून गेले.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रक्षाबंधनाच्या दिवशी रात्री साडे दहा वाजता अयोध्या नगरात एक तरुण रक्तंबबाळ व बेशुध्दावस्थेत रस्त्यावर पडलेला होता तर त्याच्याबाजूला दुचाकी पडलेली होती. या तरुणाच्या खिशातील मोबाईलची रिंग सतत वाजत होती, मात्र तरीही तो तरुण प्रतिसाद देत नव्हता. रात्री जेवण झाल्यानंतर गल्लीत फिरणाऱ्या महिलांनी हे दृष्य पाहिले. बराच वेळ झाला तरी मोबाईलची रिंगही वाजते आहे व तरुणही बेशुध्द अवस्थेत असल्याने या महिलांनी याच परिसरात राहणारे स्थानिक गुन्हे शाखेचे हेडकॉन्स्टेबल शरद भालेराव यांचे घर गाठले. तरुण बेशुध्द असल्याने त्यांनी त्याच्या तोंडावर पाणी मारले, मात्र तरीही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी एका तरुणाची मदत घेत स्वत:च्या दुचाकीवरुन अयोध्या नगरातील खासगी डॉक्टरकडे नेले. झोपलेल्या डॉक्टरांना विनंती करुन त्यांनी या तरुणावर उपचार करायला लावले. तेथे हा तरुण शुध्दीवर आला. कोणत्या वाहनाने धडक दिली हे त्यालाही सांगता येत नव्हते.मात्र डोक्याला जबर मार लागला होता. तेथे त्याची चौकशी केली असता त्याने अजय साठे असे नाव सांगितले.अन् आईचे काळीज धडधडलेशरद भालेराव यांनी अजय याला त्याच्या घरी नेले असता आई चिंतेतच होती. तर दुसरीकडे तीन बहिणी सतत आईशी भावाच्याबाबतीत विचारणा करीत होत्या. जखमी मुलाला पाहून आईने एकच हंबरडा फोडला. अजय बेटा हे काय झाले..असे म्हणत ते रडत होत्या. तुझ्या वडीलांचा तीन महिन्यापूर्वीच मृत्यू झाला अन् आज तुझी ही अवस्था... असे म्हणत त्यांचे काळीजही धडधड करीत होते. भालेराव यांनी त्यांना धीर देत तुमचा मुलगा सुखरुप आहे. अपघातात जखमी झाला होता व त्याच्यावर उपचारही झाले असल्याचे सांगितल्याने त्यांचा जीवात जीव आला.तीन बहिणींचा एकुलता भाऊबहिणी बाहेरगावी लांब असल्याने रक्षाबंधनाला येऊ शकल्या नाहीत, म्हणून त्या सायंकाळपासून भाऊ व आईशी बोलण्याचा प्रयत्न करीत होत्या.परंतु भावाच्या मोबाईलवर रिंंग जाऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांचीही चिंंता वाढली होती. साठे कुटुंब अहमदनगर जिल्ह्यातील आहे. अजय याचे एमबीए झाले असून तो खासगी कंपनीत नोकरी करतो. वडीलांचे तीन महिन्यापूर्वीच निधन झाल्याने कुटुंबाची मदार अजयवरच आहे.

टॅग्स :PoliceपोलिसJalgaonजळगाव