शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
2
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
3
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
4
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
5
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
6
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
7
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
8
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी
9
वयाच्या तिशीत ‘हे’ ५ आर्थिक नियम शिका! तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही
10
Swapna Shastra: स्वप्नात स्वतःचा मृत्यू पाहणे हे शुभ की अशुभ लक्षण? स्वप्नशास्त्र काय सांगते पाहू
11
पंडित नेहरुंच्या शब्दांनी भाषणाची सुरुवात; न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम महापौर ममदानींचा व्हिडिओ व्हायरल...
12
"लाडली, लक्ष्मी, बहीण..."; निवडणूक वर्षात महिलांसाठी रोख रकमेचा महापूर; सरकारं घाट्यात! आरबीआयनं आधीच दिलाय मोठा इशारा
13
मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू
14
Sonam Raghuvanshi : ना कागद, ना कापड... राजा रघुवंशीच्या हत्येनंतर धूर्त सोनमने कसे पुसले हत्यारावरचे रक्ताचे डाग?
15
"RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगारी, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल
16
बॉलिवूड अभिनेत्याचे अनेक अभिनेत्रींसोबत शारीरिक संबंध, पत्नीला संशय येताच मागे लावला डिटेक्टिव्ह अन् मग...
17
समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’
18
SBI ची नोकरी सोडून सुरू केली शेती, आज ७ कोटींच्या हेलिकॉप्टरचा मालक! ५ एकरापासून सुरुवात
19
Banganga Aarti: बाणगंगा महाआरतीसाठी नियमावली कठोर, 'क्यूआर कोड'सह पूर्व-नोंदणी अनिवार्य!

जळगाव जिल्ह्यात पावसाची उघडीप, गाठली पासष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 12:09 IST

जनजीवन पूर्वपदावर

जळगाव : शनिवारी सकाळी पावसाने उघडीप दिली खरी मात्र दुपारी चार वाजता काही काळ पाऊस झाल्याने शहरवासीयांनी शनिवारी श्रावण महिन्यातील ऊन सावली आणि पावासाचा खेळ अनुभवला़ पावसाने उसंत घेतल्याने जनजीवन पूर्वपदावर आले होते़ शुक्रवारी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची नोंद झाली असून पावसाने पासष्टी गाठली आहे़शुक्रवारी जिल्ह्यातील चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती़ शुक्रवारी सायंकाळी पाऊस थांबला होता़ शनिवारी सकाळी आठवडाभरानंतर सूर्य दर्शन झाले़ मात्र, दिवसभर ढगाळ वातावरण, नंतर ऊन व पुन्हा पाऊस व पुन्हा ऊन असा श्रावण शनिवारी अनुभवायला मिळाला़ शुक्रवारी यावल सर्वाधिक २९ मि.मी. पावसाची नोंद झाली़धरणांच्या साठ्यात झपाट्याने वाढशुक्रवारी झालेल्या पावसामुळे जिल्हाभरातील धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढली आहे़ तीन मध्यम प्रकल्पांनी शंभरी गाठली आहे़ पाच प्रकल्पांमध्ये मात्र अद्यापही ठणठणात आहे़ यात मोठे प्रकल्प हतनूर २९़ ७३, गिरणा ६६़१३, वाघूर ३६़८३ टक्के भरले आहे़तीन तालुके तहानलेलेचाळीसगावात सर्वात कमी पावसाची नोंद करण्यात आली आहे़ चाळीसगाव तालुक्यात ४९़ ८ टक्के तर पाचोरा व भडगाव तालुक्यात अनुक्रमे ५९़२ व ५३़८ टक्के पावसाची नोंद झाली आहे़गिरणा धरणाची कधी कदम ताल, कधी तेज चालखेडगाव, ता-भडगाव- गिरणा धरणाच्या वरील चणकापूर, पुनद, हरणबारी व केळझर धरणातील विसर्ग सहा हजार क्युसेक वरुन वाढत अठरा हजार इतका झाला, यामुळे शुक्रवार संध्याकाळपासुन धरणाच्या जलसाठ्याच्या टक्के वारीत झपाट्याने वाढ झाली आहे. गिरणा धरणातील पाणीसाठा ६१.४२ टक्क्यांवरुन शुक्रवारी रात्री तब्बल पाच टक्के तर शनिवारी दिवसा तीन टक्के वाढ होत ते संध्याकाळी ६८.५६ टक्के इतका झाला होता.गिरणा धरणात ७, ८ व ९ तारखेला वरील धरणातून होणारा विसर्ग कमी झाला होता. यामुळे तीन दिवसात जलसाठ्यात फक्त ६ टक्के इतकी वाढ झाली. पुन्हा शुक्रवारी संध्याकाळी धरणात वाढ झाल्याची माहिती अभियंता हेमंत पाटील व एस.आर.पाटील यांनी दिली आहे.मुर्दापूर धरणात ९० टक्के जलसाठानशिराबाद - गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे व धानवड पिंपळे धरणातील विसगार्मुळे नशिराबादनजीकच्या मुदार्पुर धरणात पाण्याचा जलसाठा मोठ्या वेगाने वाढत आहे. शनिवारी सुमारे ९० टक्के धरण भरले असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता आदिती कुलकर्णी व शाखा अभियंता आर. डी. राणे यांनी ‘लोकमत’ला दिली. जलसाठा वाढ झाल्यामुळे परिसरातील शेतकरी व नशिराबादकरांना तीव्र पाणीटंचाईच्या झळा कमी होण्यास मदत होणार आहे. महामार्ग चौपदरीकरण व रेल्वे लाईनच्या कामासाठी लागणारा मुरूम या धरणातून काढण्यात आला. त्यासाठी युद्धपातळीवर धरणातील मुरूम खोदकाम करण्यात आले होते. त्यामुळे निर्धारित जलसाठा पेक्षा यंदा सुमारे दीड ते दोन लाख घनमीटर जलसाठा वाढला आहे, अशी माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.यंदा तप्त उन्हामुळे धरणातील जलसाठा मोठ्या प्रमाणावर कमी झाला होता. मात्र गेल्या काही दिवसांपासून असलेल्या संततधार पावसाने व धानवड पिंपळे धरणातील विसर्ग मुदार्पुर धरणात झाल्यामुळे यंदा जलसाठा मोठ्या वेगाने वाढला आहे. गेल्या आठवड्यापूर्वी सुमारे ४० टक्के, त्यानंतर ६० टक्के आणि शनिवारी सुमारे ९० टक्के जलसाठा पूर्ण झाला आहे.बारा तालुक्यांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊसजुलै अखेरपासून पावसाने जोर पकडला होता तो श्रावण महिन्याच्या सुरूवातीपासून कायम आहे़ गेल्या वर्षीच्या दुप्पट पाऊस यावर्षी झाला आहे़ जिल्ह्यातील बारा तालुक्यांमध्ये ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली आहे़ त्यात सर्वाधिक मुक्ताईनगर ७७़ ५ टक्के, यावल ७५़५ टक्के, जामनेर ७४़३ टक्के, भुसावळ ७१़ ८, रावेर ७०़१, एरंडोल ६९़१, धरणगाव ६६़७, चोपडा ६५़९, जळगाव ६५़ ४, बोदवड ६५, अमळनेर ६३़६, पारोळा ६० अशी बारा तालुक्यातील पावसाची नोंद आहे़

टॅग्स :Jalgaonजळगाव