शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
3
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
8
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
9
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
10
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
11
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
12
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
13
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
14
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
15
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
16
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
17
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
18
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
19
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
20
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा

जळगाव जिल्ह्यात ६ लाख ६३ हजार हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 11:27 IST

शासनाला पाठविण्यात येणार अहवाल, लवकर भरपाईची अपेक्षा

जळगाव : जिल्ह्यात २१ ते २९ आॅक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे करण्याची मोहीम राबविण्यात आली़ सोमवार सायंकाळपर्यंत तब्बल ६ लाख ६३ हजार ३६० हेक्टरवरील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.अवकाळी ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला़ त्यामुळे शेतकरी अस्मानी संकटात सापडून हवालदिल झाला आहे.शेतीला लागलेला खर्चही निघालेला नाही़ दरम्यान, ४ नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याच्या सूचना केल्यानंतर प्रशासनाने हालचाली करीत जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतींचे पंचनामे करण्यास सुरूवात केली होती़अंदाजापेक्षा अधिक नुकसानीचे पंचनामेदरम्यान, प्रशासनाकडून ६ लाख १ हजार ३०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला होता़ त्यानुसार त्वरित पंचनाम्याच्या कार्यवाहीस सुरूवात झाली़ दरम्यान, सोमवार, ११ नोव्हेंबरच्या सायंकाळपर्यंत प्रशासनाकडून तब्बल ६ लाख ६३ हजार ३६० हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्याचा अहवाल हाती आला़ म्हणजेचं, अंदाजे हेक्टरपैकी प्रत्यक्षात केलेल्या पंचनाम्यामध्ये ६२ हजार हेक्टर अधिक निघाले़ यात सुध्दा वाढ होण्याची शक्यता आहे़ दोन ते तीन दिवस पंचनामे होण्याची शक्यता आहे़ त्यानंतर संपूर्ण तालुक्यांचा अहवाल हा शासनाला पाठविण्यात येणार आहे़५० हजार हेक्टर जागेवर पंचनाम्याची गरज नाहीअतिवृृष्टी व अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान तर झालेचं़, शिवाय काही हेक्टरवरील पिके आधीच काढण्यात आली तर काही ठिकाणी नुकसान झाले नाही़ त्यामुळे ५० हजार २०४ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे करण्याची आवश्यकता नसल्याचाही अहवाल कृषी विभागाला प्राप्त झाला आहे़६ लाख ६ हजार ४४४ शेतकऱ्यांचे शेतीचे पंचनामेजिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील सुमारे सोमवारपर्यंत ६ लाख ६ हजार ४४४ शेतकºयांच्या ६ लाख ६३ हजार ३६० हेक्टरवरील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत़ अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली़ दरम्यान, लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी बांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव