शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
4
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
5
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
6
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
7
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
8
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
10
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
11
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
12
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
13
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
14
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
15
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
16
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
17
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
18
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
19
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
20
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...

जळगाव जिल्ह्यात ६ लाख ६३ हजार हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 11:27 IST

शासनाला पाठविण्यात येणार अहवाल, लवकर भरपाईची अपेक्षा

जळगाव : जिल्ह्यात २१ ते २९ आॅक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे करण्याची मोहीम राबविण्यात आली़ सोमवार सायंकाळपर्यंत तब्बल ६ लाख ६३ हजार ३६० हेक्टरवरील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.अवकाळी ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला़ त्यामुळे शेतकरी अस्मानी संकटात सापडून हवालदिल झाला आहे.शेतीला लागलेला खर्चही निघालेला नाही़ दरम्यान, ४ नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याच्या सूचना केल्यानंतर प्रशासनाने हालचाली करीत जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतींचे पंचनामे करण्यास सुरूवात केली होती़अंदाजापेक्षा अधिक नुकसानीचे पंचनामेदरम्यान, प्रशासनाकडून ६ लाख १ हजार ३०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला होता़ त्यानुसार त्वरित पंचनाम्याच्या कार्यवाहीस सुरूवात झाली़ दरम्यान, सोमवार, ११ नोव्हेंबरच्या सायंकाळपर्यंत प्रशासनाकडून तब्बल ६ लाख ६३ हजार ३६० हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्याचा अहवाल हाती आला़ म्हणजेचं, अंदाजे हेक्टरपैकी प्रत्यक्षात केलेल्या पंचनाम्यामध्ये ६२ हजार हेक्टर अधिक निघाले़ यात सुध्दा वाढ होण्याची शक्यता आहे़ दोन ते तीन दिवस पंचनामे होण्याची शक्यता आहे़ त्यानंतर संपूर्ण तालुक्यांचा अहवाल हा शासनाला पाठविण्यात येणार आहे़५० हजार हेक्टर जागेवर पंचनाम्याची गरज नाहीअतिवृृष्टी व अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान तर झालेचं़, शिवाय काही हेक्टरवरील पिके आधीच काढण्यात आली तर काही ठिकाणी नुकसान झाले नाही़ त्यामुळे ५० हजार २०४ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे करण्याची आवश्यकता नसल्याचाही अहवाल कृषी विभागाला प्राप्त झाला आहे़६ लाख ६ हजार ४४४ शेतकऱ्यांचे शेतीचे पंचनामेजिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील सुमारे सोमवारपर्यंत ६ लाख ६ हजार ४४४ शेतकºयांच्या ६ लाख ६३ हजार ३६० हेक्टरवरील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत़ अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली़ दरम्यान, लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी बांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव