शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: महायुतीचे सरकार येण्यासाठी आम्हीही प्रचंड त्रास सहन केला, गुलाबराव पाटील यांचं मोठं विधान

By अमित महाबळ | Updated: January 14, 2024 20:01 IST

Gulabrao Patil: राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून प्रचंड त्रास सहन केला. त्या परिस्थितीत काय होईल हे माहीत नव्हते. चुकीचा निकाल लागला असता तर आमचे काय झाले असते? याचा विचार भाजपा कार्यकर्त्यांनी करावा, अशी भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केली.

- अमित महाबळजळगाव  - राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून प्रचंड त्रास सहन केला. त्या परिस्थितीत काय होईल हे माहीत नव्हते. चुकीचा निकाल लागला असता तर आमचे काय झाले असते? याचा विचार भाजपा कार्यकर्त्यांनी करावा, अशी भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केली.

जळगाव जिल्हा शिवसेना व भाजपाचा बालेकिल्ला आहे. आमची युती बळजबरीने झालेली नाही, तर हिंदुत्वाच्या विचारांवर आधारित आहे. महायुतीचे सरकार येण्यासाठी आम्हाला सर्वांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्या दिवसांत मुले, आई, बायकोला गद्दार म्हणून हिणवले गेले. आमचे घरातले फोन बंद असायचे. त्या परिस्थितीत काय होईल हे आम्हाला माहीत नव्हते. भाजपा कार्यकर्त्यांनी आमचा विचार करून पाहावा. चुकीचा निकाल लागला असता तर आमचे काय झाले असते ? असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

आम्हीही झेंडे वाटले...प्रभू श्रीराम सगळ्यांचे आहेत. आम्हीही गावात झेंडे वाटले. आंदोलनादरम्यान कारागृहात गेलो होतो. जिल्हा परिषद, पंचायत समिती या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीतही १०० टक्के युती झाली पाहिजे. ६०-६५ दिवसांवर लोकसभा निवडणुका आलेल्या आहेत. त्या आजपासूनच लागल्या आहेत, असे समजावे. महायुतीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता गडबड करत असेल तर त्याला समज देण्याची जबाबदारी समन्वयकांची आहे, असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलJalgaonजळगाव