शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

Jalgaon: गिरणा धरणाची सलग चौथ्या वर्षी शंभरी, ६ तालुक्यांमधील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न लागला मार्गी

By ajay.patil | Updated: September 15, 2022 13:17 IST

Girana Dam: ​​​​​​​जळगाव जिल्ह्यातील ६ तालुक्यांची सिंचनाची व पाण्याची तहान भागविणारे गिरणा धरण सलग चौथ्या वर्षी देखील १०० टक्के भरले असल्याने जिल्ह्यातील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न दोन वर्षांसाठी मिटला आहे

- अजय पाटीलजळगाव -  जिल्ह्यातील ६ तालुक्यांची सिंचनाची व पाण्याची तहान भागविणारे गिरणा धरण सलग चौथ्या वर्षी देखील १०० टक्के भरले असल्याने जिल्ह्यातील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न दोन वर्षांसाठी मिटला आहे. २०१९ पासून गिरणा धरण सलग चार १०० टक्के भरले असून, धरणाची बांधकाम पुर्ण झाल्यानंतर पहिल्यांदाच सलग चार वर्ष या धरणात १०० टक्के जलसाठा राहणार आहे. धरण तयार झाल्यानंतर ते आतापर्यंतच्या ५३ वर्षात हे धरण केवळ १२ वेळा १०० टक्के भरले आहे.

उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठ्या धरणांपैकी एक असलेले व जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणातील जलसाठ्याने जुलै महिन्यातच नव्वदी गाठली होती. गिरणा धरणाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच गिरणा धरण जुलै महिन्यात ९० टक्क्यांपेक्षा जास्त भरले होते. धरण १०० टक्के भरले असल्याने गिरणेतून दोन दरवाज्यातून २ हजार ४४४ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून, धरणातील जलसाठ्यात आवक वाढल्यास धरणातून अजून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत पाटील यांनी दिली आहे.

गिरणा धरणाची माहिती- १९५५ मध्ये गिरणा धरणाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली.- सलग १४ वर्ष काम झाल्यानंतर १९६९ मध्ये या धरणाचे लोकार्पण करण्यात आले.- १९७३ मध्ये गिरणा धरणात पहिल्यांदाच जलसंपन्न झाले.- ५३ वर्षात गिरणा धरण केवळ १२ वेळा १०० टक्के भरले आहे.- या प्रकल्पासाठी १३ कोटी रुपयांचा खर्च आला होता.

या वर्षांमध्ये धरण भरले १०० टक्के१९७३ मध्ये हे धरण पहिल्यांदाच जलसंपन्न झाल्यानंतर १९७६ मध्ये पहिल्यांदाच १०० टक्के भरले होते. त्यानंतर १९८०, १९९४, २००४ ते २००७ सलग १०० टक्के भरले. त्यानंतर २०१९ पासून ते यंदापर्यंत हे धरण १०० टक्के भरत आले आहे.

हे सहा तालुके गिरणेवर अवलंबून१. जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, पाचोरा, धरणगाव व जळगाव या तालुक्यांमधील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न गिरणेमुळे सुटतो.२. गिरणा धरणाची साठवण क्षमता २१ हजार ५०० दशलक्ष घनफुट असून, यातील जिवंत पाणीसाठा वगळून ३ हजार दशलक्ष घनफुट मृत साठा आहे.३. गिरणा धरणात चणकापूर, पुनद या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असतो.

टॅग्स :Jalgaonजळगाव