शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

शिक्षण घेत असतानाचं संशोधन करणे महत्वाचे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 16:28 IST

तरूण संशोधक अजिंक्य कोत्तावार : २१ पेटंट आहेत नावावर ; इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद

ठळक मुद्दे- २६ व्या वर्षीचं केले १६ पेटंट नावावर - पुस्तकातील गोष्टी प्रयोगात उतरविल्या- ज्ञान फाउंडेशनच्या माध्यामतून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

सागर दुबे !जळगाव- प्रत्येकामध्ये संशोधक असतो, पण त्या संशोधन वृत्तीला चालणा मिळत नाही़ म्हणून आपल्या आवडींपासून ती व्यक्ती दूर जाते़ सध्या फक्त जादा गुण मिळविण्यासाठी शिक्षण घेतले जात आहे, असे पुस्तकी  शिक्षण नकोचं. शिक्षण हे व्यवहारिक असले पाहीजे. त्यामुळे शिक्षण घेत असतांनाचं विद्यार्थ्यांनी संशोधन केल े.जे़ पुस्तकातील गोष्टी प्रयोगातून प्रत्यक्षात उतरविण्याचे प्रयत्न विद्यार्थ्यांनी केले पाहीजे, असे मत युवा संशोधन अजिंक्य रवींद्र कोत्तावार (यवतमाळ) यांनी व्यक्त केले.रोटरी क्लब आॅफ जळगाव वेस्ट व आशा फाउंडेशन आयोजित ‘गप्पा इंडियाशी’ या कार्यक्रमानिमित्ते ते जळगावात आले असता ‘लोकमत’ने त्यांच्याशी संवाद साधला़ याप्रसंगी त्यांनी संशोधनाची आवड कशी निर्माण झाली त्याबाबतही माहिती सांगितली.

समस्या दिसली की, उपाय शोधायचो...लहानणापासूनच शिक्षणाची आवडं नव्हती़ फक्त गुण मिळविण्यासाठी शिक्षण का घ्यावे? हा प्रश्न नेहमीच पडायचा.गावात हिंडत असताना मजुरांना काम करताना त्यांना येणाºया अडचणी बघायचो व त्या अडचणी कशा सोडविता येतील याचा विचार करायचो़ आणि उपाय काढायचो.आणि जेव्हा शास्त्रज्ञ हा शब्द ऐकला तेव्हापासून मला त्याचे कुतूहल निर्माण झाले होते.परंतु, शालेय शिक्षण घेतल्यानंतर शिक्षण न घेण्याचा निर्णय घेतला.पण, कुटूंबांनी समजूत घातल्यानंतर इंजिनिअरिंगपर्यंतचे शिक्षण घेतले. काळातच वर्गात कमी प्रयोगशाळांमध्ये मी अधिक रहायचो़ पुस्तकी ज्ञानापेक्षा पुस्तकातील गोष्टी मला प्रत्यक्षात उतरविण्याची आवडं,  पर्यंत यश येत नाही.तोपर्यंत प्रयत्न करायचो़ त्यामुळे मला संशोधनात आवड निर्माण झाली. 

 आणि...पेटंट झाली नावावर...पुस्तकातल्या गोष्टी प्रत्यक्षात प्रयोगातून उतरविण्यानंतर २०१३ मध्ये पहिले पेटंट नावावर झाले.नंतर २६ वर्षी १६ पेटंट असणारा भारतातील तरूण युवक ठरलो आणि इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली.कल्पना येत गेल्या आणि त्या प्रत्यक्षात उतरवित गेलो आता मी २७ व्या वयात पदार्पण केले असून माझ्या नावावर २१ पेटंट असल्याची माहिती अजिंक्य कोत्तावर यांनी दिली.

शिक्षण हे व्यावहारिक असेल पाहीजे  शिक्षण पध्दतीत बदल होणे आता गरजेचे आहे.फक्त गुण घेण्यासाठी शिक्षण घेत आहात तर ते चुकीचे आहे़ शिक्षण हे व्यावहारिक असलं पाहीजे.परंतु, तसे होतांना दिसून येत नाही़ पुस्तकी ज्ञानापेक्षा व्यावहारिक ज्ञानावर अधिक भर दिला पाहीजे.शिक्षण झाल्यानंतर अनेक जण नोकरी करतात़ राज्यात फक्त ९ टक््के नोकºया आहेत.त्यामुळे स्वयंरोजगारकडे विद्यार्थ्यांनी वळले पाहीजे.त्यांच्या कौशल्याचा तिथेच वापर केला पाहीजे व संकल्पना वापरायला हव्या, असेही अंजिक्य कोत्तावार यांनी सांगितले़ करिअरसाठी ६३६ क्षेत्र आहेत़ पण, विद्यार्थ्यांना मोजकेच माहिती आहे.त्यामुळे आपली आवड ओळखने महत्वाचे असल्याचाही सल्ला त्यांनी दिला.व ज्ञान फाउंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमधील संशोधकवृत्तीला प्रोत्साहन देण्याचे ते काम करित असल्याचेही त्यांनी सांगितले.  

 कोण आहेत ‘अजिंक्य कोत्तावार’‘‘अजिंक्य रवींद्र कोत्तावर हे यवतमाळ जिल्ह्यातील पाटणबोरी येथील मुळचे रहिवासी. पाटणबोरी येथे ९ वीपर्यंत शालेय शिक्षण घेतल्यानंतर यवतमाळ येथे त्यांनी मॅकेनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.या काळात संशोधन करून २६ व्या वर्षी १६ पेटंट नावावर करणारे ते देशातील तरूण संशोधन ठरले.सद्यस्थितीला २१ पेटंट त्यांच्या नावावर आहेत. आणि ज्ञान फाउंडेशनच्या माध्यामातून ते विद्यार्थ्यांमधील संशोधनवृत्तीला प्रोत्साहन देण्याचे काम करित आहेत.’’ 

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव