शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

जळगाव जिल्ह्यात ९५ टक्के पेरण्या पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 12:44 PM

पावसाने जास्त दडी मारल्यास अडचण

जळगाव : पावसाने यंदा उशिराने हजेरी लावल्याने पेरण्याही उशिराने सुरू झाल्या असून आतापर्यंत ९५ टक्के पेरण्या आटोपल्या असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान गतवर्षापासून मका व सोयाबिनच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली आहे. मात्र मक्यावर यंदा मोठ्याप्रमाणावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याचे संकेत असून त्यादृष्टीने कृषी विभागाने ५० टक्के अनुदानावर कीटकनाशकही उपलब्ध करून दिले आहे.जिल्ह्यात लागवडीखालील क्षेत्र कृषी आयुक्तालयाने वाढवून ८ लाख ८ हजार हेक्टर दाखविले असले तरीही सर्वसाधारणपणे ७ लाख २७ हजार हेक्टरपर्यंतच्या क्षेत्रावरच प्रत्यक्षात लागवड होते. मागील वर्षी या पूर्ण क्षेत्रावर पेरण्या झाल्या होत्या. यंदा ६ लाख ५० हजार हेक्टरवर पेरण्या झाल्याचा अधिकृत आकडा कृषी विभागाकडे प्राप्त झाला असला तरीही हा आकडा जुना असून त्यात आता वाढ होऊन सुमारे ९५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.कापसाची ४ लाख ५८ हजार हेक्टरवर पेरणीजिल्ह्यातील सर्वाधिक ५ लाख १० हजार हेक्टर क्षेत्र कापसाचे असून आतापर्यंत ४ लाख ५८ हजार हेक्टरवर कापसाची लागवड झाली आहे. मात्र हे क्षेत्र ५ लाख हेक्टरच्यावर जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.मक्यावर लष्करी अळीमक्याचे सरासरी क्षेत्र ८८ हजार ७८४ हेक्टर असले तरी आतापर्यंत ७३ हजार हेक्टरपर्यंत लागवड झाली आहे. हे क्षेत्र ८५ हजार हेक्टरपर्यंत जाईल, असा अंदाज आहे. मात्र मक्यावर जेथे लागवड जास्त आहे, तेथे आतापासूनच अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्णातील १५ तालुक्यातील १७ डिलर्सकडे औषधी ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून दिली आहेत. याखेरीज कापूस, सोयाबीन व ज्वारीवर विविध किडींसाठीचे कीटकनाशकेही ५० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी नजीकचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.शेतकऱ्यांनी त्यांनी लागवड केलेल्या पिकासाठी स्वयंघोषणापत्र सादर करून तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत परवाना प्राप्त करून घ्यायचा आहे.हा परवाना महाराष्टÑ कृषी उद्योग विकास महामंडळ यांच्यामार्फत त्यांच्या अधिकृत डीलरकडे देऊन ५० टक्के अनुदानावर कीटकनाशके उचल करावीत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.पावसाने दडी मारल्याने चिंतापावसाचे उशीरा आगमन झाले असले तरीही जिल्ह्यात पावसाने बºयापैकी हजेरी लावली आहे. जून व जुलैची मिळून पावसाची सरासरी २३०.१ मिमी असली तरीही आतापर्यंत त्यापैकी १७०.८ मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच संपूर्ण पावसाळ्यात होणाºया पावसाच्या २५.८ टक्के पाऊस झाला आहे. मात्र गत आठवडाभरापासून पावसाने दडी मारली आहे. पावसाचा हा खंड जर वाढला तर मात्र पिकांच्या वाढीवर विपरित परिणाम होण्याची भिती आहे.तसेच ज्या पिकांची उगवण झाली आहे. त्यांच्यावर किडीचा प्रादुर्भाव होण्याचा धोका वाढला आहे.पीकविम्यासाठी २४ पर्यंत मुदतपीक विम्यासाठीची मुदत वाढविण्यात आली असून २४ जुलै करण्यात आली आहे. त्यामुळे श्ोतकºयांची पीक विमा काढण्यासाठी गर्दी होत आहे. दरम्यान पीक विमा कंपनीतर्फे १९ रोजी सकाळी ११ वाजता अल्पबचत भवन येथे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव