शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

जळगावात मोठा अपघात; गव्हाने भरलेला भरधाव ट्रक गेट तोडून रेल्वेवर आदळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 11:29 IST

बोदवडनजीक पहाटेची घटना, जिवीत हानी टळली

गोपाल व्यास

बोदवड (जि.जळगाव) : धान्याने भरलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक रेल्वे गेट तोडून मुंबई - अमरावती एक्सप्रेसच्या इंजिनवर जाऊन धडकला. यात कुठलिही जिवित हानी झाली नाही. ही घटना शुक्रवारी पहाटे ५ वाजता बोदवड रेल्वेस्थानकापासून  ५०० मीटर अंतरावर घडली. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल ते अमरावती डाऊन एक्सप्रेस (क्.१२१११)  ही गाडी सकाळी पाच वाजेच्या दरम्यान बोदवड रेल्वे गेट जवळून जात होती. त्याचवेळी बंद असलेले रेल्वेगेट तोडून एक ट्रक रेल्वे मार्गात घुसला आणि रेल्वे इंजिनवर जाऊन आदळला. इकडे एक्सप्रेसची गती कमी असल्याने चालकाने ब्रेक लावून गाडी थांबवली. तर ट्रक इंजिनवर धडकताच ट्रकचालक उडी घेत पसार झाला. एक्सप्रेस चालकाने तात्काळ ब्रेक लावल्याने मोठी दुर्घटना टळली.  मात्र एक्सप्रेसमध्ये झोपलेले प्रवासी बर्थवरुन खाली पडले.

अपघातामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम

बोदवडनजीक झालेल्या अपघातामुळे  रेल्वेची हाय टेन्शन वायर तुटली आहे. त्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अमरावती एक्सप्रेस त्याठिकाणीच थांबविण्यात आली आहे. डाऊन मार्गावरील महाराष्ट्र एक्सप्रेस, भुसावळ - बडनेरा मेमू आणि शालिमार एक्सप्रेस या गाड्या तसेच अप मार्गावरील चेन्नई- अहमदाबाद एक्सप्रेस, वर्धा-  भुसावळ या गाड्या ३ते ४ तास उशिराने धावत आहेत.

टॅग्स :JalgaonजळगावAccidentअपघातIndian Railwayभारतीय रेल्वे