शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जळगाव जिल्ह्यात पावसाची उघडीप, गाठली पासष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:09 IST

जनजीवन पूर्वपदावर

जळगाव : शनिवारी सकाळी पावसाने उघडीप दिली खरी मात्र दुपारी चार वाजता काही काळ पाऊस झाल्याने शहरवासीयांनी शनिवारी श्रावण महिन्यातील ऊन सावली आणि पावासाचा खेळ अनुभवला़ पावसाने उसंत घेतल्याने जनजीवन पूर्वपदावर आले होते़ शुक्रवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली असून पावसाने पासष्टी गाठली आहे़शुक्रवारी जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती़ शुक्रवारी सायंकाळी पाऊस थांबला होता़ शनिवारी सकाळी आठवडाभरानंतर सूर्य दर्शन झाले़ मात्र, दिवसभर ढगाळ वातावरण, नंतर ऊन व पुन्हा पाऊस व पुन्हा ऊन असा श्रावण शनिवारी अनुभवायला मिळाला़ शुक्रवारी यावल सर्वाधिक २९ मि.मी. पावसाची नोंद झाली़धरणांच्या साठ्यात झपाट्याने वाढशुक्रवारी झालेल्या पावसामुळे जिल्हाभरातील धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे़ तीन मध्यम प्रकल्पांनी शंभरी गाठली आहे़ पाच प्रकल्पांमध्ये मात्र अद्यापही ठणठणात आहे़ यात मोठे प्रकल्प हतनूर २९़ ७३, गिरणा ६६़१३, वाघूर ३६़८३ टक्के भरले आहे़तीन तालुके तहानलेलेचाळीसगावात सर्वात कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे़ चाळीसगाव तालुक्यात ४९़ ८ टक्के तर पाचोरा व भडगाव तालुक्यात अनुक्रमे ५९़२ व ५३़८ टक्के पावसाची नोंद झाली आहे़गिरणा धरणाची कधी कदम ताल, कधी तेज चालखेडगाव, ता-भडगाव- गिरणा धरणाच्या वरील चणकापूर, पुनद, हरणबारी व केळझर धरणातील विसर्ग सहा हजार क्युसेक वरुन वाढत अठरा हजार इतका झाला, यामुळे शुक्रवार संध्याकाळपासुन धरणाच्या जलसाठ्याच्या टक्के वारीत झपाट्याने वाढ झाली आहे. गिरणा धरणातील पाणीसाठा ६१.४२ टक्क्यांवरुन शुक्रवारी रात्री तब्बल पाच टक्के तर शनिवारी दिवसा तीन टक्के वाढ होत ते संध्याकाळी ६८.५६ टक्के इतका झाला होता.गिरणा धरणात ७, ८ व ९ तारखेला वरील धरणातून होणारा विसर्ग कमी झाला होता. यामुळे तीन दिवसात जलसाठ्यात फक्त ६ टक्के इतकी वाढ झाली. पुन्हा शुक्रवारी संध्याकाळी धरणात वाढ झाल्याची माहिती अभियंता हेमंत पाटील व एस.आर.पाटील यांनी दिली आहे.मुर्दापूर धरणात ९० टक्के जलसाठानशिराबाद - गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे व धानवड पिंपळे धरणातील विसगार्मुळे नशिराबादनजीकच्या मुदार्पुर धरणात पाण्याचा जलसाठा मोठ्या वेगाने वाढत आहे. शनिवारी सुमारे ९० टक्के धरण भरले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आदिती कुलकर्णी व शाखा अभियंता आर. डी. राणे यांनी ‘लोकमत’ला दिली. जलसाठा वाढ झाल्यामुळे परिसरातील शेतकरी व नशिराबादकरांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा कमी होण्यास मदत होणार आहे. महामार्ग चौपदरीकरण व रेल्वे लाईनच्या कामासाठी लागणारा मुरूम या धरणातून काढण्यात आला. त्यासाठी युद्धपातळीवर धरणातील मुरूम खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे निर्धारित जलसाठा पेक्षा यंदा सुमारे दीड ते दोन लाख घनमीटर जलसाठा वाढला आहे, अशी माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.यंदा तप्त उन्हामुळे धरणातील जलसाठा मोठ्या प्रमाणावर कमी झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून असलेल्या संततधार पावसाने व धानवड पिंपळे धरणातील विसर्ग मुदार्पुर धरणात झाल्यामुळे यंदा जलसाठा मोठ्या वेगाने वाढला आहे. गेल्या आठवड्यापूर्वी सुमारे ४० टक्के, त्यानंतर ६० टक्के आणि शनिवारी सुमारे ९० टक्के जलसाठा पूर्ण झाला आहे.बारा तालुक्यांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊसजुलै अखेरपासून पावसाने जोर पकडला होता तो श्रावण महिन्याच्या सुरूवातीपासून कायम आहे़ गेल्या वर्षीच्या दुप्पट पाऊस यावर्षी झाला आहे़ जिल्ह्यातील बारा तालुक्यांमध्ये ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे़ त्यात सर्वाधिक मुक्ताईनगर ७७़ ५ टक्के, यावल ७५़५ टक्के, जामनेर ७४़३ टक्के, भुसावळ ७१़ ८, रावेर ७०़१, एरंडोल ६९़१, धरणगाव ६६़७, चोपडा ६५़९, जळगाव ६५़ ४, बोदवड ६५, अमळनेर ६३़६, पारोळा ६० अशी बारा तालुक्यातील पावसाची नोंद आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव