शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
3
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
4
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
5
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
6
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
7
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
8
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
9
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
10
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
11
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
12
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
13
IND vs SA Final :अमनजोत कौरनं घेतलेल्या लॉराच्या कॅचवर फिरली मॅच; व्हिडिओ बघाच
14
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
15
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
16
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
17
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
18
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
19
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
20
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी

Jalgaon: दोन सिलिंडर फुटले, आगीमध्ये संसाराची राखरांगोळी, तीन कुटुंबे आले उघड्यावर

By विजय.सैतवाल | Updated: March 18, 2024 22:36 IST

Jalgaon News: कुटुंबातील सर्व सदस्य कामावर गेलेले असताना घरात अचानक आग लागून पत्र्याचे तीन घरे जळून खाक झाले. या आगीमुळे दोन गॅस सिलिंडर फुटण्यासह घरातील फ्रिज, कपाट, कपडे, धान्य, भांडे, महत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कमसह सर्व काही आगीच्या भक्षस्थानी सापडले.

- विजयकुमार सैतवाल जळगाव - कुटुंबातील सर्व सदस्य कामावर गेलेले असताना घरात अचानक आग लागून पत्र्याचे तीन घरे जळून खाक झाले. या आगीमुळे दोन गॅस सिलिंडर फुटण्यासह घरातील फ्रिज, कपाट, कपडे, धान्य, भांडे, महत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कमसह सर्व काही आगीच्या भक्षस्थानी सापडले. त्यामुळे चार कुटुंबे उघड्यावर आली आहे. ही घटना सोमवार, १८ मार्च रोजी मन्यारखेडा परिसरात घडली.

मन्यारखेडा परिसरातील साईनगर भागात मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांची घरे आहेत. यापैकी एका शेजारी एक असलेल्या पत्र्यांच्या तीन घरात नितीन भटकर, अशोक भटकर, रोहित सुनील भारुळे, रमेश यशवंत शिंदे यांचे कुटुंब राहते. सोमवारी, १८ फेब्रुवारी रोजी सकाळी या चारही कुटुंबातील सर्व सदस्य कामावर गेले होते. त्यानंतर अचानक घरामध्ये आग लागली व ती पसरत गेल्याने तीन घरे त्यात जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील सदस्य घराकडे पोहचले. तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी सिलिंडर फुटल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.  

दोन बंबांद्वारे आग नियंत्रणातआगीची माहिती महापालिकेच्या अग्नीशमन विभागाला देण्यात आली. त्या वेळी निवांत इंगळे, प्रदीप धनगर, संजय तायडे, भूषण पाटील, नितीन ससाने, चेतन सपकाळे हे तेथे पोहचले व त्यांनी दोन बंबाद्वारे आग नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण करून सर्व काही नष्ट झाले होते.

सिलिंडर, फ्रिज फुटलेआग लागल्यानंतर घरातील एका पाठोपाठ दोन सिलिंडर फुटले. त्यामुळे आग अधिकच वाढली. त्यामुळे घरातील कपडे, लोखंडी कपाट, भांडे, धान्यही जळाले. या शिवाय धान्याच्या कोठ्या, भांड्याचे रॅक जळून वाकले. या आगीमध्ये फ्रिजही फुटले व त्याचे वेगवेगळे तुकडे झाले.

रोख रक्कम, कागदपत्रेही जळालीघरात आवश्यक व महत्त्वाची कागदपत्रेही कपाटात ठेवलेले होते. तेदेखील जळून खाक झाले. इतकेच नव्हे घरात ठेवलेली रोख रक्कमही जळून नष्ट झाली.

सर्व काही संपले, आता काय करावे?आगीमुळे चार कुटुंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घरातील सर्व सदस्य बाहेर गेलेले असल्याने सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. मात्र घरात काहीच शिल्लक राहिले नसून केवळ अंगावरचे कपडे शिल्लक राहिले आहे. आगीमुळे सर्वकाही संपले असून आता काय करावे, असा प्रश्न या कुटुंबांनी उपस्थित केला.

टॅग्स :Jalgaonजळगावfireआग