शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

Jalgaon: महायुतीचे सरकार येण्यासाठी आम्हीही प्रचंड त्रास सहन केला, गुलाबराव पाटील यांचं मोठं विधान

By अमित महाबळ | Updated: January 14, 2024 20:01 IST

Gulabrao Patil: राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून प्रचंड त्रास सहन केला. त्या परिस्थितीत काय होईल हे माहीत नव्हते. चुकीचा निकाल लागला असता तर आमचे काय झाले असते? याचा विचार भाजपा कार्यकर्त्यांनी करावा, अशी भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केली.

- अमित महाबळजळगाव  - राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून प्रचंड त्रास सहन केला. त्या परिस्थितीत काय होईल हे माहीत नव्हते. चुकीचा निकाल लागला असता तर आमचे काय झाले असते? याचा विचार भाजपा कार्यकर्त्यांनी करावा, अशी भावना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी महायुतीच्या कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केली.

जळगाव जिल्हा शिवसेना व भाजपाचा बालेकिल्ला आहे. आमची युती बळजबरीने झालेली नाही, तर हिंदुत्वाच्या विचारांवर आधारित आहे. महायुतीचे सरकार येण्यासाठी आम्हाला सर्वांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. त्या दिवसांत मुले, आई, बायकोला गद्दार म्हणून हिणवले गेले. आमचे घरातले फोन बंद असायचे. त्या परिस्थितीत काय होईल हे आम्हाला माहीत नव्हते. भाजपा कार्यकर्त्यांनी आमचा विचार करून पाहावा. चुकीचा निकाल लागला असता तर आमचे काय झाले असते ? असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले.

आम्हीही झेंडे वाटले...प्रभू श्रीराम सगळ्यांचे आहेत. आम्हीही गावात झेंडे वाटले. आंदोलनादरम्यान कारागृहात गेलो होतो. जिल्हा परिषद, पंचायत समिती या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीतही १०० टक्के युती झाली पाहिजे. ६०-६५ दिवसांवर लोकसभा निवडणुका आलेल्या आहेत. त्या आजपासूनच लागल्या आहेत, असे समजावे. महायुतीमध्ये शिवसेना, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता गडबड करत असेल तर त्याला समज देण्याची जबाबदारी समन्वयकांची आहे, असेही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलJalgaonजळगाव