शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

Jalgaon: दोन सिलिंडर फुटले, आगीमध्ये संसाराची राखरांगोळी, तीन कुटुंबे आले उघड्यावर

By विजय.सैतवाल | Updated: March 18, 2024 22:36 IST

Jalgaon News: कुटुंबातील सर्व सदस्य कामावर गेलेले असताना घरात अचानक आग लागून पत्र्याचे तीन घरे जळून खाक झाले. या आगीमुळे दोन गॅस सिलिंडर फुटण्यासह घरातील फ्रिज, कपाट, कपडे, धान्य, भांडे, महत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कमसह सर्व काही आगीच्या भक्षस्थानी सापडले.

- विजयकुमार सैतवाल जळगाव - कुटुंबातील सर्व सदस्य कामावर गेलेले असताना घरात अचानक आग लागून पत्र्याचे तीन घरे जळून खाक झाले. या आगीमुळे दोन गॅस सिलिंडर फुटण्यासह घरातील फ्रिज, कपाट, कपडे, धान्य, भांडे, महत्त्वाची कागदपत्रे, रोख रक्कमसह सर्व काही आगीच्या भक्षस्थानी सापडले. त्यामुळे चार कुटुंबे उघड्यावर आली आहे. ही घटना सोमवार, १८ मार्च रोजी मन्यारखेडा परिसरात घडली.

मन्यारखेडा परिसरातील साईनगर भागात मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांची घरे आहेत. यापैकी एका शेजारी एक असलेल्या पत्र्यांच्या तीन घरात नितीन भटकर, अशोक भटकर, रोहित सुनील भारुळे, रमेश यशवंत शिंदे यांचे कुटुंब राहते. सोमवारी, १८ फेब्रुवारी रोजी सकाळी या चारही कुटुंबातील सर्व सदस्य कामावर गेले होते. त्यानंतर अचानक घरामध्ये आग लागली व ती पसरत गेल्याने तीन घरे त्यात जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबातील सदस्य घराकडे पोहचले. तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण केले होते. आगीचे नेमके कारण समजू शकले नसले तरी सिलिंडर फुटल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.  

दोन बंबांद्वारे आग नियंत्रणातआगीची माहिती महापालिकेच्या अग्नीशमन विभागाला देण्यात आली. त्या वेळी निवांत इंगळे, प्रदीप धनगर, संजय तायडे, भूषण पाटील, नितीन ससाने, चेतन सपकाळे हे तेथे पोहचले व त्यांनी दोन बंबाद्वारे आग नियंत्रणात आणली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररुप धारण करून सर्व काही नष्ट झाले होते.

सिलिंडर, फ्रिज फुटलेआग लागल्यानंतर घरातील एका पाठोपाठ दोन सिलिंडर फुटले. त्यामुळे आग अधिकच वाढली. त्यामुळे घरातील कपडे, लोखंडी कपाट, भांडे, धान्यही जळाले. या शिवाय धान्याच्या कोठ्या, भांड्याचे रॅक जळून वाकले. या आगीमध्ये फ्रिजही फुटले व त्याचे वेगवेगळे तुकडे झाले.

रोख रक्कम, कागदपत्रेही जळालीघरात आवश्यक व महत्त्वाची कागदपत्रेही कपाटात ठेवलेले होते. तेदेखील जळून खाक झाले. इतकेच नव्हे घरात ठेवलेली रोख रक्कमही जळून नष्ट झाली.

सर्व काही संपले, आता काय करावे?आगीमुळे चार कुटुंबांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घरातील सर्व सदस्य बाहेर गेलेले असल्याने सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही. मात्र घरात काहीच शिल्लक राहिले नसून केवळ अंगावरचे कपडे शिल्लक राहिले आहे. आगीमुळे सर्वकाही संपले असून आता काय करावे, असा प्रश्न या कुटुंबांनी उपस्थित केला.

टॅग्स :Jalgaonजळगावfireआग