शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

जळगाव जिल्ह्यात पावसाची उघडीप, गाठली पासष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:09 IST

जनजीवन पूर्वपदावर

जळगाव : शनिवारी सकाळी पावसाने उघडीप दिली खरी मात्र दुपारी चार वाजता काही काळ पाऊस झाल्याने शहरवासीयांनी शनिवारी श्रावण महिन्यातील ऊन सावली आणि पावासाचा खेळ अनुभवला़ पावसाने उसंत घेतल्याने जनजीवन पूर्वपदावर आले होते़ शुक्रवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली असून पावसाने पासष्टी गाठली आहे़शुक्रवारी जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती़ शुक्रवारी सायंकाळी पाऊस थांबला होता़ शनिवारी सकाळी आठवडाभरानंतर सूर्य दर्शन झाले़ मात्र, दिवसभर ढगाळ वातावरण, नंतर ऊन व पुन्हा पाऊस व पुन्हा ऊन असा श्रावण शनिवारी अनुभवायला मिळाला़ शुक्रवारी यावल सर्वाधिक २९ मि.मी. पावसाची नोंद झाली़धरणांच्या साठ्यात झपाट्याने वाढशुक्रवारी झालेल्या पावसामुळे जिल्हाभरातील धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे़ तीन मध्यम प्रकल्पांनी शंभरी गाठली आहे़ पाच प्रकल्पांमध्ये मात्र अद्यापही ठणठणात आहे़ यात मोठे प्रकल्प हतनूर २९़ ७३, गिरणा ६६़१३, वाघूर ३६़८३ टक्के भरले आहे़तीन तालुके तहानलेलेचाळीसगावात सर्वात कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे़ चाळीसगाव तालुक्यात ४९़ ८ टक्के तर पाचोरा व भडगाव तालुक्यात अनुक्रमे ५९़२ व ५३़८ टक्के पावसाची नोंद झाली आहे़गिरणा धरणाची कधी कदम ताल, कधी तेज चालखेडगाव, ता-भडगाव- गिरणा धरणाच्या वरील चणकापूर, पुनद, हरणबारी व केळझर धरणातील विसर्ग सहा हजार क्युसेक वरुन वाढत अठरा हजार इतका झाला, यामुळे शुक्रवार संध्याकाळपासुन धरणाच्या जलसाठ्याच्या टक्के वारीत झपाट्याने वाढ झाली आहे. गिरणा धरणातील पाणीसाठा ६१.४२ टक्क्यांवरुन शुक्रवारी रात्री तब्बल पाच टक्के तर शनिवारी दिवसा तीन टक्के वाढ होत ते संध्याकाळी ६८.५६ टक्के इतका झाला होता.गिरणा धरणात ७, ८ व ९ तारखेला वरील धरणातून होणारा विसर्ग कमी झाला होता. यामुळे तीन दिवसात जलसाठ्यात फक्त ६ टक्के इतकी वाढ झाली. पुन्हा शुक्रवारी संध्याकाळी धरणात वाढ झाल्याची माहिती अभियंता हेमंत पाटील व एस.आर.पाटील यांनी दिली आहे.मुर्दापूर धरणात ९० टक्के जलसाठानशिराबाद - गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे व धानवड पिंपळे धरणातील विसगार्मुळे नशिराबादनजीकच्या मुदार्पुर धरणात पाण्याचा जलसाठा मोठ्या वेगाने वाढत आहे. शनिवारी सुमारे ९० टक्के धरण भरले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आदिती कुलकर्णी व शाखा अभियंता आर. डी. राणे यांनी ‘लोकमत’ला दिली. जलसाठा वाढ झाल्यामुळे परिसरातील शेतकरी व नशिराबादकरांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा कमी होण्यास मदत होणार आहे. महामार्ग चौपदरीकरण व रेल्वे लाईनच्या कामासाठी लागणारा मुरूम या धरणातून काढण्यात आला. त्यासाठी युद्धपातळीवर धरणातील मुरूम खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे निर्धारित जलसाठा पेक्षा यंदा सुमारे दीड ते दोन लाख घनमीटर जलसाठा वाढला आहे, अशी माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.यंदा तप्त उन्हामुळे धरणातील जलसाठा मोठ्या प्रमाणावर कमी झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून असलेल्या संततधार पावसाने व धानवड पिंपळे धरणातील विसर्ग मुदार्पुर धरणात झाल्यामुळे यंदा जलसाठा मोठ्या वेगाने वाढला आहे. गेल्या आठवड्यापूर्वी सुमारे ४० टक्के, त्यानंतर ६० टक्के आणि शनिवारी सुमारे ९० टक्के जलसाठा पूर्ण झाला आहे.बारा तालुक्यांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊसजुलै अखेरपासून पावसाने जोर पकडला होता तो श्रावण महिन्याच्या सुरूवातीपासून कायम आहे़ गेल्या वर्षीच्या दुप्पट पाऊस यावर्षी झाला आहे़ जिल्ह्यातील बारा तालुक्यांमध्ये ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे़ त्यात सर्वाधिक मुक्ताईनगर ७७़ ५ टक्के, यावल ७५़५ टक्के, जामनेर ७४़३ टक्के, भुसावळ ७१़ ८, रावेर ७०़१, एरंडोल ६९़१, धरणगाव ६६़७, चोपडा ६५़९, जळगाव ६५़ ४, बोदवड ६५, अमळनेर ६३़६, पारोळा ६० अशी बारा तालुक्यातील पावसाची नोंद आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव