शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

जामनेरला महिलांचा पं.स.वर हंडामोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 12:28 AM

नवीदाभाडी येथे पाण्याअभावी प्रचंड हाल

जामनेर : तालुक्यातील नवीदाभाडी (वाडी) येथील पाणी टंचाईकडे दुर्लक्ष करण्यासह कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याच्या निषेधार्थ शेकडो महिलांनी जामनेर पंचायत समितीवर हंडा मोर्चा काढला. पाण्याची समस्या तत्काळ मार्गी लावावी, अशा मागणीचे निवेदन गटविकास आधिकारी अजय जोशी यांना ग्रामस्थांनी दिले.निवेदनात म्हटले आहे की, नवीदाभाडी (वाडी) येथे विशेषत: दलित वस्तीमध्ये पाण्याची गंभीर समस्या निर्माण केली जात असल्याचा आरोप लेखी निवेदनात व तोंडीही करण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्यासह अन्य विकास कामांच्या बाबतीतही हेतूपुरस्सर आमच्याकडे दुर्लक्ष केले जाते यासह अनेक समस्या यावेळी महिलांनी या वेळी मांडल्या.जस-जशी उन्हाची तीव्रता वाढू लागली तशी-तशी तालुक्यातील पाणी समस्येने डोके वर काढले असून अनेक नियमित पाणी मिळत नसल्याची तक्रार आहे. तालुक्यात बहुतांश धरणे-तलावांमधून गावांना पाणीपुरवठा योजनांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र काही ठिकाणी दहा-ते बारा वर्ष झाली तरी ठेकेदारांच्या मनमानी कारभारामुळे बहुतांश योजनांना अद्यापही मुर्तरूप येऊ शकले नाही. याचाही फटका अनेक गावांना नाहक सहन करावा लागत आहे. असाच प्रकार नवीदाभाडीचाही असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मुबलकपणे पाणी आहे मात्र पाईपलाईन कशी व कोठून टाकावी याविषयी सुद्धा आपसात वाद असल्याचे सांगण्यात येते. यावेळी आलेल्या हंडा मोर्चामधे ग्रामपंचायत सदस्या रूपाली जंजाळे यांच्यासह गावातील शेकडो महिला सहभागी झाल्या होत्या.

टॅग्स :Jalgaonजळगाव