शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
2
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
3
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
4
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
5
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
6
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
7
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
8
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
9
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
10
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
11
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
12
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
13
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
14
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
15
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
16
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
17
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...
18
ITR ची डेडलाईन ४५ दिवसांनी का वाढवली? १२ लाखांपर्यंतचा 'नो टॅक्स' आता नाही, पुढच्या वर्षी
19
“विद्यार्थी स्कूल व्हॅनला शासन मंजुरी, सुरक्षित वाहतुकीसह बेरोजगारांना रोजगार संधी”: सरनाईक
20
आयकर कायद्याचा चेहरामोहरा बदलणार? अर्थमंत्र्यांनी सादर केले नवे विधेयक, 'हे' मोठे बदल तुमच्यासाठी महत्त्वाचे!

कोविडमध्ये अनुकंपावर नोकरीत सामावून घेणारे जळगाव पोलीस राज्यात पहिले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 20:16 IST

६८ जणांना दिले नियुक्तीपत्र : अवघ्या सहा दिवसात राबविली प्रक्रिया

जळगाव : कर्तव्यावर असताना कोरोनामुळे असो की इतर घटनांमध्ये जीव जीव गमावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपावर तात्काळ पोलीस सेवेत सामावून घेण्यात जळगाव पोलीस दल राज्यात पहिले ठरले आहे, अवघ्या सहा दिवसात ही प्रक्रिया पार पाडण्यात आली याचा आपल्याला गर्व असल्याची भावना नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांनी व्यक्त केली. दिघावकर यांच्याहस्ते बुधवारी ६८ पोलीस पाल्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनात हा कार्यक्रम झाला. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागोजीराव चव्हाण आदी व्यासपीठावर उपस्थित होते. कोरोनामुळे सहा पोलीस कर्मचाऱ्यांचा जीव गेला आहे. त्यांच्यातील तीन पाल्यांना नोकरीत सामावून घेण्यात आले आहे. बाकीच्या पाल्यांचे वय अपूर्ण असल्याने त्यांनाही पुढच्या टप्प्यात सामावून घेतले जाणार आहे. त्याशिवाय इतर कर्मचाऱ्यांच्या ६५ पाल्यांना सेवेत घेण्यात आले असून त्यात ५२ पुरुष व १६ महिलांचा समावेश आहे. अनुकंपावर असल्याने या उमेदवारांची फक्त शारीरीक चाचणी घेण्यात आली.अनुकंपाचीही एकही जागा रिक्त नाहीपोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी सांगितले की, २०१९ च्या भरतीच्या अनुषंगाने २२ टक्के जागा भरण्याची मुभा होती, त्याचा आकडा ३५ होता तर २०२० मध्ये रिक्त जागेनुसार ४१ जागांना मान्यता मिळाली. त्यात ३९ उमेदवार पात्र ठरले. अनुकंपावरील सर्व उमेदवारांना नोकरीत सामावून घेतल्यामुळे आता एकही जागा शिल्लक राहिलेली नाही. ज्या आहेत, त्यांची वयोमर्यादा पूर्ण झाली की त्यांनाही सामावून घेण्याचे आश्वासन मुंढे यांनी दिले. या कामासाठी सलग सहा दिवस मेहनत घेणारे उपअधीक्षक (गृह) डी.एम.पाटील, कार्यालय अधीक्षक नागेश हडपे व त्यांच्या सहकार्यांचे दिघावकर व डॉ.मुंढे यांनी कौतूक केले.

टॅग्स :PoliceपोलिसJalgaonजळगाव