शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

जळगावच्या शेतक-याच्या चोरलेल्या पैशाची डान्सबारमध्ये उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 22:17 IST

 आॅनलाईन लोकमतजळगाव : नवीन बसस्थानकातून शेतकºयाच्या हातातून पावणे सहा लाख रुपयांची बॅग लांबविणारा मुख्य सूत्रधार रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (वय १८, रा.रामेश्वर कॉलनी, मेहरुण) याने त्याच्या हिश्यावर आलेल्या पैशातून १ लाख ६६ हजार रुपये कल्याण, उल्हासनगर, पनवेल या भागातील डान्सबारमध्ये उडविल्याची माहिती समोर आली आहे. पळून जाण्याच्या तयारीत असताना ...

ठळक मुद्दे२ लाख ९ हजार हस्तगत कल्याण रेल्वेस्थानकावरुन आवळल्या चोरट्याच्या मुसक्या पोलिसांनी मांडले उल्हासनगरात ठाण

 

आॅनलाईन लोकमतजळगाव : नवीन बसस्थानकातून शेतकºयाच्या हातातून पावणे सहा लाख रुपयांची बॅग लांबविणारा मुख्य सूत्रधार रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (वय १८, रा.रामेश्वर कॉलनी, मेहरुण) याने त्याच्या हिश्यावर आलेल्या पैशातून १ लाख ६६ हजार रुपये कल्याण, उल्हासनगर, पनवेल या भागातील डान्सबारमध्ये उडविल्याची माहिती समोर आली आहे. पळून जाण्याच्या तयारीत असताना गुरुवारी सकाळी सव्वा पाच वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या कल्याण रेल्वेस्थानकावर मुसक्या आवळल्या. रेल्वेतून तो पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला घेरले.सातगाव डोंगरी येथील शेतकरी संजय विष्णु वाणी (वय-४५) यांच्या हातातील ५ लाख ७५ हजार रूपये असलेले बॅग १ जून रोजीरात्री साडे आठ वाजता बसस्थानकातून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी लांबविली होती. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात धागेदोरे मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आनंदा शांताराम हटकर (पाटील) रा.मंगलपुरी, मेहरुण, जळगाव याला रविवारी रात्री पकडले होते, मात्र काही तासानंतर त्याला मिरगी यायला लागल्याने पोलीस यंत्रणाही हादरली होती. त्यामुळे त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवस उपचार केल्यानंतर बुधवारी दुपारी त्याची रुग्णालयातून सुटका झाली. त्यानंतर त्याला लागलीच अटक करण्यात आली. पोलिसांनी मांडले उल्हासनगरात ठाणआनंदा याला पकडल्यानंतर रितेश हा मुंबईच्या दिशेने गेल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना मिळाली होती. त्यानुसार कुराडे यांनी सहायक फौजदार मनोहर देशमुख, रवींद्र पाटील, रामकृष्ण पाटील, शरद भालेराव, विनोद पाटील, संजय सपकाळे, राजेंद्र पाटील,रामचंद्र बोरसे, सुशील पाटील, विजय पाटील व नरेंद्र वारुळे यांचे पथक तयार केले होते. त्यातील काही जण तीन दिवसापासून कल्याण व उल्हासनगरात ठाण मांडून होते. रितेश हा कल्याण रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक ४ वर असून तो फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उल्हासनगरला थांबलेले पथक ३० मिनिटात तेथे पोहचले व काही कळण्याच्या आत त्याला घेरले. त्याला सायंकाळी जळगावात आणण्यात आले. दरम्यान, हा गुन्हा उघडकीस आणल्यामुळे पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी कुराडे व त्यांच्या पथकाचे कौतुक केले.

आनंदा हटकरला कोठडीदरम्यान, आधी अटकेत असलेल्या आनंदा हटकर याला तपासाधिकारी एन.बी.सूर्यवंशी व महेंद्र बागुल यांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड.हेमंत मेंडकी यांनी काम पाहिले.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा