शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
2
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
3
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
4
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
7
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
8
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
9
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
10
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
11
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
12
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
13
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
14
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
15
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
16
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
17
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
18
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
19
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
20
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीर भारताचा नाराज मुलगा, त्याला समजविण्यासाठी लाठय़ा काठय़ांची गरज काय?

By admin | Updated: May 6, 2017 14:13 IST

काश्मिरातील रहिवासी भागात लष्कर कशासाठी तैनात आहे.. जागोजागी लष्कर असते..

ऑनलाइन लोकमतकाश्मिरी युवकांचा सवाल : अॅड.पंकज अत्रे व अॅड.आनंद मुजुमदार यांचा तेथील युवकांशी संवादजळगाव, दि. 6 - आम्हाला स्वातंत्र्य (आझादी), सुटका वगैरे नको आहे.., पण रोजगार हवा.., काश्मिरातील रहिवासी भागात लष्कर कशासाठी तैनात आहे.. जागोजागी लष्कर असते.. त्याची भीतीच जणू काश्मीर खो:यातील युवकांना वाटते.. सिमेवर हवे तेवढे लष्कर तैनात करा.. काश्मीर भारताचा नाराज मुलगा आहे.. त्याला समजविण्यासाठी लाठय़ा, काठय़ांची गरजच काय, असा सवाल काश्मिरातील काही युवकांनी अलीकडेच काश्मीरच्या सहलीवरुन परतलेले अॅड.पंकज अत्रे व अॅड.आनंद मुजुमदार यांच्याशी मनमोकळेपणे गप्पा मारताना केला. अर्थातच काश्मिरातील रोजगाराचा प्रश्न सुटावा.. तेथे शांतता राहावी यासाठी युवकांमधील असंतोष दूर करणे गरजेचे आहे.. आणि हे फक्त मूळ समस्या, युवकांशी संवादानंतर आलेले मुद्दे जाणून घेतल्यानंतरच शक्य असल्याचे मत अॅड.अत्रे व अॅड.मुजुमदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त          केले. अॅड.अत्रे व अॅड.मुजुमदार हे जवळपास आठ दिवस जम्मू काश्मीरला सहलीसाठी  गेले होते. यादरम्यान त्यांनी काश्मिरातील पर्यटन व्यवसायात कार्यरत युवक, काही व्यावसायिक यांच्याशी संवाद साधून त्यांचे प्रश्न, अपेक्षा यावर चर्चा        केली. श्रीनगर, पहेलगाम, सोनमर्ग व गुलमर्ग या भागात फिरले.  तेथे जाणवलेल्या अडचणी, प्रश्न यासंदर्भात ‘लोकमत’शी संवाद साधला.. त्यातील काही प्रमुख मुद्दे असे..कुठेही दगडफेक दिसली नाहीया भेटीदरम्यान आपल्याला कुठेही दगडफेकीच्या घटना दिसल्या नाहीत. पर्यटकांना तेथे कुठलाही त्रास होत नाही. तेथील व्यावसायिक पर्यटकांशी मनमोकळेपणाने जसा संवाद साधतात तसे ते सांभाळही करतात. फक्त एका गावात विद्याथ्र्याचा लहान मोर्चाकाश्मिरात फिरत असताना बजबिहार या गावात काही विद्याथ्र्याचा मोर्चा निघाला होता. ते कुठल्याशा समस्यांचे निवेदन द्यायला प्रशासनाकडे जात होते., पण गावात तणाव नव्हता..तशी सर्वत्र शांतता दिसली. पर्यटनाच्या व्यवसायावर परिणामकाश्मिरमधील श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, पहेलगाम व इतर भागात पर्यटन हा रोजगाराचा प्रमुख भाग आहे. सफरचंद, सुकामेवा हे तेथील दुय्यम व्यवसाय आहेत. पण यातील पर्यटन व्यवसायावर अलीकडे तेथील असंतोषाच्या वातावरणाने प्रतिकूल परिणाम झाला आहे. पर्यटनासंबंधी कार्यरत व्यावसायिक कुठल्याही पर्यटकांना फिरविण्यासह इतर बाबींमध्ये मोठी तडजोड (बार्गेनिंग) करायला तयार होतात. कारण तेथे पर्यटकांची संख्या रोडावली आहे.. आपल्याला ग्राहक मिळेल की नाही.., असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. त्यामुळे जे येतील त्यांना कमी अधिक दरात सेवा द्यायची भूमिका त्यांची असते.पाकिस्तानची फूस..भारत व काश्मीर यांच्यात धोरणात्मक बाबी, स्थलांतर, कलम 370 व इतर मुद्दय़ांवरून जो तणाव, भांडण आहे. त्याचा लाभ मात्र पाकिस्तान घेत आहे. पाकिस्तानची तेथील असंतुष्ट मंडळींना फूस आहे. भारत व काश्मिरातील तणाव हा चर्चेनेच सोडवावा लागेल. त्याशिवाय या स्वर्गात शांतता नांदणार नाही, असे मत अॅड.पंकज अत्रे व अॅड.आनंद मुजुमदार यांनी शेवटी व्यक्त केले. पर्यटकांची पाठश्रीनगरमधील अनेक मोठे हॉटेल्स रिकामे दिसले. आम्ही ज्या हॉटेलात थांबलो होतो तेथे फक्त आमच्या व्यतिरिक्त कुठलेही पर्यटक नव्हते. हॉटेलचा युवक मॅनेजर म्हणाला, शिकूनही फायदा नाही..पहेलगाममधील ज्या हॉटेलात आम्ही थांबलो होतो त्याचा मॅनेजर शफीक हा एम.फील झाला होता. पण पुढे आणखी शिक्षण घेऊन नोकरी मिळणार नाही. त्यामुळे याच हॉटेलात काम करणे त्याने पसंत केल्याचे त्याच्याशी संवाद साधल्यानंतर कळले. जे हॉटेल तो सांभाळत होता त्याचे मालक जम्मूमध्ये राहत होते. पुरेशा पर्यटकांअभावी या हॉटेलचे वीजबिलही भरण्यास आपण असमर्थ असल्याचे त्याने सांगितले. अशाने तेथील 50 टक्के युवक बेरोजगार झाल्याचे समोर आले. कूपवाडामधील हल्ल्याच्या ठिकाणापासून 150 कि.मी. अंतरावर मागील महिन्याच्या अखेरीस कूपवाडामध्ये जो हल्ला अतिरेक्यांनी केला.. त्या वेळेस या हल्ल्याच्या ठिकाणापासून आम्ही फक्त 150 कि.मी. अंतरावर होतो. पण कुठला अडथळा आला नाही. आम्ही सहज फिरू शकलो.