शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

Jalgaon: गिरणा धरणाची सलग चौथ्या वर्षी शंभरी, ६ तालुक्यांमधील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न लागला मार्गी

By ajay.patil | Updated: September 15, 2022 13:17 IST

Girana Dam: ​​​​​​​जळगाव जिल्ह्यातील ६ तालुक्यांची सिंचनाची व पाण्याची तहान भागविणारे गिरणा धरण सलग चौथ्या वर्षी देखील १०० टक्के भरले असल्याने जिल्ह्यातील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न दोन वर्षांसाठी मिटला आहे

- अजय पाटीलजळगाव -  जिल्ह्यातील ६ तालुक्यांची सिंचनाची व पाण्याची तहान भागविणारे गिरणा धरण सलग चौथ्या वर्षी देखील १०० टक्के भरले असल्याने जिल्ह्यातील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न दोन वर्षांसाठी मिटला आहे. २०१९ पासून गिरणा धरण सलग चार १०० टक्के भरले असून, धरणाची बांधकाम पुर्ण झाल्यानंतर पहिल्यांदाच सलग चार वर्ष या धरणात १०० टक्के जलसाठा राहणार आहे. धरण तयार झाल्यानंतर ते आतापर्यंतच्या ५३ वर्षात हे धरण केवळ १२ वेळा १०० टक्के भरले आहे.

उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठ्या धरणांपैकी एक असलेले व जळगाव जिल्ह्यासाठी वरदान ठरलेल्या गिरणा धरणातील जलसाठ्याने जुलै महिन्यातच नव्वदी गाठली होती. गिरणा धरणाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच गिरणा धरण जुलै महिन्यात ९० टक्क्यांपेक्षा जास्त भरले होते. धरण १०० टक्के भरले असल्याने गिरणेतून दोन दरवाज्यातून २ हजार ४४४ क्युसेक पाण्याचा विसर्ग होत असून, धरणातील जलसाठ्यात आवक वाढल्यास धरणातून अजून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात येईल अशी माहिती गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता हेमंत पाटील यांनी दिली आहे.

गिरणा धरणाची माहिती- १९५५ मध्ये गिरणा धरणाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली.- सलग १४ वर्ष काम झाल्यानंतर १९६९ मध्ये या धरणाचे लोकार्पण करण्यात आले.- १९७३ मध्ये गिरणा धरणात पहिल्यांदाच जलसंपन्न झाले.- ५३ वर्षात गिरणा धरण केवळ १२ वेळा १०० टक्के भरले आहे.- या प्रकल्पासाठी १३ कोटी रुपयांचा खर्च आला होता.

या वर्षांमध्ये धरण भरले १०० टक्के१९७३ मध्ये हे धरण पहिल्यांदाच जलसंपन्न झाल्यानंतर १९७६ मध्ये पहिल्यांदाच १०० टक्के भरले होते. त्यानंतर १९८०, १९९४, २००४ ते २००७ सलग १०० टक्के भरले. त्यानंतर २०१९ पासून ते यंदापर्यंत हे धरण १०० टक्के भरत आले आहे.

हे सहा तालुके गिरणेवर अवलंबून१. जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, एरंडोल, पाचोरा, धरणगाव व जळगाव या तालुक्यांमधील १७५ गावांचा पाण्याचा प्रश्न गिरणेमुळे सुटतो.२. गिरणा धरणाची साठवण क्षमता २१ हजार ५०० दशलक्ष घनफुट असून, यातील जिवंत पाणीसाठा वगळून ३ हजार दशलक्ष घनफुट मृत साठा आहे.३. गिरणा धरणात चणकापूर, पुनद या धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत असतो.

टॅग्स :Jalgaonजळगाव