केकतनिंभोरा येथे वीज वाहिनी पडल्याने केळी बाग खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 16:01 IST2017-04-19T16:01:36+5:302017-04-19T16:01:36+5:30
शेतातून गेलेली वीज वाहिनी तुटून पडल्याने लागलेल्या आगीत केळी बागासह ठिबक सिंचनचे साहित्य बुधवारी जळून खाक झाले.
केकतनिंभोरा येथे वीज वाहिनी पडल्याने केळी बाग खाक
जळगाव,दि.19- जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा येथील अमोल दत्तात्रय पाटील यांच्या शेतातून गेलेली वीज वाहिनी तुटून पडल्याने लागलेल्या आगीत केळी बागासह ठिबक सिंचनचे साहित्य बुधवारी जळून खाक झाले.
पाटील यांच्या मालकीच्या गट नं.119/2 ब या शेतातील तीन हजार केळीची लागवड केली होती. तसेच त्यासाठी ठिबक सिंचनची व्यवस्था लावण्यात आली होती. आगीत हे साहित्य जळून सुमारे सहा लाखांचे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे हे नुकसान झाले असून तत्काळ मदत मिळावी अशी मागणी शेतक:याने केली आहे.