शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
देवेंद्र फडणवीसांनी मला संकटातून वाचवलं; खासदार नरेश म्हस्केंनी सांगितला किस्सा
3
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
4
कंचनजंगा एक्स्प्रेसच्या अपघातात लोको पायलट, गार्डचा मृत्यू? रेल्वे मंत्रालय माहिती देताना म्हणाले...
5
NSE नं इन्स्टाग्राम, टेलिग्रामच्या 'या' हँडल्सबाबत दिला इशारा; फसवणूक करणारे नंबर्सही केले जारी
6
चाळिशीनंतर स्वत:ला जपा! महिलांना 'या' आजारांचा मोठा धोका; दुर्लक्ष करणं बेतेल जीवावर
7
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
8
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
9
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
10
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
11
Munjya Box Office Collection : बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
12
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
13
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
14
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
15
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
16
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
17
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
18
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
19
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
20
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?

श्वाश्वत सिंचनावरीलच खरीप तरला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2017 11:25 PM

उत्पादन जेमतेम, पण इस्राईल देशालाही मागे टाकणारे शेतकºयांचे व्यवस्थापन

ठळक मुद्देकपाशीचे क्षेत्र सर्वाधिकपावसाच्या टक्केवारीचे गौडबंगाल...!फक्त पावसावर उत्पादनाचे धाडससिंचन क्षेत्र नगण्य

खेडगाव, ता. भडगाव - यावर्षी पावसाळ्यातील चार महिन्यात मोजून चार तारखांना फक्त २०-३० मि.मी. पाऊस पडूनही काही शेतकºयांचा हंगाम आला़ मात्र अधिक दिवसाचा पावसाचा खंड उत्पादनासाठी मारक ठरला़ यात ठिबक संच, जलयुक्त शिवारांतर्गत नालाबांध व गिरणा नदी काठ अशा सिंचन सुविधा असलेल्या क्षेत्रातील खरीप तरला आहे.तालुक्यात २६००० हेक्टरवर कपाशीची लागवड आहे. त्या खालोखाल मका ३००० हेक्टरवर, ज्वारी-बाजरी १५०० हेक्टरवर, कडधान्य १२०० हेक्टरवर, तर बागायतीत केळी-ऊस, फळबागायत २००० हेक्टरवर जवळजवळ आहे. यात सर्वाधिक क्षेत्र कपाशीचे आहे़ हंगामात हलक्या जमिनीवरील पीक हलके पडले. तर भारी जमिनीवरील ज्वारी-बाजरी व मक्याचे उत्पादन ४०-५० टक्के इतके घटले.पावसाळ्यात मृग नक्षत्रात सुरुवातीला, त्यानंतर १४-१८ जुलै, २४-२६ जुलै, १९-२० आॅगस्ट व २०-२१ सप्टेंबरदरम्यान चारच तारखांना दोन आकडी पाऊस झाला. शेतीदृष्ट्या २० ते ३० मि.मी. पुढचा पाऊसच लाभदायक असतो, मग या चार तारखांचा पाऊस मोजल्यास तो मंडळपरत्वे १२० ते १५० मि.मी.च भरतो. शासकीय मोजमापानुसार ३०० ते ३५० मि.मी. पाऊस तालुक्यात झाला. कधी ४ मि.मी तर कधी ८-९ मि.मी. हा फक्त अंगावरील कपडे ओले करणारा पाऊस शेतीसाठी कुचकामी ठरतो. तो ग्राह्य धरावा का? हा प्रश्नच आहे़ मग पावसाच्या टक्केवारीनुसार इस्राईल देशालाही मागे टाकत विनाठिबक संचाशिवाय शेतकºयांनी खरीप बहरवला. फक्त रसशोषक किडींचा प्रादुर्भाव व पावसाच्या मोठ्या खंडामुळे कपाशीचा हंगाम काहीसा हातून निसटला. कपाशीचे पीक प्रमुख असल्याने, यावरच शेतकºयांची आर्थिक मदार आहे. त्यामानाने या पिकासाठी सिंचन सुविधा येथे मात्र नाही, तरीदेखील पावसाचे जून, जुलै, आॅगस्ट महिन्यात दोन मोठे खंड पडूनही शेतकºयांनी आंतरमशागत, रासायनिक खतांच्या योग्य मात्रा, संजीवकाच्या फवारण्या यातून पीक शेतात बहरवले. प्रतिकूल हवामानात रसशोषक किडींचा व अळींचा उपद्रव वाढला़ त्यातच श्वाश्वत (ठोस) सिंचनाची सोय नसल्याने शेतकºयांची थोडी पंचाईत झाली. अन्यथा इस्राईल देशालाही लाजवेल असे व्यवस्थापन शेतकºयांनी ठेवले. जुवार्डी, आडळसे या अवर्षण प्रवण भागात तर कपाशीत ठिबक संच असूनही विहिरीत पाणी नसल्याने शेतकरी हताश झाले आहेत़ खरिपातील कपाशी या पिकासाठी फक्त १०-२० टक्के क्षेत्रात या वेळेस सिंचन सुविधा उपलब्ध होती. इतरत्र विहिरींना पाणी नसल्याने गिरणा नदीकाठ, नालाबांध, ठिबक संच बसविलेल्या क्षेत्रातील खरीप तरला.सुरुवातीला खरीप हंगाम दृष्ट लागण्यासारखा होता. मात्र पीकवाढीच्या अवस्थेत पावसात खंड पडला, पीक हिरवे राहिले पण कपाशीची फुलपाती गळून उत्पादन घटले व आता कपाशी लाल पडू लागल्याने फरदडची सोय उरली नाही.-प्रदीप महाजन, कोळगाव ता. भडगाव.सिंचनाची सोय असलेल्या जमिनीवर खरीप हंगाम चांगला आला़ तर इतरत्र जेमतेमच आहे.-ताराचंद चव्हाण, नालबंदी, ता. भडगाव.