शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

जळगाव येथे अपघातात बेशुध्द तरुणाच्या मदतीसाठी धावली ‘खाकी’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 12:53 IST

मातेने मानले पोलिसाचे आभार

ठळक मुद्देरक्षाबंधनासाठी बहिणी करीत होत्या भावाला सतत फोनतीन बहिणींचा एकुलता भाऊ

जळगाव : गोविंदा रिक्षा थांब्याजवळ अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिक्षा चालकाला शहर पोलीस स्टेशनचे हेडकॉन्स्टेबल विजयसिंग पाटील यांनी जीवदान दिल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा तशीच घटना रक्षाबंधनाच्या दिवशी रात्री साडे दहा वाजता अयोध्या नगरात घडली. अजय शैलेंद्र साठे असे जखमी तरुणाचे नाव असून स्थानिक गुन्हे शाखेचे हेडकॉन्स्टेबल शरद भालेराव त्याच्या मदतीसाठी धावून गेले.याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, रक्षाबंधनाच्या दिवशी रात्री साडे दहा वाजता अयोध्या नगरात एक तरुण रक्तंबबाळ व बेशुध्दावस्थेत रस्त्यावर पडलेला होता तर त्याच्याबाजूला दुचाकी पडलेली होती. या तरुणाच्या खिशातील मोबाईलची रिंग सतत वाजत होती, मात्र तरीही तो तरुण प्रतिसाद देत नव्हता. रात्री जेवण झाल्यानंतर गल्लीत फिरणाऱ्या महिलांनी हे दृष्य पाहिले. बराच वेळ झाला तरी मोबाईलची रिंगही वाजते आहे व तरुणही बेशुध्द अवस्थेत असल्याने या महिलांनी याच परिसरात राहणारे स्थानिक गुन्हे शाखेचे हेडकॉन्स्टेबल शरद भालेराव यांचे घर गाठले. तरुण बेशुध्द असल्याने त्यांनी त्याच्या तोंडावर पाणी मारले, मात्र तरीही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे त्यांनी एका तरुणाची मदत घेत स्वत:च्या दुचाकीवरुन अयोध्या नगरातील खासगी डॉक्टरकडे नेले. झोपलेल्या डॉक्टरांना विनंती करुन त्यांनी या तरुणावर उपचार करायला लावले. तेथे हा तरुण शुध्दीवर आला. कोणत्या वाहनाने धडक दिली हे त्यालाही सांगता येत नव्हते.मात्र डोक्याला जबर मार लागला होता. तेथे त्याची चौकशी केली असता त्याने अजय साठे असे नाव सांगितले.अन् आईचे काळीज धडधडलेशरद भालेराव यांनी अजय याला त्याच्या घरी नेले असता आई चिंतेतच होती. तर दुसरीकडे तीन बहिणी सतत आईशी भावाच्याबाबतीत विचारणा करीत होत्या. जखमी मुलाला पाहून आईने एकच हंबरडा फोडला. अजय बेटा हे काय झाले..असे म्हणत ते रडत होत्या. तुझ्या वडीलांचा तीन महिन्यापूर्वीच मृत्यू झाला अन् आज तुझी ही अवस्था... असे म्हणत त्यांचे काळीजही धडधड करीत होते. भालेराव यांनी त्यांना धीर देत तुमचा मुलगा सुखरुप आहे. अपघातात जखमी झाला होता व त्याच्यावर उपचारही झाले असल्याचे सांगितल्याने त्यांचा जीवात जीव आला.तीन बहिणींचा एकुलता भाऊबहिणी बाहेरगावी लांब असल्याने रक्षाबंधनाला येऊ शकल्या नाहीत, म्हणून त्या सायंकाळपासून भाऊ व आईशी बोलण्याचा प्रयत्न करीत होत्या.परंतु भावाच्या मोबाईलवर रिंंग जाऊनही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांचीही चिंंता वाढली होती. साठे कुटुंब अहमदनगर जिल्ह्यातील आहे. अजय याचे एमबीए झाले असून तो खासगी कंपनीत नोकरी करतो. वडीलांचे तीन महिन्यापूर्वीच निधन झाल्याने कुटुंबाची मदार अजयवरच आहे.

टॅग्स :PoliceपोलिसJalgaonजळगाव