शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

जळगाव जिल्ह्यात पावसाची उघडीप, गाठली पासष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:09 IST

जनजीवन पूर्वपदावर

जळगाव : शनिवारी सकाळी पावसाने उघडीप दिली खरी मात्र दुपारी चार वाजता काही काळ पाऊस झाल्याने शहरवासीयांनी शनिवारी श्रावण महिन्यातील ऊन सावली आणि पावासाचा खेळ अनुभवला़ पावसाने उसंत घेतल्याने जनजीवन पूर्वपदावर आले होते़ शुक्रवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली असून पावसाने पासष्टी गाठली आहे़शुक्रवारी जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती़ शुक्रवारी सायंकाळी पाऊस थांबला होता़ शनिवारी सकाळी आठवडाभरानंतर सूर्य दर्शन झाले़ मात्र, दिवसभर ढगाळ वातावरण, नंतर ऊन व पुन्हा पाऊस व पुन्हा ऊन असा श्रावण शनिवारी अनुभवायला मिळाला़ शुक्रवारी यावल सर्वाधिक २९ मि.मी. पावसाची नोंद झाली़धरणांच्या साठ्यात झपाट्याने वाढशुक्रवारी झालेल्या पावसामुळे जिल्हाभरातील धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे़ तीन मध्यम प्रकल्पांनी शंभरी गाठली आहे़ पाच प्रकल्पांमध्ये मात्र अद्यापही ठणठणात आहे़ यात मोठे प्रकल्प हतनूर २९़ ७३, गिरणा ६६़१३, वाघूर ३६़८३ टक्के भरले आहे़तीन तालुके तहानलेलेचाळीसगावात सर्वात कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे़ चाळीसगाव तालुक्यात ४९़ ८ टक्के तर पाचोरा व भडगाव तालुक्यात अनुक्रमे ५९़२ व ५३़८ टक्के पावसाची नोंद झाली आहे़गिरणा धरणाची कधी कदम ताल, कधी तेज चालखेडगाव, ता-भडगाव- गिरणा धरणाच्या वरील चणकापूर, पुनद, हरणबारी व केळझर धरणातील विसर्ग सहा हजार क्युसेक वरुन वाढत अठरा हजार इतका झाला, यामुळे शुक्रवार संध्याकाळपासुन धरणाच्या जलसाठ्याच्या टक्के वारीत झपाट्याने वाढ झाली आहे. गिरणा धरणातील पाणीसाठा ६१.४२ टक्क्यांवरुन शुक्रवारी रात्री तब्बल पाच टक्के तर शनिवारी दिवसा तीन टक्के वाढ होत ते संध्याकाळी ६८.५६ टक्के इतका झाला होता.गिरणा धरणात ७, ८ व ९ तारखेला वरील धरणातून होणारा विसर्ग कमी झाला होता. यामुळे तीन दिवसात जलसाठ्यात फक्त ६ टक्के इतकी वाढ झाली. पुन्हा शुक्रवारी संध्याकाळी धरणात वाढ झाल्याची माहिती अभियंता हेमंत पाटील व एस.आर.पाटील यांनी दिली आहे.मुर्दापूर धरणात ९० टक्के जलसाठानशिराबाद - गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे व धानवड पिंपळे धरणातील विसगार्मुळे नशिराबादनजीकच्या मुदार्पुर धरणात पाण्याचा जलसाठा मोठ्या वेगाने वाढत आहे. शनिवारी सुमारे ९० टक्के धरण भरले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आदिती कुलकर्णी व शाखा अभियंता आर. डी. राणे यांनी ‘लोकमत’ला दिली. जलसाठा वाढ झाल्यामुळे परिसरातील शेतकरी व नशिराबादकरांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा कमी होण्यास मदत होणार आहे. महामार्ग चौपदरीकरण व रेल्वे लाईनच्या कामासाठी लागणारा मुरूम या धरणातून काढण्यात आला. त्यासाठी युद्धपातळीवर धरणातील मुरूम खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे निर्धारित जलसाठा पेक्षा यंदा सुमारे दीड ते दोन लाख घनमीटर जलसाठा वाढला आहे, अशी माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.यंदा तप्त उन्हामुळे धरणातील जलसाठा मोठ्या प्रमाणावर कमी झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून असलेल्या संततधार पावसाने व धानवड पिंपळे धरणातील विसर्ग मुदार्पुर धरणात झाल्यामुळे यंदा जलसाठा मोठ्या वेगाने वाढला आहे. गेल्या आठवड्यापूर्वी सुमारे ४० टक्के, त्यानंतर ६० टक्के आणि शनिवारी सुमारे ९० टक्के जलसाठा पूर्ण झाला आहे.बारा तालुक्यांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊसजुलै अखेरपासून पावसाने जोर पकडला होता तो श्रावण महिन्याच्या सुरूवातीपासून कायम आहे़ गेल्या वर्षीच्या दुप्पट पाऊस यावर्षी झाला आहे़ जिल्ह्यातील बारा तालुक्यांमध्ये ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे़ त्यात सर्वाधिक मुक्ताईनगर ७७़ ५ टक्के, यावल ७५़५ टक्के, जामनेर ७४़३ टक्के, भुसावळ ७१़ ८, रावेर ७०़१, एरंडोल ६९़१, धरणगाव ६६़७, चोपडा ६५़९, जळगाव ६५़ ४, बोदवड ६५, अमळनेर ६३़६, पारोळा ६० अशी बारा तालुक्यातील पावसाची नोंद आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव