शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

जळगावच्या शेतक-याच्या चोरलेल्या पैशाची डान्सबारमध्ये उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 22:17 IST

 आॅनलाईन लोकमतजळगाव : नवीन बसस्थानकातून शेतकºयाच्या हातातून पावणे सहा लाख रुपयांची बॅग लांबविणारा मुख्य सूत्रधार रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (वय १८, रा.रामेश्वर कॉलनी, मेहरुण) याने त्याच्या हिश्यावर आलेल्या पैशातून १ लाख ६६ हजार रुपये कल्याण, उल्हासनगर, पनवेल या भागातील डान्सबारमध्ये उडविल्याची माहिती समोर आली आहे. पळून जाण्याच्या तयारीत असताना ...

ठळक मुद्दे२ लाख ९ हजार हस्तगत कल्याण रेल्वेस्थानकावरुन आवळल्या चोरट्याच्या मुसक्या पोलिसांनी मांडले उल्हासनगरात ठाण

 

आॅनलाईन लोकमतजळगाव : नवीन बसस्थानकातून शेतकºयाच्या हातातून पावणे सहा लाख रुपयांची बॅग लांबविणारा मुख्य सूत्रधार रितेश उर्फ चिच्या कृष्णा शिंदे (वय १८, रा.रामेश्वर कॉलनी, मेहरुण) याने त्याच्या हिश्यावर आलेल्या पैशातून १ लाख ६६ हजार रुपये कल्याण, उल्हासनगर, पनवेल या भागातील डान्सबारमध्ये उडविल्याची माहिती समोर आली आहे. पळून जाण्याच्या तयारीत असताना गुरुवारी सकाळी सव्वा पाच वाजता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याच्या कल्याण रेल्वेस्थानकावर मुसक्या आवळल्या. रेल्वेतून तो पळून जाण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला घेरले.सातगाव डोंगरी येथील शेतकरी संजय विष्णु वाणी (वय-४५) यांच्या हातातील ५ लाख ७५ हजार रूपये असलेले बॅग १ जून रोजीरात्री साडे आठ वाजता बसस्थानकातून दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी लांबविली होती. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात धागेदोरे मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आनंदा शांताराम हटकर (पाटील) रा.मंगलपुरी, मेहरुण, जळगाव याला रविवारी रात्री पकडले होते, मात्र काही तासानंतर त्याला मिरगी यायला लागल्याने पोलीस यंत्रणाही हादरली होती. त्यामुळे त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तीन दिवस उपचार केल्यानंतर बुधवारी दुपारी त्याची रुग्णालयातून सुटका झाली. त्यानंतर त्याला लागलीच अटक करण्यात आली. पोलिसांनी मांडले उल्हासनगरात ठाणआनंदा याला पकडल्यानंतर रितेश हा मुंबईच्या दिशेने गेल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना मिळाली होती. त्यानुसार कुराडे यांनी सहायक फौजदार मनोहर देशमुख, रवींद्र पाटील, रामकृष्ण पाटील, शरद भालेराव, विनोद पाटील, संजय सपकाळे, राजेंद्र पाटील,रामचंद्र बोरसे, सुशील पाटील, विजय पाटील व नरेंद्र वारुळे यांचे पथक तयार केले होते. त्यातील काही जण तीन दिवसापासून कल्याण व उल्हासनगरात ठाण मांडून होते. रितेश हा कल्याण रेल्वे स्थानकावर प्लॅटफार्म क्रमांक ४ वर असून तो फरार होण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर उल्हासनगरला थांबलेले पथक ३० मिनिटात तेथे पोहचले व काही कळण्याच्या आत त्याला घेरले. त्याला सायंकाळी जळगावात आणण्यात आले. दरम्यान, हा गुन्हा उघडकीस आणल्यामुळे पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराळे यांनी कुराडे व त्यांच्या पथकाचे कौतुक केले.

आनंदा हटकरला कोठडीदरम्यान, आधी अटकेत असलेल्या आनंदा हटकर याला तपासाधिकारी एन.बी.सूर्यवंशी व महेंद्र बागुल यांनी गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सरकारतर्फे अ‍ॅड.हेमंत मेंडकी यांनी काम पाहिले.

टॅग्स :JalgaonजळगावCrimeगुन्हा