शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सोसाट्याचा वारा... ३५ ते ४० किमी वेगाच्या वादळाने उडविली जळगावकरांची धांदल

By विलास.बारी | Updated: April 20, 2023 20:55 IST

हलक्या सरींमुळे वातावरणात गारवा : दुपारी कडाक्याचे उन, सायंकाळी वादळी पाऊस

विलास बारी

जळगाव : गेल्या काही दिवसांपासून कडक्याच्या उन्हामुळे त्रस्त असलेल्या जळगावकरांना गुरुवारी सायंकाळी ५.३० वाजता वादळी पावसाचा सामना करावा लागला. दुपारी पारा ४१ अंशावर पोहचला असताना, सायंकाळी ५.३० वाजता मात्र वातावरणात बदल होवून, शहरात ३५ ते ४० किमी वेगाने वाहणाऱ्या वादळाने जळगावकरांची धांदल उडाली. त्यात वादळासह शहरातील अर्ध्या भागात पावसाचा शिडकाव झाला. अचानक वादळाने तडाखा दिल्याने बाजारपेठ विस्कळीत झाली होती.

गुरुवारी सकाळी जळगाव शहरातील अर्ध्या भागात ढगांच्या गडागडाटात अवकाळी पावसाने हजेरी दिली. त्यानंतर पुन्हा सकाळी ११ वाजेपासून जळगावच्या कमाल तापमानाचा पारा ४१.९ अंशावर कायम होता. दुपारी चार ते साडेचार वाजता अचानक वातावरण बदल झाला. आकाशात ढगांची गर्दी झाली. ढगाळ वातावरणात देखील उष्ण वारे कायम असल्याने असह्य उकाडा होता. थोड्याच वेळात वादळी वाऱ्यांनी संपूर्ण जळगाव शहराला तडाखा दिला. अचानक आलेल्या वादळामुळे बाजारपेठ विस्कळीत झाली. अनेक भागातील रस्त्यावरील फलकांची देखील मोडतोड झाली. दरम्यान, हलक्या सरींमुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

ममुराबादमध्ये वीज कोसळून गोऱ्हा ठार

सायंकाळी जळगाव शहरासह जळगाव तालुक्यात देखील अनेक भागात पावसाने हजेरी लावली. ढगांच्या गडगडाट व वीजांच्या कडकडाटानंतर ममुराबाद येथील शेतकरी अशोक नागो पाटील हे शेतातून आपल्या बैलगाडे घेवून घरी निघाले असताना, गावातील मनुदेवी मंदिराजवळ वीज कोसळल्याने गोऱ्हा ठार झाला. सुदैवाने सालदार व बैलजोडीला कोणतीही दुखापत झाली नाही.

टॅग्स :Rainपाऊसcycloneचक्रीवादळJalgaonजळगाव