शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

Jalgaon: महायुतीचे सरकार येण्यासाठी आम्हीही प्रचंड त्रास सहन केला, गुलाबराव पाटील यांचं मोठं विधान

By अमित महाबळ | Updated: January 14, 2024 20:01 IST

Gulabrao Patil: राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून प्रचंड त्रास सहन केला. त्या परिस्थितीत काय होईल हे माहीत नव्हते. चुकीचा निकाल लागला असता तर आमचे काय झाले असते? याचा विचार भाजपा कार्यकर्त्यांनी करावा, अशी भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केली.

- अमित महाबळजळगाव  - राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून प्रचंड त्रास सहन केला. त्या परिस्थितीत काय होईल हे माहीत नव्हते. चुकीचा निकाल लागला असता तर आमचे काय झाले असते? याचा विचार भाजपा कार्यकर्त्यांनी करावा, अशी भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केली.

जळगाव जिल्हा शिवसेना व भाजपाचा बालेकिल्ला आहे. आमची युती बळजबरीने झालेली नाही, तर हिंदुत्वाच्या विचारांवर आधारित आहे. महायुतीचे सरकार येण्यासाठी आम्हाला सर्वांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्या दिवसांत मुले, आई, बायकोला गद्दार म्हणून हिणवले गेले. आमचे घरातले फोन बंद असायचे. त्या परिस्थितीत काय होईल हे आम्हाला माहीत नव्हते. भाजपा कार्यकर्त्यांनी आमचा विचार करून पाहावा. चुकीचा निकाल लागला असता तर आमचे काय झाले असते ? असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

आम्हीही झेंडे वाटले...प्रभू श्रीराम सगळ्यांचे आहेत. आम्हीही गावात झेंडे वाटले. आंदोलनादरम्यान कारागृहात गेलो होतो. जिल्हा परिषद, पंचायत समिती या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीतही १०० टक्के युती झाली पाहिजे. ६०-६५ दिवसांवर लोकसभा निवडणुका आलेल्या आहेत. त्या आजपासूनच लागल्या आहेत, असे समजावे. महायुतीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता गडबड करत असेल तर त्याला समज देण्याची जबाबदारी समन्वयकांची आहे, असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलJalgaonजळगाव