शहरं
Join us  
Trending Stories
1
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
2
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
3
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण
5
‘मला एक सांगा, हा डोरेमॉन कोण? भाजपा प्रवक्त्याची रवींद्र धंगेकर यांनी उडवली खिल्ली
6
डिस्चार्जसाठी रुग्णालयांकडून जाणूनबुजून केला जातोय उशीर? इन्शुरन्सच ठरतोय रुग्णांसाठी डोकेदुखी
7
छत्तीसगडमध्ये 'सूर्यकिरण एरोबॅटिक शो'मधून घडणार भारतीय हवाई दलाच्या शौर्याचे दर्शन !
8
भारताच्या 'त्रिशूल' युद्धाभ्यासाने पाकिस्तान हादरला! संपूर्ण हवाई क्षेत्र केले बंद; राजनाथ सिंह यांच्या 'त्या' इशाऱ्याची चर्चा
9
महागात पडला सायबर अटॅक? 'या' कंपनीनं TCS सोबत संपवलं कॉन्ट्रॅक्ट, ३०० मिलियन पौड्सचा बसला फटका
10
मंत्रिमंडळ बैठक: जात वैधता प्रमाणपत्राबाबत मोठा निर्णय; रेल्वेसाठी निधी, १०० उपक्रम निश्चित
11
Plane Crash: केनियात मोठी दुर्घटना! मसाई माराकडे जाणारे विमान कोसळले; १२ जणांच्या मृत्युची भीती
12
शशी थरुर यांना आवडली बॉलिवूडची 'ही' वेबसीरिज, म्हणाले "परिपूर्ण OTT गोल्ड..."
13
रतन टाटांच्या जवळच्या मेहली मिस्त्रींना टाटा ट्रस्ट्समधून धक्का! नोएल टाटांचा निर्णयावर प्रभाव
14
कर्नाटक उच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मोठा धक्का, आरएसएसला मोठा दिलासा मिळाला
15
"मनसे कार्यालयात घुसून जो कुणी त्यांना मारेल..."; सुनील शुक्ला यांची राज ठाकरेंवर जहरी टीका
16
उत्तर प्रदेशमधील आणखी एका शहराचं नाव बदललं, मुस्तफाबादचं 'कबीरधाम' झालं, योगींची घोषणा 
17
ट्रम्प पाहत राहिले..! भारताचा रशियासोबत मोठा करार, आता देशात तयार होणार सुखोई सुपरजेट
18
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
19
Crime: 'तुला जिवंत सोडणार नाही' धमकीनंतर २४ तासात गर्लफ्रेन्डला जिवंत जाळलं!
20
हिंदीतील प्रसिद्ध अभिनेत्री अमेरिकेत स्थायिक, 'त्या' कारणाने ८ वर्षांनी मोडला संसार, आज...

शिक्षकाने बदलले थेवापाणी शाळेचे रुप...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2018 16:46 IST

अवघ्या चार महिन्यापूर्वी गावाच्या शाळेत बदलून आलेल्या एका ध्येयवेड्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना शाळेशी लळा लावला असून ग्रामस्थांनीही परिवर्तनाचा वेध घेतला आहे.

- रमाकांत पाटीलनंदुरबार - एखाद्या शिक्षकाने ठरवले तर खऱ्या अर्थाने गावात सुधारणा करू शकतो याची प्रचिती थेवापाणी, ता.तळोदा येथील ग्रामस्थ घेत आहेत. अवघ्या चार महिन्यापूर्वी गावाच्या शाळेत बदलून आलेल्या एका ध्येयवेड्या शिक्षकाने विद्यार्थ्यांना शाळेशी लळा लावला असून ग्रामस्थांनीही परिवर्तनाचा वेध घेतला आहे.थेवापाणी हे सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील पाडा. तळोदा तालुक्यातील केलीपाणी या गावाचा जेमतेम ३०० लोकवस्तीचा हा पाडा. या गावाला जाण्यासाठी अद्याप कुठलाही रस्ता झालेला नाही. टाकली या गावापर्यंत जेमतेम दुचाकी वाहन जाते. तेथून डोंगरदºयात आठ किलोमीटरची पायपीट केल्यानंतर या गावाला पोहोचता येते. रस्ता प्रचंड चढउताराचा असल्याने येथे पोहोचण्यासाठी अक्षरश: दमछाक होते. याठिकाणी पूर्वी काटेरी झाडे (निवडूंग) होते. त्याठिकाणी पाण्याचा झरा होता. लोक तेथे पाणी घेण्यासाठी जात असत. त्यावरूनच या गावाचे नाव थेवापाणी झाले. अर्थात थेवा म्हणजे त्यांच्या स्थानिक भाषेत काटेरी झाडे. याठिकाणी पूर्वी शाळा नव्हती.वस्तीशाळा सुरू झाली. त्याचेच रुपांतर १० वर्षापूर्वी जिल्हा परिषद शाळेत झाले. गावातील एका झोपडीत ही शाळा सुरू आहे. पूर्वी येथे अनियमित शाळा असल्याने शाळेत जेमतेम विद्यार्थी. यावर्षी शाळेच्या पटावर १६ विद्यार्थी आहेत. याच शाळेवर जून महिन्यात एक ध्येयवेडा शिक्षक चंद्रकांत सपकाळे यांची बदली झाली. सपकाळे यांना नुकताच राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांनी शाळेत जाताच पहिल्या दिवसापासून शाळेच्या कामात झोकून दिले. याठिकाणी रस्ता नसल्याने व पायपीट करून जावे लागत असल्याने सपकाळे यांनी सोमवारी सकाळी शाळेवर पोहोचल्यानंतर तेथेच शनिवारपर्यंत मुक्कामी राहतात. पहिल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याकडे स्वत: जाऊन शाळेत बोलविले. विद्यार्थ्यांचा निरुत्साह व मरगळ झटकण्यासाठी वेगवेगळे प्रयोग सुरू केले.सर्व मुलांना गावाजवळीलच नाल्यावर नेवून आंघोळ घातली. त्यांना सर्वशिक्षा अभियानांतर्गत गणवेश दिले. शिवाय स्वखर्चाने टाय आणि बेल्ट दिले. पाट्या दिल्या. विद्यार्थ्यांची शाळेविषयी गोडी वाढवली. अवघ्या महिनाभरात या विद्यार्थ्यांना शाळेचा इतका लळा लागला की ११ वाजता भरणारी शाळा सकाळी नऊलाच भरते. शिक्षक शाळेतच मुक्कामी राहत असल्याने नऊलाच शाळा सुरू होते. ग्रामस्थांमध्येही या शिक्षकाविषयी प्रेम वाढले. सपकाळे तेथेच मुक्कामी राहत असल्याने शाळा सुटल्यानंतर प्रत्येक पालक व ग्रामस्थांच्या घरी जाऊन चर्चा करतात, वेगवेगळ्या विषयांचे मार्गदर्शन करतात. त्यामुळे ग्रामस्थही त्यांच्यावर प्रेम करतात. परिणामी रोज त्यांना ग्रामस्थांकडूनच जेवण दिले जाते. शाळेला इमारत नसल्याने आता ग्रामस्थांनी इमारत बांधण्याचाही संकल्प केला असून लवकरच त्या कामाला सुरुवात होणार आहे.आमच्या गावाची शाळा अतिदुर्गम भागात असल्याने याठिकाणी पूर्वी दुर्लक्ष होते. पण सपकाळे गुरुजी शाळेतच मुक्कामी राहत असल्याने त्यांनी शाळा बदलली. आता आम्ही शाळेसाठी इमारत बांधण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाकडून मिळणाºया रकमेतून येथे शाळा बांधली जाणार नाही. त्यासाठी ग्रामस्थ श्रमदान करणार असून गावातच तात्पुरती वीटभट्टी सुरू करणार आहे.-बोखा पाडवी, ग्रामस्थ, थेवापाणी, ता.तळोदा.

टॅग्स :SchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र