शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
2
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
3
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
4
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
5
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
6
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
7
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
8
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
9
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
10
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
11
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
12
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
13
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
14
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
15
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
16
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
17
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
18
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
19
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
20
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र

जळगावकरांना तर सुविधा देत येत नाही, आम्हाला काय देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2021 4:15 AM

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मनपातील सत्ताधाऱ्यांनी शहरालगत असलेली पाच गावे मनपा हद्दीत करण्याचा ठराव केल्यानंतर आता पाचही गावांमधून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मनपातील सत्ताधाऱ्यांनी शहरालगत असलेली पाच गावे मनपा हद्दीत करण्याचा ठराव केल्यानंतर आता पाचही गावांमधून मनपा सत्ताधाऱ्यांनी केलेला निर्णयाला विरोध होत आहे. जळगावकरांना सुविधा मिळत नसून, त्यापासून नागरिक वंचित आहेत. अशा परिरस्थितीत हद्दवाढ झाल्यानंतर आमच्या गावाला सुविधा मिळणे कठीण होवून जाईल. त्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी जळगाव शहराचा विकास करून घ्यावा, आमच्या गावाचा हद्दवाढीबाबत मनपाने विचार करू नये. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आमच्या गावाचा विकास आम्ही करून घेवू असे मत मण्यारखेडा येथील ग्रामस्थांनी व्यक्त करत हद्दवाढीचा विरोध केला आहे.

मण्यारखेडा हे गाव लहानसे असले तरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावाचा विकास चांगल्या प्रकारे होत आहे. तसेच नागरिकांना कोणत्याही तक्रारी असल्या तरी त्या गावातल्या गावातच सोडविल्या जातात. आमच्या गावाचा समावेश जर मनपा हद्दीत करण्यात आला. तर लहानातल्या लहान समस्येसाठी देखील नागरिकांना जळगाव शहरात येवून महानगरपालिकेत जावे लागेल. यासह ग्रामपंचायतीला १४ व्या वित्त आयोगाकडून गावाचा विकास करण्यासाठी पुरेसा निधी मिळत आहे. महानगरपालिकेत गावाचा समावेश झाला तर नागरिकांना विकासासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी केलेला ठराव रद्द करावा, अन्यथा ग्रामस्थांना मनपा विरोधात आंदोलन करावे लागेल असा इशारा मण्यारखेडा येथील ग्रामस्थांनी दिला आहे.

कोट...

मण्यारखेडा येथील नागरिकांना ग्रामपंचायतीच्या कारभारापासून कोणत्याही तक्रारी नाहीत. गावाचा विकास चांगल्याप्रकारे होत असून, नागरिकांना मुलभुत सुविधा देखील मिळत आहेत. त्यामुळे मनपा हद्दवाढीला आमचा विरोध आहे.

-शालूबाई पाटील, सरपंच, मण्यारखेडा

जळगावमध्ये धुळीची मोठ्या समस्या अनेक वर्षांपासून आहे. ही समस्या अजूनही मनपाला सोडविता आली नाही. अनेक भागात गटारी नाहीत, रस्ते नाहीत. अशा परिस्थितीत महापालिका आमच्या गावात काय विकास करेल ? त्यापेक्षा आमची ग्रामपंचायतच सक्षम आहे.

-भगवान पाटील, उपसरपंच, मण्यारखेडा

आमचा मनपा हद्दीत जाण्यास विरोध आहे. कोणत्याही परिस्थितीत आमचे गाव मनपाच्या हद्दीत जावू देणार नाही. याविरोधात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ठराव केला जाणार आहे.

-संदीप अहिरे, ग्रा.पं.सदस्य

मनपा प्रशासनाची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. त्यामुळे शहरात सुविधा मिळत नाही. आमच्या गावात सर्वसामान्य नागरिकांना दररोज पाणी मिळत आहे. गटारी चांगल्या आहेत, रस्ते आहेत. अशा परिस्थितीत मनपात जावून गावाचा विकास थांबून जाईल.

-नामदेव पाटील, ग्रा.पं,सदस्य