शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
2
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
3
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
4
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
5
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
6
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
7
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
8
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
9
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
10
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
11
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
12
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
13
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
14
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
15
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
16
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
17
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
18
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
19
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
20
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात ६ लाख ६३ हजार हेक्टरवरील पिकांचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2019 11:27 IST

शासनाला पाठविण्यात येणार अहवाल, लवकर भरपाईची अपेक्षा

जळगाव : जिल्ह्यात २१ ते २९ आॅक्टोबर या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यानंतर प्रशासनाकडून पंचनामे करण्याची मोहीम राबविण्यात आली़ सोमवार सायंकाळपर्यंत तब्बल ६ लाख ६३ हजार ३६० हेक्टरवरील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.अवकाळी ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला़ त्यामुळे शेतकरी अस्मानी संकटात सापडून हवालदिल झाला आहे.शेतीला लागलेला खर्चही निघालेला नाही़ दरम्यान, ४ नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी शेतीच्या नुकसानीचे पंचनामे तत्काळ करण्याच्या सूचना केल्यानंतर प्रशासनाने हालचाली करीत जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतींचे पंचनामे करण्यास सुरूवात केली होती़अंदाजापेक्षा अधिक नुकसानीचे पंचनामेदरम्यान, प्रशासनाकडून ६ लाख १ हजार ३०७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असावा, असा अंदाज वर्तविण्यात आला होता़ त्यानुसार त्वरित पंचनाम्याच्या कार्यवाहीस सुरूवात झाली़ दरम्यान, सोमवार, ११ नोव्हेंबरच्या सायंकाळपर्यंत प्रशासनाकडून तब्बल ६ लाख ६३ हजार ३६० हेक्टरवरील पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्याचा अहवाल हाती आला़ म्हणजेचं, अंदाजे हेक्टरपैकी प्रत्यक्षात केलेल्या पंचनाम्यामध्ये ६२ हजार हेक्टर अधिक निघाले़ यात सुध्दा वाढ होण्याची शक्यता आहे़ दोन ते तीन दिवस पंचनामे होण्याची शक्यता आहे़ त्यानंतर संपूर्ण तालुक्यांचा अहवाल हा शासनाला पाठविण्यात येणार आहे़५० हजार हेक्टर जागेवर पंचनाम्याची गरज नाहीअतिवृृष्टी व अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान तर झालेचं़, शिवाय काही हेक्टरवरील पिके आधीच काढण्यात आली तर काही ठिकाणी नुकसान झाले नाही़ त्यामुळे ५० हजार २०४ हेक्टरवरील पिकांचे पंचनामे करण्याची आवश्यकता नसल्याचाही अहवाल कृषी विभागाला प्राप्त झाला आहे़६ लाख ६ हजार ४४४ शेतकऱ्यांचे शेतीचे पंचनामेजिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील सुमारे सोमवारपर्यंत ६ लाख ६ हजार ४४४ शेतकºयांच्या ६ लाख ६३ हजार ३६० हेक्टरवरील नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत़ अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली़ दरम्यान, लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी बांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव