शहरं
Join us  
Trending Stories
1
'गाझावरील बॉम्बहल्ले थांबवण्यासाठी मी इस्रायलला...'; पॅलेस्टाईनबाबत मोदींचा मोठा खुलासा
2
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
3
पाकिस्तानी लष्कर - अफगाणिस्तानमध्ये भीषण संघर्ष सुरु; डूरंड लाइनवर जोरदार हल्ला
4
Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड
5
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
6
भाजपा उत्तर भारतीय मोर्चानं राज ठाकरेंची केली पाठराखण; शरद पवार, उद्धव ठाकरेंना सुनावलं
7
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
8
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
9
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
10
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
11
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
12
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
13
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
14
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
15
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
16
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
17
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
18
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
19
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
20
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव

जोडोनिया धन उत्तम व्यवहारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 10:42 PM

महाराष्ट्रीय संतांनी मराठी माणसाला केवळ निवृत्ती मार्गाची शिकवण दिली नाही, तर परमार्थासोबत प्रपंच ही सुखाचा कसा करता येईल याचा ...

महाराष्ट्रीय संतांनी मराठी माणसाला केवळ निवृत्ती मार्गाची शिकवण दिली नाही, तर परमार्थासोबत प्रपंच ही सुखाचा कसा करता येईल याचा कानमंत्रही सांगितला आहे. ज्याला प्रपंच धड करता आला नाही त्याला परमार्थ तरी कसा जमेल? म्हणून आधी प्रपंच करावा नेटका । मग पहावे परमार्थ विवेका ।। असा उपदेश समर्थ रामदास स्वामी करतात. धन सर्वांनाच हवे आहे. किती पैसा मिळाला म्हणजे माणूस सुखी होईल? धनाची गरज आणि हाव या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. गरजेची पूर्ती होऊ शकेल. पण हावेची पूर्ती कशी होईल? म्हणूनच हे हवे, ते हवे अजून हवे या हावेपोटी धावण्यातच जीवन संपून जाते आणि जे मिळवले त्याचा उपभोग घ्यायचा राहून जातो. ही हाव आणि तिच्यापोटी होणारी धावाधाव कधी तरी थांबली पाहिजे.संत तुकाराम महाराज सांगतात. साधन सूचिता, अर्थ सूचिता, बाळगून व्यवहार केला तर सुखाचे दार दूर नाही. ‘उत्तम व्यवहार’ आणि ‘उदास विचार’ हे धनाच्या प्राप्तीचे आणि विनियोगाचे अधिष्ठान असले पाहिजे असा तुकोबारायांचा आग्रह आहे. उत्तम व्यवहार म्हणजे सचोटीचा व्यवहार, नैतिकतेच्या पायावर झालेला व्यवहार, धनाच्या प्राप्तीसाठीचे एवढे तत्व पाळले पाहिजे. प्रपंचासाठी पैसा हा लागणारच. ‘प्रंपचाचा पाया आहे पैशाविण वाया’ असे समर्थ रामदासांंनी सांगून ठेवले आहे. पवित्र मार्गाने आलेले धन म्हणजे ‘लक्ष्मी’ होय. गैरमार्गाने मिळवलेल्या धनाला फक्त पैसा म्हणता येईल. मिळालेला पैसा आपल्याजवळ सदैव राहणार नाही आणि राहिलाच तर आपण तरी कुठे राहणार आहोत? म्हणून हे समाजकार्यासाठी, देश, देव आणि धर्म कार्यासाठी खर्च करावे अशी संताची शिकवण आहे. अभंगाच्या केवळ एका चरणात फार महत्वाचा अर्थशुचितेचा संदेश तुकोबा देतात. तो आचरणात आणण्याचा संकल्प करू या.प्रा.सी.एस.पाटील, धरणगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव