शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

काश्मीर भारताचा नाराज मुलगा, त्याला समजविण्यासाठी लाठय़ा काठय़ांची गरज काय?

By admin | Updated: May 6, 2017 14:13 IST

काश्मिरातील रहिवासी भागात लष्कर कशासाठी तैनात आहे.. जागोजागी लष्कर असते..

ऑनलाइन लोकमतकाश्मिरी युवकांचा सवाल : अॅड.पंकज अत्रे व अॅड.आनंद मुजुमदार यांचा तेथील युवकांशी संवादजळगाव, दि. 6 - आम्हाला स्वातंत्र्य (आझादी), सुटका वगैरे नको आहे.., पण रोजगार हवा.., काश्मिरातील रहिवासी भागात लष्कर कशासाठी तैनात आहे.. जागोजागी लष्कर असते.. त्याची भीतीच जणू काश्मीर खो:यातील युवकांना वाटते.. सिमेवर हवे तेवढे लष्कर तैनात करा.. काश्मीर भारताचा नाराज मुलगा आहे.. त्याला समजविण्यासाठी लाठय़ा, काठय़ांची गरजच काय, असा सवाल काश्मिरातील काही युवकांनी अलीकडेच काश्मीरच्या सहलीवरुन परतलेले अॅड.पंकज अत्रे व अॅड.आनंद मुजुमदार यांच्याशी मनमोकळेपणे गप्पा मारताना केला. अर्थातच काश्मिरातील रोजगाराचा प्रश्न सुटावा.. तेथे शांतता राहावी यासाठी युवकांमधील असंतोष दूर करणे गरजेचे आहे.. आणि हे फक्त मूळ समस्या, युवकांशी संवादानंतर आलेले मुद्दे जाणून घेतल्यानंतरच शक्य असल्याचे मत अॅड.अत्रे व अॅड.मुजुमदार यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त          केले. अॅड.अत्रे व अॅड.मुजुमदार हे जवळपास आठ दिवस जम्मू काश्मीरला सहलीसाठी  गेले होते. यादरम्यान त्यांनी काश्मिरातील पर्यटन व्यवसायात कार्यरत युवक, काही व्यावसायिक यांच्याशी संवाद साधून त्यांचे प्रश्न, अपेक्षा यावर चर्चा        केली. श्रीनगर, पहेलगाम, सोनमर्ग व गुलमर्ग या भागात फिरले.  तेथे जाणवलेल्या अडचणी, प्रश्न यासंदर्भात ‘लोकमत’शी संवाद साधला.. त्यातील काही प्रमुख मुद्दे असे..कुठेही दगडफेक दिसली नाहीया भेटीदरम्यान आपल्याला कुठेही दगडफेकीच्या घटना दिसल्या नाहीत. पर्यटकांना तेथे कुठलाही त्रास होत नाही. तेथील व्यावसायिक पर्यटकांशी मनमोकळेपणाने जसा संवाद साधतात तसे ते सांभाळही करतात. फक्त एका गावात विद्याथ्र्याचा लहान मोर्चाकाश्मिरात फिरत असताना बजबिहार या गावात काही विद्याथ्र्याचा मोर्चा निघाला होता. ते कुठल्याशा समस्यांचे निवेदन द्यायला प्रशासनाकडे जात होते., पण गावात तणाव नव्हता..तशी सर्वत्र शांतता दिसली. पर्यटनाच्या व्यवसायावर परिणामकाश्मिरमधील श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग, पहेलगाम व इतर भागात पर्यटन हा रोजगाराचा प्रमुख भाग आहे. सफरचंद, सुकामेवा हे तेथील दुय्यम व्यवसाय आहेत. पण यातील पर्यटन व्यवसायावर अलीकडे तेथील असंतोषाच्या वातावरणाने प्रतिकूल परिणाम झाला आहे. पर्यटनासंबंधी कार्यरत व्यावसायिक कुठल्याही पर्यटकांना फिरविण्यासह इतर बाबींमध्ये मोठी तडजोड (बार्गेनिंग) करायला तयार होतात. कारण तेथे पर्यटकांची संख्या रोडावली आहे.. आपल्याला ग्राहक मिळेल की नाही.., असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. त्यामुळे जे येतील त्यांना कमी अधिक दरात सेवा द्यायची भूमिका त्यांची असते.पाकिस्तानची फूस..भारत व काश्मीर यांच्यात धोरणात्मक बाबी, स्थलांतर, कलम 370 व इतर मुद्दय़ांवरून जो तणाव, भांडण आहे. त्याचा लाभ मात्र पाकिस्तान घेत आहे. पाकिस्तानची तेथील असंतुष्ट मंडळींना फूस आहे. भारत व काश्मिरातील तणाव हा चर्चेनेच सोडवावा लागेल. त्याशिवाय या स्वर्गात शांतता नांदणार नाही, असे मत अॅड.पंकज अत्रे व अॅड.आनंद मुजुमदार यांनी शेवटी व्यक्त केले. पर्यटकांची पाठश्रीनगरमधील अनेक मोठे हॉटेल्स रिकामे दिसले. आम्ही ज्या हॉटेलात थांबलो होतो तेथे फक्त आमच्या व्यतिरिक्त कुठलेही पर्यटक नव्हते. हॉटेलचा युवक मॅनेजर म्हणाला, शिकूनही फायदा नाही..पहेलगाममधील ज्या हॉटेलात आम्ही थांबलो होतो त्याचा मॅनेजर शफीक हा एम.फील झाला होता. पण पुढे आणखी शिक्षण घेऊन नोकरी मिळणार नाही. त्यामुळे याच हॉटेलात काम करणे त्याने पसंत केल्याचे त्याच्याशी संवाद साधल्यानंतर कळले. जे हॉटेल तो सांभाळत होता त्याचे मालक जम्मूमध्ये राहत होते. पुरेशा पर्यटकांअभावी या हॉटेलचे वीजबिलही भरण्यास आपण असमर्थ असल्याचे त्याने सांगितले. अशाने तेथील 50 टक्के युवक बेरोजगार झाल्याचे समोर आले. कूपवाडामधील हल्ल्याच्या ठिकाणापासून 150 कि.मी. अंतरावर मागील महिन्याच्या अखेरीस कूपवाडामध्ये जो हल्ला अतिरेक्यांनी केला.. त्या वेळेस या हल्ल्याच्या ठिकाणापासून आम्ही फक्त 150 कि.मी. अंतरावर होतो. पण कुठला अडथळा आला नाही. आम्ही सहज फिरू शकलो.