शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Jalgaon: जळगावात हिवाळ्यात ही वीजेचा लपंडाव, रात्री-अपरात्री लाईट गुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2024 21:54 IST

Jalgaon: ​​​​​​​जळगाव शहरातील अनेक भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे दिवसा, रात्री-अपरात्री केव्हाही लाईट ये-जा करत असल्याने नागरिकांच्या डोक्याला वैताग आला आहे.

- भूषण श्रीखंडे जळगाव - शहरातील अनेक भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे दिवसा, रात्री-अपरात्री केव्हाही लाईट ये-जा करत असल्याने नागरिकांच्या डोक्याला वैताग आला आहे. त्यात अनेक भागात ज्या वेळी नळाला पाणी येते त्यावेळी लाईट ये-जा करत असल्याने पाणी भरता येत नसल्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

थंडीच्या दिवसात जळगावातील काही भागात गेल्या दोन-तीन दिवसांपासून उन्हाळ्यात ज्या पद्धतीने विजेचा लंपडाव होत आहे. दिवसा, रात्री-अपरात्री केव्हाही लाईट जाण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे वीज ये-जा करत असल्याने महिला वर्गाला याचा जास्त त्रास होत आहे. त्यात ऐन सायंकाळी अंधार पडल्यावर लाईट जास्त वेळा जात असल्याने महिलांची धावपळ होत आहे. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यास दोन-तीन महिने अजून बाकी असूनदेखील आतापासून विजेचा लंपडाव जळगावकरांना अनुभवयास मिळत आहे.

महावितरणकडून सुरू होती दुरुस्तीमहावितरणकडून काही सबस्टेशन अंतर्गत दुरुस्तीचे कामे गेल्या तीन-चार दिवसांपासून हाती घेतले आहे. यात डीपीवरील दुरुस्ती, वीजवाहिन्यांना जॉईंट मारणे, सर्व्हिस वायर बदलविणे आदी विद्युत लाइनवरील कामे महावितरणे घेतले होते.

या भागात विजेचा लंपडाव सुरूकिसनराव नगर सबस्टेशन, हुडको सबस्टेशन अंतर्गत येणाऱ्या परिसरात विजेचा लपंडावचा खेळ काही दिवसांपासून जास्त प्रमाणात दिसत आहे. त्यात शहरातील अन्य भागात देखील वीज ये-जा करण्याचे प्रमाण वाढल्याची माहिती नागरिकांनी ‘लोकमत’ला दिली आहे.

टॅग्स :electricityवीजJalgaonजळगाव