शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

Jalgaon: दोन सिलिंडर फुटले, आगीमध्ये संसाराची राखरांगोळी, तीन कुटुंबे आले उघड्यावर

By विजय.सैतवाल | Updated: March 18, 2024 22:36 IST

Jalgaon News: कुटुंबातील सर्व सदस्य कामावर गेलेले असताना घरात अचानक आग लागून पत्र्याचे तीन घरे जळून खाक झाले. या आगीमुळे दोन गॅस सिलिंडर फुटण्यासह घरातील फ्रिज, कपाट, कपडे, धान्य, भांडे, महत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कमसह सर्व काही आगीच्या भक्षस्थानी सापडले.

- विजयकुमार सैतवाल जळगाव - कुटुंबातील सर्व सदस्य कामावर गेलेले असताना घरात अचानक आग लागून पत्र्याचे तीन घरे जळून खाक झाले. या आगीमुळे दोन गॅस सिलिंडर फुटण्यासह घरातील फ्रिज, कपाट, कपडे, धान्य, भांडे, महत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कमसह सर्व काही आगीच्या भक्षस्थानी सापडले. त्यामुळे चार कुटुंबे उघड्यावर आली आहे. ही घटना सोमवार, १८ मार्च रोजी मन्यारखेडा परिसरात घडली.

मन्यारखेडा परिसरातील साईनगर भागात मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांची घरे आहेत. यापैकी एका शेजारी एक असलेल्या पत्र्यांच्या तीन घरात नितीन भटकर, अशोक भटकर, रोहित सुनील भारुळे, रमेश यशवंत शिंदे यांचे कुटुंब राहते. सोमवारी, १८ फेब्रुवारी रोजी सकाळी या चारही कुटुंबातील सर्व सदस्य कामावर गेले होते. त्यानंतर अचानक घरामध्ये आग लागली व ती पसरत गेल्याने तीन घरे त्यात जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील सदस्य घराकडे पोहचले. तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी सिलिंडर फुटल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.  

दोन बंबांद्वारे आग नियंत्रणातआगीची माहिती महापालिकेच्या अग्नीशमन विभागाला देण्यात आली. त्या वेळी निवांत इंगळे, प्रदीप धनगर, संजय तायडे, भूषण पाटील, नितीन ससाने, चेतन सपकाळे हे तेथे पोहचले व त्यांनी दोन बंबाद्वारे आग नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण करून सर्व काही नष्ट झाले होते.

सिलिंडर, फ्रिज फुटलेआग लागल्यानंतर घरातील एका पाठोपाठ दोन सिलिंडर फुटले. त्यामुळे आग अधिकच वाढली. त्यामुळे घरातील कपडे, लोखंडी कपाट, भांडे, धान्यही जळाले. या शिवाय धान्याच्या कोठ्या, भांड्याचे रॅक जळून वाकले. या आगीमध्ये फ्रिजही फुटले व त्याचे वेगवेगळे तुकडे झाले.

रोख रक्कम, कागदपत्रेही जळालीघरात आवश्यक व महत्त्वाची कागदपत्रेही कपाटात ठेवलेले होते. तेदेखील जळून खाक झाले. इतकेच नव्हे घरात ठेवलेली रोख रक्कमही जळून नष्ट झाली.

सर्व काही संपले, आता काय करावे?आगीमुळे चार कुटुंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घरातील सर्व सदस्य बाहेर गेलेले असल्याने सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. मात्र घरात काहीच शिल्लक राहिले नसून केवळ अंगावरचे कपडे शिल्लक राहिले आहे. आगीमुळे सर्वकाही संपले असून आता काय करावे, असा प्रश्न या कुटुंबांनी उपस्थित केला.

टॅग्स :Jalgaonजळगावfireआग