शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

काश्मीर भारताचा नाराज मुलगा, त्याला समजविण्यासाठी लाठय़ा काठय़ांची गरज काय?

By admin | Updated: May 6, 2017 14:13 IST

काश्मिरातील रहिवासी भागात लष्कर कशासाठी तैनात आहे.. जागोजागी लष्कर असते..

ऑनलाइन लोकमतकाश्मिरी युवकांचा सवाल : अॅड.पंकज अत्रे व अॅड.आनंद मुजुमदार यांचा तेथील युवकांशी संवादजळगाव, दि. 6 - आम्हाला स्वातंत्र्य (आझादी), सुटका वगैरे नको आहे.., पण रोजगार हवा.., काश्मिरातील रहिवासी भागात लष्कर कशासाठी तैनात आहे.. जागोजागी लष्कर असते.. त्याची भीतीच जणू काश्मीर खो:यातील युवकांना वाटते.. सिमेवर हवे तेवढे लष्कर तैनात करा.. काश्मीर भारताचा नाराज मुलगा आहे.. त्याला समजविण्यासाठी लाठय़ा, काठय़ांची गरजच काय, असा सवाल काश्मिरातील काही युवकांनी अलीकडेच काश्मीरच्या सहलीवरुन परतलेले अॅड.पंकज अत्रे व अॅड.आनंद मुजुमदार यांच्याशी मनमोकळेपणे गप्पा मारताना केला. अर्थातच काश्मिरातील रोजगाराचा प्रश्न सुटावा.. तेथे शांतता राहावी यासाठी युवकांमधील असंतोष दूर करणे गरजेचे आहे.. आणि हे फक्त मूळ समस्या, युवकांशी संवादानंतर आलेले मुद्दे जाणून घेतल्यानंतरच शक्य असल्याचे मत अॅड.अत्रे व अॅड.मुजुमदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त          केले. अॅड.अत्रे व अॅड.मुजुमदार हे जवळपास आठ दिवस जम्मू काश्मीरला सहलीसाठी  गेले होते. यादरम्यान त्यांनी काश्मिरातील पर्यटन व्यवसायात कार्यरत युवक, काही व्यावसायिक यांच्याशी संवाद साधून त्यांचे प्रश्न, अपेक्षा यावर चर्चा        केली. श्रीनगर, पहेलगाम, सोनमर्ग व गुलमर्ग या भागात फिरले.  तेथे जाणवलेल्या अडचणी, प्रश्न यासंदर्भात ‘लोकमत’शी संवाद साधला.. त्यातील काही प्रमुख मुद्दे असे..कुठेही दगडफेक दिसली नाहीया भेटीदरम्यान आपल्याला कुठेही दगडफेकीच्या घटना दिसल्या नाहीत. पर्यटकांना तेथे कुठलाही त्रास होत नाही. तेथील व्यावसायिक पर्यटकांशी मनमोकळेपणाने जसा संवाद साधतात तसे ते सांभाळही करतात. फक्त एका गावात विद्याथ्र्याचा लहान मोर्चाकाश्मिरात फिरत असताना बजबिहार या गावात काही विद्याथ्र्याचा मोर्चा निघाला होता. ते कुठल्याशा समस्यांचे निवेदन द्यायला प्रशासनाकडे जात होते., पण गावात तणाव नव्हता..तशी सर्वत्र शांतता दिसली. पर्यटनाच्या व्यवसायावर परिणामकाश्मिरमधील श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, पहेलगाम व इतर भागात पर्यटन हा रोजगाराचा प्रमुख भाग आहे. सफरचंद, सुकामेवा हे तेथील दुय्यम व्यवसाय आहेत. पण यातील पर्यटन व्यवसायावर अलीकडे तेथील असंतोषाच्या वातावरणाने प्रतिकूल परिणाम झाला आहे. पर्यटनासंबंधी कार्यरत व्यावसायिक कुठल्याही पर्यटकांना फिरविण्यासह इतर बाबींमध्ये मोठी तडजोड (बार्गेनिंग) करायला तयार होतात. कारण तेथे पर्यटकांची संख्या रोडावली आहे.. आपल्याला ग्राहक मिळेल की नाही.., असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. त्यामुळे जे येतील त्यांना कमी अधिक दरात सेवा द्यायची भूमिका त्यांची असते.पाकिस्तानची फूस..भारत व काश्मीर यांच्यात धोरणात्मक बाबी, स्थलांतर, कलम 370 व इतर मुद्दय़ांवरून जो तणाव, भांडण आहे. त्याचा लाभ मात्र पाकिस्तान घेत आहे. पाकिस्तानची तेथील असंतुष्ट मंडळींना फूस आहे. भारत व काश्मिरातील तणाव हा चर्चेनेच सोडवावा लागेल. त्याशिवाय या स्वर्गात शांतता नांदणार नाही, असे मत अॅड.पंकज अत्रे व अॅड.आनंद मुजुमदार यांनी शेवटी व्यक्त केले. पर्यटकांची पाठश्रीनगरमधील अनेक मोठे हॉटेल्स रिकामे दिसले. आम्ही ज्या हॉटेलात थांबलो होतो तेथे फक्त आमच्या व्यतिरिक्त कुठलेही पर्यटक नव्हते. हॉटेलचा युवक मॅनेजर म्हणाला, शिकूनही फायदा नाही..पहेलगाममधील ज्या हॉटेलात आम्ही थांबलो होतो त्याचा मॅनेजर शफीक हा एम.फील झाला होता. पण पुढे आणखी शिक्षण घेऊन नोकरी मिळणार नाही. त्यामुळे याच हॉटेलात काम करणे त्याने पसंत केल्याचे त्याच्याशी संवाद साधल्यानंतर कळले. जे हॉटेल तो सांभाळत होता त्याचे मालक जम्मूमध्ये राहत होते. पुरेशा पर्यटकांअभावी या हॉटेलचे वीजबिलही भरण्यास आपण असमर्थ असल्याचे त्याने सांगितले. अशाने तेथील 50 टक्के युवक बेरोजगार झाल्याचे समोर आले. कूपवाडामधील हल्ल्याच्या ठिकाणापासून 150 कि.मी. अंतरावर मागील महिन्याच्या अखेरीस कूपवाडामध्ये जो हल्ला अतिरेक्यांनी केला.. त्या वेळेस या हल्ल्याच्या ठिकाणापासून आम्ही फक्त 150 कि.मी. अंतरावर होतो. पण कुठला अडथळा आला नाही. आम्ही सहज फिरू शकलो.